शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आॅगस्ट क्रांती दिनी ‘बस देखो-रेल देखो’

By admin | Updated: June 30, 2014 00:44 IST

स्वतंत्र विदर्भासाठी मागील काही वर्षांपासून आंदोलने सुरू आहेत. आंदोलनांतर्गत येत्या आॅगस्ट क्रांती दिनी ९ आॅगस्ट रोजी विदर्भात सर्वत्र ‘बस देखो रेल देखो’ हे आगळेवेगळे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

‘जनमंच’चा पुढाकार : विदर्भवाद्यांचे अभिनव आंदोलननागपूर : स्वतंत्र विदर्भासाठी मागील काही वर्षांपासून आंदोलने सुरू आहेत. आंदोलनांतर्गत येत्या आॅगस्ट क्रांती दिनी ९ आॅगस्ट रोजी विदर्भात सर्वत्र ‘बस देखो रेल देखो’ हे आगळेवेगळे आंदोलन पुकारण्यात आले आहे. विदर्भवाद्यांच्या विदर्भस्तरीय प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विदर्भ राज्याच्या आंदोलनात सर्वसामान्यांचा सहभाग वाढवून त्याला व्यापक करण्याच्या दृष्टीने एक ठोस कार्यक्रम ठरविण्यासाठी ‘जनमंच’ या सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने रविवारी संघी सदन काँग्रेसनगर धंतोली येथे विदर्भातील सर्व जिल्ह्यांच्या विदर्भवादी प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकात वानखडे, प्रा. शरद पाटील, विदर्भ कनेक्टचे अ‍ॅड. मुकेश समर्थ, दिनेश नायडू, विष्णू मनोहर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके, हरीश इथापे, अजय संघी, विशाल मुत्तेमवार प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आंदोलनाची भूमिका विषद करताना चंद्रकांत वानखेडे यांनी स्वतंत्र विदर्भाचा लढा तीव्र करणे गरजेचे झाले असल्याचे स्पष्ट केले. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिजे, असा निर्धार करण्याचे आवाहन केले. अ‍ॅड. अनिल किलोर यांनी येत्या ९ आॅगस्ट रोजी उपरोक्त आंदोलनाची घोषणा केली. ‘बस देखो, रेल देखो’ हे एक आगळेवेगळे आंदोलन राहणार आहे. या आंदोलनात आंदोलनकर्ते कुठल्याही कायद्याचे उल्लंघन करणार नाही. बसगाड्या रोखणे, रेल्वे रोखणे असा कुठलाही प्रकार होणार नाही. कुठलीही अनुचित कृती न करता केवळ बस स्थानक व रेल्वे स्थानकांवर बस व रेल्वे पाहण्यासाठी लोकांना गोळा करायचे आहे. विदर्भातील प्रत्येक ठिकाणी रेल्वे स्टेशन व बस स्थानकांवर विदर्भवादी मोठ्या संख्येने एकत्र येतील. स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देतील. तसेच भजन, कीर्तन, संगीत या माध्यमातून विदर्भाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधतील. या आंदोलनात जास्तीत जास्त लोकांना एकत्र आणून विदर्भवाद्यांनी सरकारला आपली शक्ती दाखवून द्यायची असल्याचे स्पष्ट केले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके यांनी साहित्यिकांची भूमिका मांडतांना विदर्भाच्या आंदोलनात त्यांनाही सामावून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. हरीश इथापे यांनी विदर्भाच्या आंदोलनात युवकांनी उडी घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यासोबत अनेक प्रतिनिधींनी विदर्भातील मागासलेपणावर व विविध समस्यांवर प्रकाश टाकला. बैठकीत अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, प्रवीण महाजन, प्रमोद पांडे, विजय विलोकर, गजानन अहमदाबादकर, राम आखरे, राजा आकाश, गजानन कोल्हे, नितीन कारेमोरे, प्रणय पराते, कृष्णराव दाभोळकर, सुनील वंजारी, पंकज वंजारी, प्रकाश इटणकर, संपत रामटेके, नरेश क्षीरसागर, किशोर गुल्हाणे उपस्थित होते.(प्रतिनिधी)