शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

दोनच दिवस अधिवेशन; विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंकडूनच नाराजी व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 06:48 IST

नियमित अधिवेशन घेण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी मिळून नियमावली ठरवायला हवी आणि पुढचे अधिवेशन पूर्ण काळासाठी व्हायला हवे या शब्दात त्यांनी कान टोचले. 

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन केवळ दोनच दिवस होत असल्याबद्दल विरोधक टीका करीत असताना विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही त्याबाबत नाराजी व्यक्त केली. नियमित अधिवेशन घेण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी मिळून नियमावली ठरवायला हवी आणि पुढचे अधिवेशन पूर्ण काळासाठी व्हायला हवे या शब्दात त्यांनी कान टोचले. भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. त्यांनी, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने सभागृहात करण्यात आलेल्या नियोजनाची उपरोधिकपणे स्तुती करत कौतुक केले. कोरोनाचा बाप काय आजोबा आाला तरी काही होणार नाही अशी व्यवस्था या ठिकाणी असल्याचे ते म्हणाले, पण अधिवेशन केवळ दोनच दिवसांचे का, असा सवाल त्यांनी केला. जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होणार नसेल, मांडलेल्या विधेयकांवरही चर्चा करता येणार नसेल तर अधिवेशन कशासाठी, असा सवाल त्यांनी केला. हा धागा पकडून अध्यक्ष पटोले म्हणाले की, अधिवेशनाचा कालावधी कमी असल्याने आमदारांना आपले अधिकार राखता येत नाहीत. तसेच जनतेचे प्रश्नांवर चर्चा करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे सरकार आणि विरोधकांनी एकत्रित बसून नियमित अधिवेशन कसे घेता येईल यादृष्टीने नियमावली तयार करावी, असे निर्देश देत आगामी अधिवेशन हे नियमित स्वरूपाचे झाले पाहिजे, असे बजावले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले