शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

औरंगाबाद ‘पॅटर्न’ने दिली नवी दिशा

By admin | Updated: September 21, 2015 00:57 IST

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांनी देशातील पहिले ‘आयएसओ’ मानांकन पटकावण्याचा मान मिळविल्यानंतर आता तब्बल २५० ग्रामपंचायतींची वाटचालदेखील ‘आयएसओ’ मानांकन मिळविण्याच्या दिशेने सुरू आहे.

विजय सरवदे, औरंगाबादऔरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांनी देशातील पहिले ‘आयएसओ’ मानांकन पटकावण्याचा मान मिळविल्यानंतर आता तब्बल २५० ग्रामपंचायतींची वाटचालदेखील ‘आयएसओ’ मानांकन मिळविण्याच्या दिशेने सुरू आहे. त्यादृष्टीने राबविलेला औरंगाबाद ‘पॅटर्न’ दिशादर्शक ठरत आहे.तत्कालीन विभागीय आयुक्त संजय जैस्वाल, तत्कालीन जिल्हाधिकारी विक्रमकुमार आणि जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या कार्यकाळात वेरूळ - खुलताबाद रोडवरील अब्दीमंडी या ३ हजार लोकवस्तीच्या गावाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत जिल्हास्तरीय पहिला पुरस्कार मिळविल्यानंतर गावातील तीन अंगणवाड्यांनी ‘आयएसओ’ मानांकन मिळविले. अंगणवाड्यांना मानांकन मिळविणारे देशातील हे पहिलेच गाव.जिल्ह्यातील ग्रामपंचायतीही ‘आयएसओ’ झाल्या पाहिजेत, असा विचार जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या मनात आला. ५ सप्टेंबर २०१४ रोजी बीडीओ, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी आणि सरपंचांची कार्यशाळा घेऊन त्यात यासंबंधीचा संकल्प करण्यात आला. जिल्ह्यात ८६१ ग्रामपंचायती आहेत. यापैकी आजघडीला २५४ ग्रामपंचायती ‘आयएसओ’ मानांकनासाठी प्रस्तावित असून, यातील ५४ ग्रामपंचायतींच्या यासंबंधीच्या तपासण्याही झाल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चौधरी यांनी ‘डीपीडीसी’समोर निधीचा प्रस्ताव ठेवला. जिल्हाधिकाऱ्यांनीही तब्बल १२ कोटींचा निधी मंजूर केला. ग्रामपंचायतींच्या इमारतींसाठी प्रत्येकी १० लाख रुपयांचा निधी वाटप केला. जिल्ह्यातील २५४पैकी १०० ते १५० ग्रामपंचायतींच्या इमारतींकडे पाहिले तर ‘कॉर्पोरेट’ कार्यालयासारखा त्यांचा लूक दिसतो.ग्रामपंचायतींच्या अद्ययावत इमारतींबरोबरच गरोदर महिलांसाठी ‘माहेरघर’, कार्यालयासमोर वृक्ष लागवड, गावात खेळाचे मैदान, स्वच्छ पाण्याचा प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन, ग्रंथालय, व्यायामशाळा, सार्वजनिक शौचालये, स्मशानभूमींचा विकास, अंगणवाड्या - शाळांमध्ये हात धुण्यासाठी वॉश बेसीन, संगणक आदींची व्यवस्था केली आहे. ग्रामपंचायतींना गेल्या वर्षी १८ कोटी रुपयांचे कर वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी तब्बल ९१ टक्के वसुली झाली. कर वसुलीतही त्या ग्रामपंचायती राज्यात अव्वल ठरल्या.