शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या कॅप्टनचे उड्डाण !

By admin | Updated: April 28, 2015 01:39 IST

औरंगाबादचे भूमीपुत्र असलेले मनीष मिनोचा यांच्या रुपाने भारतीय हवाई दलात औरंगाबादनेही मानाचा तुरा रोवला आहे.

अमिताभ श्रीवास्तव ल्ल औरंगाबादअत्याधुनिक मिराज-२००० ही दोन लढाऊ विमाने फ्रान्सहून भारतात आणताना त्यांच्या उड्डाणाचे नेतृत्व करण्याची संधी मिळालेले औरंगाबादचे भूमीपुत्र असलेले मनीष मिनोचा यांच्या रुपाने भारतीय हवाई दलात औरंगाबादनेही मानाचा तुरा रोवला आहे. मिनोच्या यांच्या नेतृत्वाखाली गेल्या शुक्रवारी ग्वाल्हेर येथील लष्करी धावपट्टीवर ही दोन विमाने हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली.ग्वाल्हेर येथील हवाई दलाच्या विमानतळावर फ्रान्सहून आलेली मिराज-२००० ही लढाऊ विमाने २४ एप्रिल रोजी उतरली, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते सितांशु कार यांनी टिष्ट्वटरवर दिली आहे. मिनोचा यांचा जन्म औरंगाबादेतील. ते येथेच लहानाचे मोठे झाले. विमान उड्डाणांच्या मोहिमेच्या तुकडीचे ते प्रमुख होते.संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ७० च्या दशकात फ्रान्सकडून घेतलेल्या मिराज-२००० या ५१ लढाऊ विमानांना अत्याधुनिक करण्यासाठी जुलै २०११ मध्ये करार करण्यात आला होता. त्यानुसार डिसेंबर २०११ मध्ये भारताने फ्रान्सला दोन विमाने पाठविली होती. विमाने अत्याधुनिक केल्यानंतर ती ताब्यात घेण्यासाठी भारतीय हवाई दलाची एक तुकडी फेब्रुवारीमध्ये मनीष मिनोचा यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्सला गेली होती. सहा आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर मिनोचा यांच्या नेतृत्वाखाली वैमानिकांसह ५० सदस्यांची तुकडी २४ एप्रिल रोजी भारतात परतली. या दोन आसनी लढाऊ विमानांनी ग्रीस, इजिप्त, दोहा, गुजरातमधील जामनगरमार्गे ग्वाल्हेर असा प्रवास केला.भारतीय हवाई दलाकडे सध्या मिराज-२००० ही ४८ लढाऊ विमाने आहेत. ही विमाने पाकिस्तानच्या के एफ -१६ विमानांचा सामना करण्यासाठी खरेदी करण्यात आली होती. आता ही दोन अत्याधुनिक विमाने भारताने ताब्यात घेतल्यानंतर उर्वरित सर्व विमानांचे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (एचएएल) भारतीय तंत्रज्ञ अत्याधुनिकीकरण करतील. हवाई दलाचे कॅप्टन मनीष मिनोचा यांनी औरंगाबादमधील होलीक्रॉस हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. गुणवंत विद्यार्थी असा त्यांचा लौकिक होता. १९८९ मध्ये शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी लष्करी सेवा प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला व तेथूनच १९९१ मध्ये बारावी व त्यानंतर १९९४ मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) परीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी हैदराबाद येथे हवाई दलाचे एक वर्ष प्रशिक्षण घेतले. १९९५ मध्ये ते हवाई दलात दाखल झाले. यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करणारे मनीष मिनोचा ते औरंगाबादकर असल्याचे अभिमानाने सांगतात. मिनोचा यांचे बालमित्र व उद्योजक सतीश लोढा हे चिंतामणी कॉलनीत राहतात. मित्राच्या कर्तृत्वाचा त्यांना अभिमान वाटतो. ते म्हणाले की, ‘मनीष बालपणापासूनच शिस्तप्रिय, निगर्वी आणि ध्येयाप्रती जागरूक होता. लष्करात जाण्याचे त्याचे बालपणीचे स्वप्न होते व ते त्याने पूर्ण केले. मनीष आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे. संदीप मालू हे मनीष मिनोचा यांच्या सर्वांत जुन्या मित्रांपैकी एक. तीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून त्यांची मैत्री आहे. संदीप यांनाही आपल्या मित्राचा अभिमान वाटतो. मनीष यांनी ग्वाल्हेरमध्ये कमांडिंग आॅफिसरपदाचा कार्यभार स्वीकारला होता. ते म्हणाले की, ‘मिराज-२०००’ सारख्या विमानाला फ्रान्सहून मायदेशी आणणे अत्यंत आव्हानात्मक होते; मात्र धाडसी स्वभाव असलेल्या मनीष यांनी ही मोठी जबाबदारी लीलया पेलली.