शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भयानक - ठाण्यात एकाच कुटुंबातील १५ जणांची हत्या

By admin | Updated: February 28, 2016 13:57 IST

ठाण्यात घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथे रहाणा-या अन्वर वडेकर यांच्या कुटुंबातील १५ जणांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.

जितेंद्र कालेकर, ऑनलाइन लोकमत

मुंबई दि. २८  - ठाणे शहरात काळजाचा थरकाप उडवणारे भीषण हत्याकांड घडले आहे. ठाण्यात घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथे रहाणा-या अन्वर वडेकर यांच्या कुटुंबातील १५ जणांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. रात्री दोन ते तीनच्या सुमारास हे हत्याकांड घडले. 

हस्नील अन्वर वरेकर असे आरोपीचे नाव असून, कुटुंबातील सदस्यांची हत्या केल्यानंतर त्याने स्वत:ही आत्महत्या केली. मृतांमध्ये सात मुले, सहा महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. हस्नीलने आई-वडिल, पत्नी आणि स्वत:च्या दोन मुलांचीही हत्या केली. मृतांमध्ये हस्नीलच्या बहिणीच्या पाच मुलांचा समावेश आहे. हस्नीलने पद्धतशीरपणे कट रचून हे हत्याकांड घडवल्याची शक्यता आहे. हस्नीलने सर्व बहिणींना घरी जेवणासाठी बोलावले होते. तो स्वत:हा जाऊन या बहिणींना घरी घेऊन आला होता.  
 
या हत्याकांडातून बचावलेल्या सुबिया भरमल या बहिणीच्या गळयावर हस्नीलने सूरा फिरवला होता. मात्र तिने मृत झाल्याचे नाटक केल्यामुळे ती बचावली. हस्नील एकापाठोपाठ एक घरातील सदस्यांची हत्या करत असताना बचावलेल्या सुबियाने गपचुप दुस-या खोलीत जाऊन दरवाजा बंद करुन घेतला.खोलीतील खिडकीमधून तिने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर शेजा-यांनी तिला वाचवले आणि हे संपूर्ण हत्याकांड उघड झाले.
 
या हत्याकांडामध्ये हस्नीलची बहिण बचावली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बचावलेल्या बहिणीकडून हत्याकांडाचे नेमके कारण समजेल असे पोलिसांनी सांगितले. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा संशय असून पोलीस त्या दिशेने  तपास करत आहेत. संपूर्ण घरभर रक्ताचं थारोळं असून हत्या झालेल्यांमध्ये लहान मोठे सगळ्यांचा समावेश आहे. पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, ते तपास करत आहेत.  या सगळ्या जणांची हत्या चाकून करण्यात आली. 
 
आरोपीने  गळफास घेऊन आत्महत्या केली तेव्हा त्याच्या हातामध्ये चाकू होता. हस्नील इन्कम टॅक्स रिर्टन फाईल करणा-या एका कंपनीता कामाला होता. हस्नीलची कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली होती. त्यांच्यामध्ये कौटुंबिक कलह नव्हता असे शेजा-यांनी पोलिसांना सांगितले. हस्नीलने जेवणामध्ये गुंगीचे औषध मिळवून हे हत्याकांड केले असाही संशय पोलिसांनी व्यक्त केला.
 
ठाणे हत्याकांड, मृतांची नावे
हस्नील अन्वर वरेकर  वय -35 (मारेकरी),  जबीन हुस्नील वरेकर 28 पत्नी, मुबतशिरा हस्नील वरेकर 6 मुलगी, उमेरा हस्नील वरेकर 3 महीने मुलगी, अन्वर वरेकर 65 वडील, असगडी अन्वर वरेकर 55 आई, शबीना शौकत खान 35 बहिण, अनस शौकत खान 12 भाची, सादिया शौकत खान 16 भाची, अलहिसन शौकत खान 5 भाचा, बतूल अन्वर वरेकर 30 बहिण, मारिया अरफान फक्की 28 बहिण, उमेर अरफान फक्की 7 भाचा, युसूफ अरफान फक्की 4 भाचा, आरसिया सोजेफ् भरमल 5 महीने भाची.
 
विडिओ जर्नालिस्टचा  मृत्यू
ठाण्यातील हत्याकांडाच्या चित्रीकरणादरम्यान रतन भौमीक या विडिओ जर्नालिस्टचा  हदयविकाराच्या झटक्याने  मृत्यु झाला. सिविल रुग्णालयात मृतदेहांच्या चित्रीकरणादरम्यान हदयविकाराचा झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. 
 
आरोपी हस्नील वरेकर