शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

आव्हाडांच्या विधानाचे अयोध्येत पडसाद; रामजन्मभूमीतील महंतांचे थेट भाष्य, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 13:45 IST

Jitendra Awhad News: श्रीरामांबाबत केलेल्या विधानावरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली जात आहे.

Jitendra Awhad News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद उमटत आहेत. भाजपासह अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केला. आंदोलने केली. तसेच जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. यातच आता अयोध्या नगरीतून जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर प्रतिक्रिया आली आहे. 

राम जन्मभूमीतील महंत आचार्य सत्येंद्र दास यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांचे विधान पूर्णपणे चुकीचे आहे. राम ज्यावेळी वनवासाला गेले होते. त्यावेळी त्यांनी कंदमुळे आणि फळ खाल्ली हेच शास्त्रामध्ये लिहिले आहे. शास्त्रानुसार तेच प्रमाण आहे, असे आचार्य सत्तेंद्र दास यांनी म्हटले आहे. तसेच महंत सुधार दास यांनीही यावर भाष्य करताना जितेंद्र आव्हाडांवर सडकून टीका केली आहे. 

भक्तिमय वातावरणात राक्षसांचा जीव गुदमरतो

शरद पवार यांच्यासमवेत त्यांच्या व्यासपीठावर वारंवार हिंदू देवतांचे अपमान केले जातात. मागे जयंत पाटील यांनीही अशा प्रकारचे विधान केले होते. असे प्रकार शरद पवार यांच्याकडून ठरवून केले जात आहेत का, जाणीवपूर्वक हिंदू धर्मावर बोलले जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचाच एक भाग म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी असे विधान केले. याविरोधात पंचवटी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणार आहोत, असे महंत सुधीर दास यांनी सांगितले. राम मंदिराच्या निमित्ताने संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण आहे. या भक्तिमय वातावरणात राक्षसांचा जीव गुदमरतो. त्याचाच परिणाम म्हणून जितेंद्र आव्हाड यांचा जीव गुदमरू लागला आणि असे विधान केले. श्रीरामांनी पंचवटीत १४ हजार राक्षस मारले होते. त्यातीलच काही यांच्यासारखे परत जन्माला आले असे वाटते, या शब्दांत जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला. 

दरम्यान, राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार, असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले. जितेंद्र आव्हाड यांनी या विधानाबाबत पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. यावेळी काही पुरावे दाखवत कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याJitendra Awhadजितेंद्र आव्हाड