शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
5
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
6
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
7
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
8
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
9
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
10
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
12
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
13
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
14
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
15
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
16
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
17
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
18
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
19
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
20
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'

‘पंच’तारांकित विजयासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज

By admin | Updated: February 14, 2015 18:20 IST

विश्‍वचषक स्पर्धेच्या प्रारंभी वेस्ट इंडीज संघाने क्रिकेटवर अधिराज्य गाजविले, पण सत्ता आणि संपत्ती सदासर्वकाळ टिकत नसते याची प्रचिती क्रिकेटमध्येही आली.

विश्‍वास चरणकर, कोल्हापूर
विश्‍वचषक स्पर्धेच्या प्रारंभी वेस्ट इंडीज संघाने क्रिकेटवर अधिराज्य गाजविले, पण सत्ता आणि संपत्ती सदासर्वकाळ टिकत नसते याची प्रचिती क्रिकेटमध्येही आली. नव्वदीच्या दशकानंतर क्रिकेटमध्ये ऑन दि फिल्ड आणि ऑफ दि फिल्ड बरीच उलथापालथ झाली. पण या सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे वेस्ट इंडिजची सद्दी संपून ऑस्ट्रेलिया नवा सम्राट म्हणून उदयास आला. १९८७ला त्यांनी पहिला विश्‍वचषक जिंकला. त्यानंतरच्या सहा वर्ल्डकपपैकी तीन वर्ल्डकप त्यांनी जिंकले. सर्वाधिक चारवेळ विश्‍वचषक जिंकणारा संघ म्हणून त्यांचा दबदबा आहे. 
१९७५ च्या पहिल्या विश्‍वचषकात ऑस्ट्रेलियाने थेट फायनलपर्यंत धडक मारली, पण वेस्ट इंडीजच्या पोलादी भिंतीपुढे त्यांचेा वादळ शमले. पुढच्या दोन विश्‍वचषकात त्यांना पहिल्या फेरीतच बाहेर पडावे लागले. 
भारत आणि पाकिस्तान यांच्या संयुक्त यजमापदाखाली झालेल्या १९८७ चा विश्‍वचषक हा ऑस्ट्रेलियाच्या साम्राज्याची नांदी होती. या स्पर्धेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन पारंपारीक विरोधक फायनलमध्ये आमने-सामने आले. ऑस्ट्रेलियाला २५३ वर गुंडाळून इंग्लंडने सामन्यात वर्चस्व निर्माण केले, पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी ५0 षटकात ८ बाद २४६ पर्यंत इंग्लंडला रोखून धरले. इंग्लंडचा ८ धावांनी पराभव झाला. अँलन बोर्डरच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच जगज्जेता ठरला. कोलकात्याच्या ईडन गार्डनच्या साक्षीने क्रिकेट जगतात एक नवा राजा राज्य करण्यास अवतरला होता. 
त्यानंतर १९९२ साली इंग्लंडविरुध्दच्या सामन्यात पावसाच्या कृपेने पाकिस्तानला एक गुण जास्त मिळाल्यामुळे त्यांना सेमीफायनल गाठता आली नाही. तर १९९६ ला त्यांनी अंतिम फेरी गाठली पण श्रीलंकेने त्यांना पछाडून विश्‍वविजेतेपद जिंकले. १९९९, २00३ आणि २00७ असे सलग तीनवर्षे त्यांनी विश्‍वविजेतेपद मिळविले. म्हणजे सलग १५ वर्षे त्यांच्या डोक्यावर विश्‍वविजेतेपदाचा मुकुट होता. १९९९च्या विश्‍वचषकाची फायनल अक्षरश एकतर्फी झाली. ऑस्ट्रेलियाने पाकला केवळ १३२ धावात रोखले. हे आव्हान कांगारुंनी दोन गड्यांच्या मोबदल्यात २0 षटकातच गाठले. 
या स्पर्धेत भारताने उपांत्यफेरीत त्यांना घरी घालवून त्यांच्या नावापुढे ‘माजी विश्‍वविजेते’ असे विशेषण लावले. यंदाच्या विश्‍वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया हा सर्वात प्रबळ दावेदार आहे. इतिहासातील आकडेवारीवरुन त्यांच्याविषयी हे बोलले जात नाही, तर त्यांच्या संघातील खेळाडूंवर नजर टाकली की हे लक्षात येते. आजच्या ऑस्ट्रेलियन संघात प्रत्येक जागेवर त्यांच्याकडे तीन-तीन पर्याय आहेत. इतकेच नाही तर कर्णधारपदासाठीही त्यांच्याकडे तीन ऑप्शन आहेत. मायकेल क्लार्क फिट होवून संघात आला तर जॉर्ज बेलीला संघात ‘स्लॉट’च उपलब्ध होत नाही. 
आजच्या संघात सलामीवीर अँरोन फिंच आणि डेव्हीड वॉर्नर ही जोडी सर्वात विध्वंसक समजली जाते. पाठोपाठ शेन वॉटसन, मिशेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, बेली/क्लार्क, यष्टीरक्षक फलंदाज ब्रॅड हॅडीन हे सगळेच फार्मात आहेत. आयपीएलचा मिलेनियर ग्लेन मॅक्सवेलच्या रुपाने जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर त्यांच्याकडे आहे.  अमेरिकेच्या शस्त्रसाठय़ात नसतील तेवढी क्षेपणास्त्रे ऑस्ट्रेलियन गोलंदाजीत आहेत. गेली दोन वर्षे मिशेल जॉन्सन हा जगातील सर्व खेळपट्टयांवर धुमाकूळ घालतोय. त्यात मायदेशातील खेळपट्टय़ा म्हणजे त्यांच्यासाठी ‘सोने पे 
सुहागा.’ जोडीला मायकेल 
स्टार्क, जोश हेजलवूड, झेव्हिअर डोहर्टी, पॅट कमिन्स आणि जेम्स फॉल्कनेर अशी तगडी स्टारकास्ट  विरोधीपक्षाच्या चिंधड्या उडविण्यास सर्मथ आहे. 
बलाढय़ संघ, होमग्राउंड आणि प्रेक्षकांचा पाठिंबा या जोरावर ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा विश्‍वचषक जिंकण्यास सज्ज आहे.
 
च्ऑस्ट्रेलियाने दुसर्‍यांदा विश्‍वचषक जिंकून विंडीजशी बरोबरी केली. २00३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्‍वचषकात त्यांनी अंतिम फेरी गाठली. फायनलमध्ये त्यांची गाठ भारताशी पडली. अंतिम सामन्याच्या  पहिल्या चेंडूपासून ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पकड घेतली ती शेवटपर्यंत. 
च्रिकी पाँटिंगने उचलेला चषक सौरभ गांगुलीच्या हातात पाहण्याचे भारतीयांचे स्वप्न भंग पावले. २00७ साली वेस्ट इंडिजमध्ये झालेला विश्‍वचषक जिंकून ऑस्ट्रेलियाने हॅटट्रिक केली. सलग तीनदा आणि एकूण चार वेळा वर्ल्डकप जिंकणारा ऑस्ट्रेलिया एकमेव संघ आहे. विश्‍वचषकातील त्यांची ही मक्तेदारी भारताने २0११ मध्ये मोडीत काढली.
 
संघ असा.
ऑस्ट्रेलिया : मायकल क्लार्क (कर्णधार), जॉर्ज बेली (उपकर्णधार), पॅट क्युमिन्स, झेव्हिएर डोहर्टी, जेम्स फॉल्कनर, अँरोन फिंच, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), जोश हेजलवुड, मिचेल जॉन्सन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हीड वॉर्नर, शेन वॉटसन