शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
4
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
5
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
6
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
7
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
8
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
9
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
10
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
11
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
12
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
13
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
14
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
15
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
16
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
17
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
18
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
19
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
20
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?

औरंगाबाद पर्यटनसमृद्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2016 01:19 IST

पर्यटनाला अधिकाधिक चालना मिळण्यासाठी नवनवीन संधी शोधण्याच्या उद्देशाने परराष्ट्र मंत्रालयाने, आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात देशातली पहिली

मुंबई : पर्यटनाला अधिकाधिक चालना मिळण्यासाठी नवनवीन संधी शोधण्याच्या उद्देशाने परराष्ट्र मंत्रालयाने, आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात देशातली पहिली पर्यटन परिषद राज्याची पर्यटन राजधानी असणाऱ्या औरंगाबादमध्येआयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या प्रधानसचिव वल्सा नायर सिंग म्हणाल्या, ‘अजिंठा-वेरूळ’च्या लेण्यांकडे पर्यटकांचा नेहमीच मोठा ओघ राहिला आहे. राज्यात येणाऱ्या देशी, तसेच परदेशी पर्यटकांना या स्थळांनी नेहमीच आकर्षित केले आहे. ऐतिहासिक रेशीम मार्ग आणिचीनसह जगभरातल्या बुद्धिस्ट वर्तुळाशी असलेला संबंध अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पद्मपाणिची (बुद्ध) भलीमोठी शिल्पे असल्याने अजिंठाचा समावेश नेहमीच जगातल्या अप्रतिम पर्यटन स्थळांमध्ये होतो. त्यामुळे या परिषदेसाठी औरंगाबादची निवड करण्यासाठी ही कारणे पुरेशी आहेत. या परिषदेच्या निमित्ताने औरंगाबाद आणि राज्यातील इतर पर्यटनस्थळांचा पुरस्कार होईल.या परिषदेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेत, यासाठी पर्यटनखाते प्रयत्नात आहे. पहिल्या दिवशी अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या सार्क देशांचे अधिकारी (साउथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोआॅपरेशन) या परिषदेला हजेरी लावणार आहेत. दुसऱ्या दिवशी या देशांचे पर्यटनमंत्री, तसेच भारतीय राज्यातले मंत्री सहभागी होतील.अजिंठा आणि शहरातल्या इतर पर्यटनस्थळांकडे परदेशी, तसेच देशी पर्यटकांचा ओघ वाढावा, यासाठी २०१८ मध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. गोल्फ टुरिझमबरोबरच शहरात फूड फेस्टिवल आणि हँडीक्राफ्ट फेस्टिव्हल भरवण्यासही मोठा वाव आहे. वेरूळ इथे एमटीडीसीच्या ९०० एकर जागेवर बुद्धिस्ट सेंटर बांधण्यावर विचार चालू आहे. (प्रतिनिधी)२०१७ हे ‘व्हिजिट महाराष्ट्र वर्ष’पर्यटन क्षेत्राच्या वाढ आणि विकासासाठी पुढील दोन वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत. २०१७ हे वर्ष ‘व्हिजिट महाराष्ट्र वर्ष’ म्हणून साजरे केले जाईल आणि २०१८ हे वर्ष जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिकाऱ्याने अजिंठा लेणी शोधल्याला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साजरे केले जाईल. महाराष्ट्रातल्या पर्यटनस्थळांची महती जगभरात पसरावी, यासाठी एक कॅम्पेन सुरू करण्यात येईल. ‘व्हिजिट महाराष्ट्र २०१७’अंतर्गत या कॅम्पेनचे प्रमोशन केले जाईल. टुरिझम स्टार्टअपसाठी आर्थिक सहाय्यस्टार्ट-अप योजनेंतर्गत पर्यटन व्यवसायामध्ये नवा सेटअप उभारू इच्छिणाऱ्यांना ५० लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. आॅक्टोबरमध्ये ‘अजिंठा-वेरूळ महोत्सव’- १४ ते १६ आॅक्टोबरदरम्यान एमटीडीसीच्या सहकार्याने तीन दिवसांचा अजिंठा-वेरूळ महोत्सव भरवला जाणार आहे. औरंगाबाद महानगरपालिकेला शहरातल्या सर्व पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या सिटी टूर बसची योजना करण्याची सूचना केली आहे. मुंबई, दिल्ली आणि हैद्राबादबरोबरच औरंगाबादची जयपूर, उदयपूर, नागपूर आणि पुणे या शहरांशी असलेली एअर कनेक्टिव्हिटी वाढवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.