शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

औरंगाबादच्या कॅप्टनचे उड्डाण !

By admin | Updated: April 28, 2015 01:39 IST

औरंगाबादचे भूमीपुत्र असलेले मनीष मिनोचा यांच्या रुपाने भारतीय हवाई दलात औरंगाबादनेही मानाचा तुरा रोवला आहे.

अमिताभ श्रीवास्तव ल्ल औरंगाबादअत्याधुनिक मिराज-२००० ही दोन लढाऊ विमाने फ्रान्सहून भारतात आणताना त्यांच्या उड्डाणाचे नेतृत्व करण्याची संधी मिळालेले औरंगाबादचे भूमीपुत्र असलेले मनीष मिनोचा यांच्या रुपाने भारतीय हवाई दलात औरंगाबादनेही मानाचा तुरा रोवला आहे. मिनोच्या यांच्या नेतृत्वाखाली गेल्या शुक्रवारी ग्वाल्हेर येथील लष्करी धावपट्टीवर ही दोन विमाने हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली.ग्वाल्हेर येथील हवाई दलाच्या विमानतळावर फ्रान्सहून आलेली मिराज-२००० ही लढाऊ विमाने २४ एप्रिल रोजी उतरली, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते सितांशु कार यांनी टिष्ट्वटरवर दिली आहे. मिनोचा यांचा जन्म औरंगाबादेतील. ते येथेच लहानाचे मोठे झाले. विमान उड्डाणांच्या मोहिमेच्या तुकडीचे ते प्रमुख होते.संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ७० च्या दशकात फ्रान्सकडून घेतलेल्या मिराज-२००० या ५१ लढाऊ विमानांना अत्याधुनिक करण्यासाठी जुलै २०११ मध्ये करार करण्यात आला होता. त्यानुसार डिसेंबर २०११ मध्ये भारताने फ्रान्सला दोन विमाने पाठविली होती. विमाने अत्याधुनिक केल्यानंतर ती ताब्यात घेण्यासाठी भारतीय हवाई दलाची एक तुकडी फेब्रुवारीमध्ये मनीष मिनोचा यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्सला गेली होती. सहा आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर मिनोचा यांच्या नेतृत्वाखाली वैमानिकांसह ५० सदस्यांची तुकडी २४ एप्रिल रोजी भारतात परतली. या दोन आसनी लढाऊ विमानांनी ग्रीस, इजिप्त, दोहा, गुजरातमधील जामनगरमार्गे ग्वाल्हेर असा प्रवास केला.भारतीय हवाई दलाकडे सध्या मिराज-२००० ही ४८ लढाऊ विमाने आहेत. ही विमाने पाकिस्तानच्या के एफ -१६ विमानांचा सामना करण्यासाठी खरेदी करण्यात आली होती. आता ही दोन अत्याधुनिक विमाने भारताने ताब्यात घेतल्यानंतर उर्वरित सर्व विमानांचे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (एचएएल) भारतीय तंत्रज्ञ अत्याधुनिकीकरण करतील. हवाई दलाचे कॅप्टन मनीष मिनोचा यांनी औरंगाबादमधील होलीक्रॉस हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. गुणवंत विद्यार्थी असा त्यांचा लौकिक होता. १९८९ मध्ये शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी लष्करी सेवा प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला व तेथूनच १९९१ मध्ये बारावी व त्यानंतर १९९४ मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) परीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी हैदराबाद येथे हवाई दलाचे एक वर्ष प्रशिक्षण घेतले. १९९५ मध्ये ते हवाई दलात दाखल झाले. यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करणारे मनीष मिनोचा ते औरंगाबादकर असल्याचे अभिमानाने सांगतात. मिनोचा यांचे बालमित्र व उद्योजक सतीश लोढा हे चिंतामणी कॉलनीत राहतात. मित्राच्या कर्तृत्वाचा त्यांना अभिमान वाटतो. ते म्हणाले की, ‘मनीष बालपणापासूनच शिस्तप्रिय, निगर्वी आणि ध्येयाप्रती जागरूक होता. लष्करात जाण्याचे त्याचे बालपणीचे स्वप्न होते व ते त्याने पूर्ण केले. मनीष आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे. संदीप मालू हे मनीष मिनोचा यांच्या सर्वांत जुन्या मित्रांपैकी एक. तीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून त्यांची मैत्री आहे. संदीप यांनाही आपल्या मित्राचा अभिमान वाटतो. मनीष यांनी ग्वाल्हेरमध्ये कमांडिंग आॅफिसरपदाचा कार्यभार स्वीकारला होता. ते म्हणाले की, ‘मिराज-२०००’ सारख्या विमानाला फ्रान्सहून मायदेशी आणणे अत्यंत आव्हानात्मक होते; मात्र धाडसी स्वभाव असलेल्या मनीष यांनी ही मोठी जबाबदारी लीलया पेलली.