शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

खासगी महाविद्यालयात बी.एड्. प्रवेश प्रक्रिया रखडली

By admin | Updated: July 12, 2015 22:51 IST

अनुदानित महाविद्यालयात प्रक्रिया सुरू : दोन वर्षांच्या अभ्यासक्रमामुळे अडचणीत

सदानंद र्औधे -मिरज -राज्यात या वर्षीपासून बी. एड्. अभ्यासक्रम दोन वर्षांचा केला असताना, खासगी महाविद्यालयातील बी. एड्. प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. केवळ शासकीय बी. एड्. महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, खासगी संस्थाचालकांत प्रवेश परीक्षेबाबत वाद असल्याने प्रवेश प्रक्रिया रखडली. राज्यात २८९ विनाअनुदानित बी. एड्. कॉलेज व १३० अनुदानित व शासकीय बी. एड्. कॉलेज आहेत. विनाअनुदानित व अनुदानित महाविद्यालयात प्रवेशासाठी दरवर्षी वेगवेगळी प्रवेश परीक्षा होते. दरवर्षी फेब्रुवारीत प्रवेश नियंत्रण समितीकडून संघटनेच्या प्रवेश प्रक्रियेस मान्यता देण्यात येते. मे अखेर प्रवेश परीक्षा पूर्ण होऊन जुलैपासून बी. एड्. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू होते. मात्र, यावर्षी जुलै महिन्यातसुद्धा खासगी महाविद्यालयातील बी. एड्. प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झालेला नाही. २००४ पासून विनाअनुदानित बी. एड्. कॉलेज संस्थाचालकांच्या संघटनेतर्फे प्रवेश परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. दरवर्षी सुमारे ३० हजार विद्यार्थी बी. एड्.ची प्रवेश परीक्षा देतात. शुल्क म्हणून जमा होणाऱ्या रकमेत भ्रष्टाचाराच्या आरोपावरून संघटनेच्या मध्यवर्ती प्रवेश प्रक्रियेचे संचालक देवेंद्र जोशी व सचिव रमजान शेख यांना निलंबित केले आहे. जोशी व शेख यांनी नवीन कार्यकारिणी स्थापन करून प्रवेश परीक्षेचा दावा केल्यामुळे शासनाने प्रवेश प्रक्रियेचे निर्देश दिलेले नाहीत. दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाला विरोधन्या. वर्मा कमिटीच्या शिफारशीनुसार या वर्षापासून बी. एड्.चा अभ्यासक्रम दोन वर्षांचा केला आहे. बी. एड्.च्या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात नृत्य, नाट्य व सांस्कृतिक विषय वाढविले आहेत. गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांची एक तुकडी शंभराऐवजी ५० केली आहे. राज्यात ३ लाख बी.एड्.धारक बेरोजगार असताना विद्यार्थी मिळणे मुश्किल होत आहे. गतवर्षी अनेक जागा रिक्त होत्या. बी. एड्. दोन वर्षांचे झाल्यामुळे शिक्षकांची संख्या व पगारावरील खर्च वाढणार आहे. बी. एड्.साठी ३५ ते ५५ हजार रुपये एका वर्षाचे शुल्क आहे. विद्यार्थ्यांना आता दोन वर्षांचे शुल्क भरावे लागणार असल्याने बी. एड्. ला विद्यार्थी मिळणार नाहीत व त्यामुळे खासगी बी. एड्. कॉलेज बंद पडण्याची संस्थाचालकांना भीती आहे.प्राधिकरणास विरोधपुढील वर्षापासून संस्थाचालक संघटनेची प्रवेश परीक्षा रद्द होऊन विनाअनुदानित महाविद्यालयांतील बी. एड्. प्रवेश परीक्षा शासनामार्फतच होणार आहेत. अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयात सर्व प्रकारच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी स्वतंत्र प्राधिकरणाच्या स्थापनेचा अध्यादेश काढला आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून प्राधिकरणामार्फत प्रवेश परीक्षा होणार आहे. खासगी महाविद्यालयांच्या संघटनेचा प्रवेश परीक्षेसाठी शासकीय प्राधिकरणास विरोध असून, याविरोधात न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे अध्यक्ष गजेंद्र ऐनापुरे यांनी सांगितले.