शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'मागणी योग्य आहे', औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 20:00 IST

Aurangzeb Tomb Row: गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

Aurangzeb Tomb Row: छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) जवळील खुलताबाद येथे मुघल सम्राट औरंगजेबाची कबर आहे. गेल्या काही दिवसांपासून ही कबर हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेसह राज्यातील काही नेत्यांनी ही कबर हटवण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली असून, या मागणीला काही अर्थ असल्याचे म्हटले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एबीपी न्यूजशी बोलताना म्हटले की, 'औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी योग्य आहे कारण त्याने अनेक अत्याचार केले आहेत. औरंगजेब अतिशय क्रूर होता, त्याने छत्रपती संभाजी महाराजांची क्रुरतेने हत्या केली, परंतु तो मराठा साम्राज्य जिंकण्यात अपयशी ठरला आणि शेवटी महाराष्ट्रातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचे राजकारण कोणी करू नये. राज्य सरकारने दोन्ही पक्षांशी चर्चा करावी, जेणेकरून कायदा व सुव्यवस्था राखली जाईल, अशी प्रतिक्रिया आठवलेंनी दिली.

काय आहे औरंगजेबाच्या कबरीचा वाद?महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती, मात्र अलीकडे या मागणीने जोर धरला आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी म्हणाले होते की, औरंगजेब हा महान शासक होता आणि त्याने अनेक मंदिरे बांधली. त्यांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि हिंदू संघटनांनी निषेध केला आणि कबर हटवण्याची मागणी तीव्र झाली. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी तर बुलडोझरने कबर हटवण्याची मागणी केली. खासदार नवनीत राणा यांनीही कबर हटवण्याच्या मागणीला पाठिंबा दिला.

सरकारचा प्रतिसादमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणावर म्हटले की, औरंगजेबाची कबर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) च्या संरक्षणाखाली आहे आणि ती काढण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. कबर हटवायची की नाही, हा केवळ आपल्या सरकारचा नसून संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे. ती हटवण्याचा घाईघाईने निर्णय घेता येणार नाही. पण, या कबरीचे कोणी उदात्तिकरण करत असेल, तर त्याला सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेChhatrapati Sambhaji Maharajछत्रपती संभाजी महाराजchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर