शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

विधानसभा निवडणुकांची घोषणा तीन आठवड्यांनी; एकाच टप्प्यात मतदान शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 06:46 IST

जागावाटपावरून मात्र युतीमध्ये मतभेद अटळ

हरीश गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा तीन आठवड्यांत करण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने तयारी चालवली आहे. त्याआधी निवडणूक आयोगाने शिष्टमंडळ महाराष्ट्रात येईल आणि परिस्थितीची पाहणी करेल. महाराष्ट्रात एका टप्प्यातच सर्व मतदारसंघांत मतदान होईल, अशी शक्यता आहे.

निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, २२ आॅक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे आहे आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान ३१ दिवस आवश्यक असल्याने सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणुकांची घोषणा होईल आणि आचारसंहिता लागू होईल. राज्यात निवडणुकांसाठी सारेच राजकीय पक्ष तयारीला लागले असून, त्यांच्या आता जनसंपर्क यात्राही सुरू आहेत. शिवसेनेने तर भाजपकडून अधिकाधिक जागा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विधानसभेच्या २८८ पैकी निम्म्या जागा आपल्याला मिळाव्यात, असा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यावर २0१४ साली दोन्ही पक्षांनी जिंकलेल्या जागा आताही त्याच पक्षाकडे राहतील आणि उर्वरित जागांचे समान वाटप केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

गेल्या वेळी भाजपने १२२ व शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच १८५ जागांबाबत कोणताही वाद होणार नाही आणि उरलेल्या १0३ जागांवरच चर्चा होईल. त्यातील काही जागा लहान पक्षांना द्याव्याच लागतील. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला ११0 ते ११५ पेक्षा अधिक जागा येऊ च शकणार नाहीत.

लोकसभेच्या वेळी मित्रपक्ष टिकवून ठेवण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी राज्यांमधील जागावाटपातही लक्ष घातले होते. त्यामुळे रालोआला धक्का बसला नाही आणि भाजपलाही स्पष्ट बहुमत मिळाले. पण त्यावेळी मित्रपक्षांना बºयाच जागा सोडण्याची पाळी भाजपवर आली होती. पण विधानसभेच्या जागावाटपामध्ये भाजपचे केंद्रीय नेते सहभागी होणार नाहीत. भाजपच्या राज्य नेतृत्वानेच काय तो निर्णय घ्यावा, असे दिल्लीतील नेत्यांचे म्हणणे आहे.

मिळून ठरवणार फॉर्म्युलाजागावाटप कसे करायचे, हे भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनीच ठरवावे, असे गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या महिन्यातच ‘लोकमत’ला सांगितले होते. पण शिवसेनेचे प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अधिकाधिक जागांसाठी प्रयत्न आहे. पुढील मुख्यमंत्री ठरवण्यात सेनेची निर्णायक भूमिका असावी, अशी त्यांची इच्छा आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला आपण, फडणवीस व अमित शहा मिळून ठरवू, असे उद्धव यांनी म्हटले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना