शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रात अधोगतीकडे नेत ठाकरे सरकारची ‘द्विवर्षपूर्ती भेट’, अतुल भातखळकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 17:16 IST

Atul Bhatkhalkar : आरोग्य मंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळे महाराष्ट्र आरोग्य सुविधांच्या यादीत चौथ्या स्थानावरून तब्बल तेराव्या स्थानावर घसरला आहे, असे अतुल भातखळकर म्हणाले.

मुंबई  : महाविकास आघाडी सरकारला आज दोन पूर्ण झाली असताना राज्याला सर्वांगिण प्रगतीकडे नेण्याचे सोडून केवळ टक्केवारी, वसुली, खंडणी व सुडाचे राजकारण करण्यात महाविकास आघाडी सरकार मग्न आहे. इंडिया टुडेच्या आकडेवारीत महाराष्ट्र तब्बल नवव्या स्थानी घसरला असून महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रात अधोगतीकडे नेत ठाकरे सरकारची राज्यातील जनतेला ‘द्विवर्षपूर्ती भेट’ देण्यात आल्याची टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

इंडिया टुडे या नियतकालिकाने घोषित केलेल्या आकडेवारीत स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र ६ व्या क्रमांकावरून १० व्या क्रमांकावर घसरला आहे, अभ्यासाच्या नावाखाली विनानिमंत्रण परदेश पर्यटन करण्यात मग्न असल्यामुळे ‘युवराज’ मंत्री असलेल्या पर्यटनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरला आहे.  कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र अकराव्या स्थानी घसरला असून कोरोनाच्या काळात  महाराष्ट्राला मृत्युशय्येवर ठेवणाऱ्या आणि केवळ चमकोगिरी व खोटे बोलून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न असलेल्या आरोग्य मंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळे महाराष्ट्र आरोग्य सुविधांच्या यादीत चौथ्या स्थानावरून तब्बल तेराव्या स्थानावर घसरला आहे, असे अतुल भातखळकर म्हणाले.

याचबरोबर, केवळ स्वत:च्या पक्षाचा व नातेवाईकांचा आर्थिक विकास करण्यात राज्याचे अर्थमंत्री व्यस्त असल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सातव्या स्थानी असलेला महाराष्ट्र आर्थिक प्रगतीच्या बाबतीत तब्बल पंधराव्या स्थानी घसरला आहे. त्यामुळे विचारांच्या आघाडीवर व सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरलेले हे ठाकरे सरकार महाराष्ट्राला सर्वागीण विकासाच्या बाबतीत सुद्धा अपयशाच्या खायीत घेऊन चालले आहे, अशी टीका सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी यावेळी केली.

याशिवाय, एक पूर्णपणे विश्वासघातकी, भ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम सरकार म्हणजे हे महाविकास सरकार आहे अशी महाराष्ट्राच्या इतिहासात या सरकारची नोंद झाली असून आता राज्यातील १२ कोटी जनताच यांच्या पापाचा घडा फोडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास सुद्धा अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Atul Bhatkhalkarअतुल भातखळकरState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरे