शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद पर्यटनसमृद्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2016 01:19 IST

पर्यटनाला अधिकाधिक चालना मिळण्यासाठी नवनवीन संधी शोधण्याच्या उद्देशाने परराष्ट्र मंत्रालयाने, आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात देशातली पहिली

मुंबई : पर्यटनाला अधिकाधिक चालना मिळण्यासाठी नवनवीन संधी शोधण्याच्या उद्देशाने परराष्ट्र मंत्रालयाने, आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात देशातली पहिली पर्यटन परिषद राज्याची पर्यटन राजधानी असणाऱ्या औरंगाबादमध्येआयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या प्रधानसचिव वल्सा नायर सिंग म्हणाल्या, ‘अजिंठा-वेरूळ’च्या लेण्यांकडे पर्यटकांचा नेहमीच मोठा ओघ राहिला आहे. राज्यात येणाऱ्या देशी, तसेच परदेशी पर्यटकांना या स्थळांनी नेहमीच आकर्षित केले आहे. ऐतिहासिक रेशीम मार्ग आणिचीनसह जगभरातल्या बुद्धिस्ट वर्तुळाशी असलेला संबंध अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पद्मपाणिची (बुद्ध) भलीमोठी शिल्पे असल्याने अजिंठाचा समावेश नेहमीच जगातल्या अप्रतिम पर्यटन स्थळांमध्ये होतो. त्यामुळे या परिषदेसाठी औरंगाबादची निवड करण्यासाठी ही कारणे पुरेशी आहेत. या परिषदेच्या निमित्ताने औरंगाबाद आणि राज्यातील इतर पर्यटनस्थळांचा पुरस्कार होईल.या परिषदेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेत, यासाठी पर्यटनखाते प्रयत्नात आहे. पहिल्या दिवशी अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या सार्क देशांचे अधिकारी (साउथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोआॅपरेशन) या परिषदेला हजेरी लावणार आहेत. दुसऱ्या दिवशी या देशांचे पर्यटनमंत्री, तसेच भारतीय राज्यातले मंत्री सहभागी होतील.अजिंठा आणि शहरातल्या इतर पर्यटनस्थळांकडे परदेशी, तसेच देशी पर्यटकांचा ओघ वाढावा, यासाठी २०१८ मध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. गोल्फ टुरिझमबरोबरच शहरात फूड फेस्टिवल आणि हँडीक्राफ्ट फेस्टिव्हल भरवण्यासही मोठा वाव आहे. वेरूळ इथे एमटीडीसीच्या ९०० एकर जागेवर बुद्धिस्ट सेंटर बांधण्यावर विचार चालू आहे. (प्रतिनिधी)२०१७ हे ‘व्हिजिट महाराष्ट्र वर्ष’पर्यटन क्षेत्राच्या वाढ आणि विकासासाठी पुढील दोन वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत. २०१७ हे वर्ष ‘व्हिजिट महाराष्ट्र वर्ष’ म्हणून साजरे केले जाईल आणि २०१८ हे वर्ष जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिकाऱ्याने अजिंठा लेणी शोधल्याला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साजरे केले जाईल. महाराष्ट्रातल्या पर्यटनस्थळांची महती जगभरात पसरावी, यासाठी एक कॅम्पेन सुरू करण्यात येईल. ‘व्हिजिट महाराष्ट्र २०१७’अंतर्गत या कॅम्पेनचे प्रमोशन केले जाईल. टुरिझम स्टार्टअपसाठी आर्थिक सहाय्यस्टार्ट-अप योजनेंतर्गत पर्यटन व्यवसायामध्ये नवा सेटअप उभारू इच्छिणाऱ्यांना ५० लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. आॅक्टोबरमध्ये ‘अजिंठा-वेरूळ महोत्सव’- १४ ते १६ आॅक्टोबरदरम्यान एमटीडीसीच्या सहकार्याने तीन दिवसांचा अजिंठा-वेरूळ महोत्सव भरवला जाणार आहे. औरंगाबाद महानगरपालिकेला शहरातल्या सर्व पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या सिटी टूर बसची योजना करण्याची सूचना केली आहे. मुंबई, दिल्ली आणि हैद्राबादबरोबरच औरंगाबादची जयपूर, उदयपूर, नागपूर आणि पुणे या शहरांशी असलेली एअर कनेक्टिव्हिटी वाढवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.