शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

औरंगाबादचा २३० कोटींचा निधी बँकेत! महापालिकेकडून केवळ व्याज घेण्याचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 01:35 IST

शहर स्मार्ट करण्यासाठी तब्बल २३० कोटी रुपये मिळाले मात्र कामांचा श्रीगणेशाच झालेला नाही. हा निधी बँकेत ठेवून त्यावर निव्वळ व्याज घेण्याचे काम महापालिका करीत आहे.

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : शहर स्मार्ट करण्यासाठी तब्बल २३० कोटी रुपये मिळाले मात्र कामांचा श्रीगणेशाच झालेला नाही. हा निधी बँकेत ठेवून त्यावर निव्वळ व्याज घेण्याचे काम महापालिका करीत आहे.औरंगाबादचा २०१५ मध्ये योजनेत समावेश झाला नाही. दुसऱ्यांदा प्रस्ताव पाठवण्याचा आदेश राज्य शासनाने २०१६ मध्ये दिला. तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी स्वतंत्रपणे वॉर रूमची स्थापना करून प्रस्ताव तयार केला.चिकलठाणा येथे ग्रीन फिल्डसाठी ५०० एकर जागा रोल मॉडेल म्हणून निवडण्यात आली. ग्रीन फिल्डमध्ये २४ तास वीजपुरवठा, विजेच्या भूमिगत तारा व नाले, भूकंपरोधक घरे आदींचा त्यात समावेश आहे.पॅन सिटी उपक्रमात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याचा निर्णय घेतला. यानंतर राज्य शासनाने स्मार्ट सिटीसाठी स्पेशल पर्पज व्हेकलची (एसपीव्ही) स्थापना केली. एसपीव्हीला स्मार्ट औरंगाबाद डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नाव देण्यात आले. स्मार्ट सिटीचे मेन्टॉर म्हणून अपूर्व चंद्रा यांची निवड केली.अपूर्व चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली काही बैठकाही झाल्या. त्यानंतर शासनाने मेन्टॉर म्हणून उद्योग विभागाचे सचिव सुनील पोरवाल यांची निवड केली. त्यांच्या कार्यकाळात शहर बस खरेदीस मान्यता देण्यात आली. महापालिकेने निविदा काढून संबंधित कंपनीला कामही दिले आहे. दिवाळीनंतर शहर बस धावतील, अशी अपेक्षा आहे.शहरात दोन हजार सीसीटीव्ही, विविध ठिकाणी मोफत वायफाय, स्मार्ट बस थांबे, कर्मचाºयांसाठी बायोमेट्रिक हजेरी, सिटीझन अ‍ॅप अशी असंख्य कामे करण्यात येणार आहेत. तब्बल १२० कोटी रुपयांच्या कामांची निविदा राष्टÑीयस्तरावर प्रसिद्ध करण्यात आली. त्याची अंतिम तारीख ६ सप्टेंबर आहे. २०१९ च्या प्रारंभी औरंगाबादकरांना स्मार्ट सिटीच्या माध्यमातील छोटी-मोठी कामे दिसू लागतील.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSmart Cityस्मार्ट सिटी