शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वीज मोटार बंदसाठी स्वयंचलित यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 11:47 IST

ग्रासरुट इनोव्हेटर : विहिरीमधील पाणी बाटलीपर्यंत आले व बाटली पाण्याच्या वर आली की, मोटार पंप आपोआप बंद होतो. यासाठी एमसीबी, एक पाणी बॉटल, दोर आणि स्टार्टर लागते.

- युनूस नदाफ (पार्डी, जि.नांदेड)

अर्धापूर तालुका बागायती क्षेत्र असून, मोठ्या प्रमाणात पिके घेतली जातात. केळी, ऊस व हळदीला बाराही महिने पाण्याची गरज असते. त्यामुळे विहीर व बोअरवेलचा वापर करावा लागतो. सध्या आधुनिकतेचे जग आहे.पाण्याच्या बचतीसाठी ठिबक संचाचा वापर केला जातो. परिणामी, पिकांना भरपूर पाणी मिळते आणि पाण्याचीही बचत होते. मात्र, नेहमी वीज खंडित होणे, हा प्रकार सध्या वाढला आहे. विजेअभावी पिकेही वाळतात. भारनियमन सुरू असल्याने शेतकऱ्यांना दिवस व रात्रीच्या वेळी अंधारात जाऊन वीज पंप चालू-बंद करावा लागतो. यासाठी बाजारात वेगवेगळ्या यंत्राची विक्री सुरू आहे. मात्र, मोटार पंप बंद करण्यासाठी यंत्राची निर्मिती कोणीही केली नाही. 

हे यंत्र अर्धापूर येथील शेतकरी परवेज खतीब यांनी तयार केले असून, सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. यासाठी बाजारातून एकच वस्तू खरेदी करावी लागते ती म्हणजे एमसीबी. शेतकरी परवेज खतीब यांनी त्यांच्या शेतातील वीज मोटार पंपावर स्वयंचलित यंत्र बसविले आहे. जेव्हा मोटार पंप बंद करायची, त्यापातळीपर्यंत पाण्याची बाटली विहिरीमध्ये बुडविली जाते. विहिरीमधील पाणी बाटलीपर्यंत आले व बाटली पाण्याच्या वर आली की, मोटार पंप आपोआप बंद होतो. यासाठी एमसीबी, एक पाणी बॉटल, दोर आणि स्टार्टर लागते.

यंत्रासाठी स्टार्टरमधून येणाऱ्या दोन वायरला एमसीबी जोडून त्याच एमसीबीच्या बटनाला छिद्र पाडून त्यातून लांब दोरी बांधावी. दोरीच्या एका टोकाला पाणी बॉटल बांधून ती ७५ टक्के पाण्याने भरावी. यात २५ टक्के हवा राहते. विहिरीत पाणी कमी झाल्यास बॉटल तरंगते आणि मोटार आपोआप बंद होते.  

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र