शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेचे सभागृह रिते झाले

By admin | Updated: February 17, 2015 02:17 IST

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस दिवंगत प्रमोद महाजन २००४ सालच्या निवडणूक प्रचाराच्या काळात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा करताना म्हणाले होते की, राजकारणात विरोधक असतात...

संदीप प्रधान - मुंबईभाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस दिवंगत प्रमोद महाजन २००४ सालच्या निवडणूक प्रचाराच्या काळात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा करताना म्हणाले होते की, राजकारणात विरोधक असतात... विरोध करायचाच असतो... मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेत आमच्या गोपीनाथबरोबर विलासराव नसतील, आर. आर. पाटील नसतील तर तुम्हा पत्रकारांना तरी ते सभागृह कव्हर करायला मजा येईल का? दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ही भूमिका मांडणारे महाजन यांची लागलीच हत्या झाली तर विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे आणि आता आर. आर. पाटील यांनीही नियतीच्या आदेशावरून कायमचा सभात्याग केला आणि विधानसभेचे सभागृह रिते झाले...राज्यातील विधानसभा निवडणुकीकरिता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी त्या वेळी झडत होत्या. विलासरावांना निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदावरून दूर केले होते. त्या वेळी विलासरावांना लक्ष्य करण्याबाबत महाजन यांना विचारले असता त्यांनी त्यांच्या मनातील सत्ताधारी-विरोधक संघर्षाची भावना अशी मोकळेपणाने मांडली होती. त्यानंतर अल्पावधीत महाजन यांच्यावर त्यांचे बंधू प्रवीण यांनी गोळ्या झाडल्या. मृत्यूशी ११ दिवस झुंज दिल्यावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भाजपातील महाजन-मुंडे पर्व महाजन यांच्या निधनाने संपले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद सर्वाधिक काळ सांभाळण्याचे शरद पवार यांचे रेकॉर्ड विलासराव देशमुख यांनी मोडले. २००९च्या निवडणुकीपूर्वी देशमुख यांनी माणिकराव ठाकरे यांना प्रदेशाध्यक्षपदी आणले होते. मात्र अचानक २००८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आणि अगदी अखेरच्या क्षणी राम गोपाल वर्मा यांच्यासोबत ट्रायडंट हॉटेलला दिलेल्या भेटीमुळे देशमुखांचे पद गेले. देशमुख यांच्या कारकिर्दीला येथून उतरती कळा लागली. त्यांच्या प्रकृतीबाबत कुजबुज सुरू झाली. देखणे, रूबाबदार विलासराव कृष अवस्थेत पाहिल्यावर अनेकांना धक्का बसला. त्यानंतर त्यांचे निधन झाले. महाजन यांच्या पश्चात भाजपाने जवळपास एक तप संघर्ष केल्यावर केंद्रात भाजपाची सत्ता आली. गोपीनाथ मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रयत्नपूर्वक का होईना समावेश झाला. ग्रामविकासासारखे आवडीचे खाते मुंडे यांना मिळाले. परंतु दिल्लीत अचानक झालेल्या मोटार अपघातात मुंडे यांचे निधन झाले. आर. आर. पाटील यांचे नव्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर राष्ट्रवादीच्या वतीने एकमेव भाषण झाले. कालपर्यंत आम्ही सत्ताधारी होतो आज आम्ही विरोधात आहोत पण पाच वर्षांत आम्ही पुन्हा सत्ताधारी असू, असे ठणकावून सांगणारे आबा त्यांच्या काही साथीदारांबरोबर ‘सभात्याग’ करून निघून गेले... पुन्हा सत्ताधारी बाकावर बसण्याचा निर्धार मागे सोडून....