शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

आव्हाडांच्या विधानाचे अयोध्येत पडसाद; रामजन्मभूमीतील महंतांचे थेट भाष्य, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 13:45 IST

Jitendra Awhad News: श्रीरामांबाबत केलेल्या विधानावरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली जात आहे.

Jitendra Awhad News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद उमटत आहेत. भाजपासह अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केला. आंदोलने केली. तसेच जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. यातच आता अयोध्या नगरीतून जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर प्रतिक्रिया आली आहे. 

राम जन्मभूमीतील महंत आचार्य सत्येंद्र दास यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांचे विधान पूर्णपणे चुकीचे आहे. राम ज्यावेळी वनवासाला गेले होते. त्यावेळी त्यांनी कंदमुळे आणि फळ खाल्ली हेच शास्त्रामध्ये लिहिले आहे. शास्त्रानुसार तेच प्रमाण आहे, असे आचार्य सत्तेंद्र दास यांनी म्हटले आहे. तसेच महंत सुधार दास यांनीही यावर भाष्य करताना जितेंद्र आव्हाडांवर सडकून टीका केली आहे. 

भक्तिमय वातावरणात राक्षसांचा जीव गुदमरतो

शरद पवार यांच्यासमवेत त्यांच्या व्यासपीठावर वारंवार हिंदू देवतांचे अपमान केले जातात. मागे जयंत पाटील यांनीही अशा प्रकारचे विधान केले होते. असे प्रकार शरद पवार यांच्याकडून ठरवून केले जात आहेत का, जाणीवपूर्वक हिंदू धर्मावर बोलले जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचाच एक भाग म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी असे विधान केले. याविरोधात पंचवटी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणार आहोत, असे महंत सुधीर दास यांनी सांगितले. राम मंदिराच्या निमित्ताने संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण आहे. या भक्तिमय वातावरणात राक्षसांचा जीव गुदमरतो. त्याचाच परिणाम म्हणून जितेंद्र आव्हाड यांचा जीव गुदमरू लागला आणि असे विधान केले. श्रीरामांनी पंचवटीत १४ हजार राक्षस मारले होते. त्यातीलच काही यांच्यासारखे परत जन्माला आले असे वाटते, या शब्दांत जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला. 

दरम्यान, राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार, असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले. जितेंद्र आव्हाड यांनी या विधानाबाबत पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. यावेळी काही पुरावे दाखवत कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याJitendra Awhadजितेंद्र आव्हाड