शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
4
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
5
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
6
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
7
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
8
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
9
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
10
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
11
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
12
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
13
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
14
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
15
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
16
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
17
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
18
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
19
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
20
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर

मोदी सरकारकडून देशाचा सांप्रदायिक विभागणीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 06:16 IST

मीरा बोरवणकर यांच्याशी ‘लोकमत’चा संवाद; निवडणूक आयोगाची स्वायत्तता धोक्यात

जमीर काझी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारने सांप्रदायिकतेच्या मुद्द्यावर देशाची विभागणी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी सैन्यदल आणि शहीद जवानांचा वापर करणे गैर आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही जुमल्यांना बळी न पडता विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देत निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन निवृत्त पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी केले आहे.

बोरवणकर यांच्यासह ६६ माजी सनदी अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत, राष्टÑपती रामनाथ कोविंद यांना संयुक्तपणे पत्र लिहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर मीरा बोरवणकर यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता, त्यांनी मनमोकळेपणे आपली भूमिका स्पष्ट केली.

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेण्याचे कारण काय?आम्ही सर्वांनी देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेत दीर्घकाळ काम केले आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये केंद्र सरकारकडून आयोगावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, सर्व आयुक्तांनी त्या दबावाला न जुमानता स्वतंत्र आणि निपक्ष पद्धतीने काम पार पाडले आहे. यावेळी प्रथमच विपरित घडत आहे. गंभीर बाबीविरोधात आयोगाकडून ठोस भूमिका घेणे आवश्यक होते. मात्र, आयोग दबावाखाली त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याविरुद्ध आवाज उठविणे आवश्यक होते. त्यासाठी आम्ही राष्टÑपतींकडे भूमिका मांडली आहे. निर्भय व मुक्त वातावरणात निवडणुका व्हाव्यात, त्यासाठी आयोगाने घटनेच्या ३२४ कलमांतर्गत दिलेल्या अधिकाराचा योग्य वापर करण्याची मागणी आहे.

राजकीय पक्षाकडून निवडणूक अधिकाऱ्यांवर, पोलिसांवर दबाव असतो का?प्रत्येक राजकीय पक्ष पोलिसांवर दबाव आणण्याचा आणि आपल्याला सोयीचा निर्णय होण्याच्या प्रयत्नात असतो. अशावेळी सर्र्वाेच्च न्यायालयाने दिलेले निर्देश पोलिसांची स्वायत्तता सुरक्षित ठेवू शकतो.

मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीकडे आपण कसे बघता?सरकारकडून सांप्रदायिक मुद्द्यावर देशाची विभागणी करण्याचा प्रयत्न होतो आहे. त्याचप्रमाणे, नोटाबंदी हा सर्वात दुर्दैवी निर्णय होता. देशात व महाराष्टÑात पूर्ण बहुमत असतानाही भ्रष्टाचार रोखण्यास ते पूर्ण अपयशी ठरले आहे. शेजारी राष्टांशी संबंध सामान्य करण्याऐवजी बलाढ्य सैन्य दलाचा वापर करण्याची पद्धत निषेधार्ह आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी