शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

आयुष्मान भारत २३ लाखांऐवजी पोहोचली ७ लाख ग्रामस्थांपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 08:40 IST

आरोग्य राज्यमंत्र्यांनी आरोग्य विभाग यंत्रणेला घेतले फैलावर, जिल्ह्यातील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहता कामा नये, अशी तंबी देत केंद्रीय राज्यमंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला

नाशिक : ‘आयुष्मान भारत’ या सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या योजनेबाबतही यंत्रणेकडून योग्य प्रकारे कार्यवाही करण्यात येत नसल्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. जिल्ह्यात सुमारे २३ लाख लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत अवघ्या ७ लाख लाभार्थ्यांपर्यंतच योजना पोहोचली आहे. 

जिल्ह्यातील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहता कामा नये, अशी तंबी देत केंद्रीय राज्यमंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीच्या बैठकीचे आयोजन शनिवारी (दि. १६) जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. नियोजन भवनात सलग तीन तास चाललेल्या बैठकीत जिल्ह्याच्या आरोग्यस्थितीचा आढावा घेत पवार यांनी अधिकाऱ्यांना सर्व योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, मालेगाव महानगरपालिका प्रशासक भालचंद्र गोसावी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरकर समितीचे अशासकीय सदस्य यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

जिल्ह्यात ‘आयुष्मान भव’ मोहीम सुरू होते आहे. २ ऑक्टोबरपर्यंत होणाऱ्या सेवा पंधरवड्यात विविध आरोग्यविषयक कार्यक्रम व मेळावे घेण्यात येणार आहेत. या मोहिमेंतर्गत ‘आभा कार्ड’चे जिल्ह्यात आतापर्यंत ११ लाख वितरण झाले आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये आयुष्मान भव मोहिमेंतर्गत दर शनिवारी मेळाव्याचे आयोजन होणार आहे. 

जिल्ह्यातही विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ उद्यापासून जिल्ह्यात विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नाशिकमध्ये हा कार्यक्रम साजरा होत आहे.विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून देशातील १३ हजार कोटींच्या पॅकेजचा लाभ वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून हस्तकौशल्याने वस्तू बनविणारे कारागीर व शिल्पकारांना मिळणार आहे.