शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेचे सभागृह रिते झाले

By admin | Updated: February 17, 2015 02:17 IST

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस दिवंगत प्रमोद महाजन २००४ सालच्या निवडणूक प्रचाराच्या काळात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा करताना म्हणाले होते की, राजकारणात विरोधक असतात...

संदीप प्रधान - मुंबईभाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस दिवंगत प्रमोद महाजन २००४ सालच्या निवडणूक प्रचाराच्या काळात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा करताना म्हणाले होते की, राजकारणात विरोधक असतात... विरोध करायचाच असतो... मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेत आमच्या गोपीनाथबरोबर विलासराव नसतील, आर. आर. पाटील नसतील तर तुम्हा पत्रकारांना तरी ते सभागृह कव्हर करायला मजा येईल का? दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ही भूमिका मांडणारे महाजन यांची लागलीच हत्या झाली तर विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे आणि आता आर. आर. पाटील यांनीही नियतीच्या आदेशावरून कायमचा सभात्याग केला आणि विधानसभेचे सभागृह रिते झाले...राज्यातील विधानसभा निवडणुकीकरिता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी त्या वेळी झडत होत्या. विलासरावांना निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदावरून दूर केले होते. त्या वेळी विलासरावांना लक्ष्य करण्याबाबत महाजन यांना विचारले असता त्यांनी त्यांच्या मनातील सत्ताधारी-विरोधक संघर्षाची भावना अशी मोकळेपणाने मांडली होती. त्यानंतर अल्पावधीत महाजन यांच्यावर त्यांचे बंधू प्रवीण यांनी गोळ्या झाडल्या. मृत्यूशी ११ दिवस झुंज दिल्यावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भाजपातील महाजन-मुंडे पर्व महाजन यांच्या निधनाने संपले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद सर्वाधिक काळ सांभाळण्याचे शरद पवार यांचे रेकॉर्ड विलासराव देशमुख यांनी मोडले. २००९च्या निवडणुकीपूर्वी देशमुख यांनी माणिकराव ठाकरे यांना प्रदेशाध्यक्षपदी आणले होते. मात्र अचानक २००८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आणि अगदी अखेरच्या क्षणी राम गोपाल वर्मा यांच्यासोबत ट्रायडंट हॉटेलला दिलेल्या भेटीमुळे देशमुखांचे पद गेले. देशमुख यांच्या कारकिर्दीला येथून उतरती कळा लागली. त्यांच्या प्रकृतीबाबत कुजबुज सुरू झाली. देखणे, रूबाबदार विलासराव कृष अवस्थेत पाहिल्यावर अनेकांना धक्का बसला. त्यानंतर त्यांचे निधन झाले. महाजन यांच्या पश्चात भाजपाने जवळपास एक तप संघर्ष केल्यावर केंद्रात भाजपाची सत्ता आली. गोपीनाथ मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रयत्नपूर्वक का होईना समावेश झाला. ग्रामविकासासारखे आवडीचे खाते मुंडे यांना मिळाले. परंतु दिल्लीत अचानक झालेल्या मोटार अपघातात मुंडे यांचे निधन झाले. आर. आर. पाटील यांचे नव्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर राष्ट्रवादीच्या वतीने एकमेव भाषण झाले. कालपर्यंत आम्ही सत्ताधारी होतो आज आम्ही विरोधात आहोत पण पाच वर्षांत आम्ही पुन्हा सत्ताधारी असू, असे ठणकावून सांगणारे आबा त्यांच्या काही साथीदारांबरोबर ‘सभात्याग’ करून निघून गेले... पुन्हा सत्ताधारी बाकावर बसण्याचा निर्धार मागे सोडून....