शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

मोदी सरकारकडून देशाचा सांप्रदायिक विभागणीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 06:16 IST

मीरा बोरवणकर यांच्याशी ‘लोकमत’चा संवाद; निवडणूक आयोगाची स्वायत्तता धोक्यात

जमीर काझी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारने सांप्रदायिकतेच्या मुद्द्यावर देशाची विभागणी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी सैन्यदल आणि शहीद जवानांचा वापर करणे गैर आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही जुमल्यांना बळी न पडता विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देत निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन निवृत्त पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी केले आहे.

बोरवणकर यांच्यासह ६६ माजी सनदी अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत, राष्टÑपती रामनाथ कोविंद यांना संयुक्तपणे पत्र लिहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर मीरा बोरवणकर यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता, त्यांनी मनमोकळेपणे आपली भूमिका स्पष्ट केली.

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेण्याचे कारण काय?आम्ही सर्वांनी देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेत दीर्घकाळ काम केले आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये केंद्र सरकारकडून आयोगावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, सर्व आयुक्तांनी त्या दबावाला न जुमानता स्वतंत्र आणि निपक्ष पद्धतीने काम पार पाडले आहे. यावेळी प्रथमच विपरित घडत आहे. गंभीर बाबीविरोधात आयोगाकडून ठोस भूमिका घेणे आवश्यक होते. मात्र, आयोग दबावाखाली त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याविरुद्ध आवाज उठविणे आवश्यक होते. त्यासाठी आम्ही राष्टÑपतींकडे भूमिका मांडली आहे. निर्भय व मुक्त वातावरणात निवडणुका व्हाव्यात, त्यासाठी आयोगाने घटनेच्या ३२४ कलमांतर्गत दिलेल्या अधिकाराचा योग्य वापर करण्याची मागणी आहे.

राजकीय पक्षाकडून निवडणूक अधिकाऱ्यांवर, पोलिसांवर दबाव असतो का?प्रत्येक राजकीय पक्ष पोलिसांवर दबाव आणण्याचा आणि आपल्याला सोयीचा निर्णय होण्याच्या प्रयत्नात असतो. अशावेळी सर्र्वाेच्च न्यायालयाने दिलेले निर्देश पोलिसांची स्वायत्तता सुरक्षित ठेवू शकतो.

मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीकडे आपण कसे बघता?सरकारकडून सांप्रदायिक मुद्द्यावर देशाची विभागणी करण्याचा प्रयत्न होतो आहे. त्याचप्रमाणे, नोटाबंदी हा सर्वात दुर्दैवी निर्णय होता. देशात व महाराष्टÑात पूर्ण बहुमत असतानाही भ्रष्टाचार रोखण्यास ते पूर्ण अपयशी ठरले आहे. शेजारी राष्टांशी संबंध सामान्य करण्याऐवजी बलाढ्य सैन्य दलाचा वापर करण्याची पद्धत निषेधार्ह आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी