शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात प्राथमिक शिक्षणाविषयी जागृती; पण खर्च परवडत नसल्याने उच्च शिक्षणात गळती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 06:57 IST

दारिद्र्याची शोधयात्रा : अहवालातील निरीक्षणांनी मांडली शिक्षणाची स्थिती

सीमा महांगडे मुंबई : राज्यात प्राथमिक शिक्षणाचे प्रमाण वाढले असून, गरीब पालकांमध्येही शिक्षणाविषयी जागृती वाढली आहे. मात्र, उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने आयटीआय वगळता उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण यामध्ये विद्यार्थ्यांची गळती होत असल्याचे शिक्षणविषयक निरीक्षण दारिद्र्याची शोधयात्रा या अहवालामध्ये नोंदविले गेले आहे.

हेरंब कुलकर्णी यांनी दारिद्र्याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्राच्या २४ जिल्ह्यांतील १२५ गावांना भेटी देऊन दारिद्र्याची शोधयात्रा हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात शेती, आरोग्य, रोजगार, स्थलांतर, कर्ज, भटके विमुक्त, दलित यांचे प्रश्न अशा अनेक विषयांचा अभ्यास केला आहे. शिक्षण विषयावरील या अहवालातील निरीक्षणे राज्याच्या शिक्षण परिस्थितीवर प्रकाश टाकणारी आहेत. राज्यात आयआयटी विरुद्ध आयटीआय हे शिक्षणाचे वर्णन आहे. आदिवासी व ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणाचे प्रमाण खूप वाढले आहे. ज्युनिअर कॉलेजची संख्या ग्रामीण भागात वाढल्याने मुलींमध्ये बारावीपर्यंत शिकण्याचे प्रमाण वाढले आहे. प्राथमिक शिक्षणात नवीन उपक्रम जाणून घेणारा तरुण शिक्षकांचा गट निर्माण झाला आहे. इंग्रजी शाळांची संख्या अगदी आदिवासी तालुक्यातही लक्षणीय असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

राज्यात भटक्या विमुक्तांच्या शिक्षणाची अजूनही आबाळ आहे. मात्र, पालावरची शाळा असा वेगळा उपक्रम लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यात राबविला जात आहे. यात पालावरच्या मुलांना शिक्षणाची गोडी लावली जाते. अहवालानुसार दुर्गम भागात बालविवाह हा शिक्षणात मोठा अडथळा असल्याचे दिसून आले आहे.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत काही शाळेत थक्क करणारे बदल दिसत असले, तरी भेटी दिलेल्या शाळांमध्ये वाचन, लेखन, गणन यांची स्थिती गंभीर असल्याचे अहवालात नमूद केले आहे. आदिवासी भागातील शाळेत विद्यार्थी गैरहजेरीचे प्रमाण जास्त असून, या शाळांमध्ये केवळ शिकवणीचा एकच तास होत आहे, तर काही ठिकाणी शिक्षकांची अनुपस्थिती मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर आले आहे. ग्रामीण शिक्षणातील घरापासून शाळेचे असलेले अंतर हा एक मोठा अडथळा असल्याचे अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले. याचवेळी जातीचे दाखले मिळत नसल्याने आदिवासी भागातील मुले त्रस्त आहेत. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी चांगल्या शिक्षण संस्थेत संधी गमावल्याची उदाहरणे अहवालात नमूद केली आहेत.राज्यातील ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा खालावलेला असल्याने, मुलांचा बारावीनंतर उच्च शिक्षणात टिकाव लागत नाही. विविध नोकरीच्या प्रवेश परीक्षेत ते टिकत नाहीत. त्यामुळे आता प्राथमिक शिक्षणासोबत चांगल्या दर्जाच्या शिक्षणासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक आहे. - मधुकर वानखेडे, शिक्षणविषयक कार्यकर्ते, अकोला

टॅग्स :Schoolशाळा