शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकांची घोषणा तीन आठवड्यांनी; एकाच टप्प्यात मतदान शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 06:46 IST

जागावाटपावरून मात्र युतीमध्ये मतभेद अटळ

हरीश गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा तीन आठवड्यांत करण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने तयारी चालवली आहे. त्याआधी निवडणूक आयोगाने शिष्टमंडळ महाराष्ट्रात येईल आणि परिस्थितीची पाहणी करेल. महाराष्ट्रात एका टप्प्यातच सर्व मतदारसंघांत मतदान होईल, अशी शक्यता आहे.

निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, २२ आॅक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे आहे आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान ३१ दिवस आवश्यक असल्याने सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणुकांची घोषणा होईल आणि आचारसंहिता लागू होईल. राज्यात निवडणुकांसाठी सारेच राजकीय पक्ष तयारीला लागले असून, त्यांच्या आता जनसंपर्क यात्राही सुरू आहेत. शिवसेनेने तर भाजपकडून अधिकाधिक जागा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विधानसभेच्या २८८ पैकी निम्म्या जागा आपल्याला मिळाव्यात, असा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यावर २0१४ साली दोन्ही पक्षांनी जिंकलेल्या जागा आताही त्याच पक्षाकडे राहतील आणि उर्वरित जागांचे समान वाटप केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

गेल्या वेळी भाजपने १२२ व शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच १८५ जागांबाबत कोणताही वाद होणार नाही आणि उरलेल्या १0३ जागांवरच चर्चा होईल. त्यातील काही जागा लहान पक्षांना द्याव्याच लागतील. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला ११0 ते ११५ पेक्षा अधिक जागा येऊ च शकणार नाहीत.

लोकसभेच्या वेळी मित्रपक्ष टिकवून ठेवण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी राज्यांमधील जागावाटपातही लक्ष घातले होते. त्यामुळे रालोआला धक्का बसला नाही आणि भाजपलाही स्पष्ट बहुमत मिळाले. पण त्यावेळी मित्रपक्षांना बºयाच जागा सोडण्याची पाळी भाजपवर आली होती. पण विधानसभेच्या जागावाटपामध्ये भाजपचे केंद्रीय नेते सहभागी होणार नाहीत. भाजपच्या राज्य नेतृत्वानेच काय तो निर्णय घ्यावा, असे दिल्लीतील नेत्यांचे म्हणणे आहे.

मिळून ठरवणार फॉर्म्युलाजागावाटप कसे करायचे, हे भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनीच ठरवावे, असे गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या महिन्यातच ‘लोकमत’ला सांगितले होते. पण शिवसेनेचे प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अधिकाधिक जागांसाठी प्रयत्न आहे. पुढील मुख्यमंत्री ठरवण्यात सेनेची निर्णायक भूमिका असावी, अशी त्यांची इच्छा आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला आपण, फडणवीस व अमित शहा मिळून ठरवू, असे उद्धव यांनी म्हटले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना