शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
5
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
6
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
7
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
8
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
9
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
10
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
11
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
12
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
15
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
16
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
17
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
18
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
19
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
20
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?

Assembly Election Results 2019: चावडी-पारावर रंगू लागल्या निकालाच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 12:03 IST

सर्वच उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना आपलाच विजय होईल अशी खात्री वाटत आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीची मतदान प्रकिया सोमवारी पार पडली. राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान करण्यात आले. मात्र आता संपूर्ण राज्याचे लक्ष गुरवारी ( ता.24 ) रोजीच्या निकालाकडे लागले आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील चावडी आणि पारावर सुद्धा आपल्या मतदारसंघातून कोण निवडून येणार याची चर्चा रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानावेळी शहरापेक्षा ग्रामीण भागातून मतदानाचा उत्साहा हा जास्त पहावयास मिळाला आहे. त्यामुळे लोकांमध्ये निकाला बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. कोणत्या मतदान केंद्रावर किंवा गावात किती टक्के मतदान झाले याची आकडेवारी येताच आकड्यांची जुळवाजुळव सुरु झाली आहे.

ग्रामीण भागात निकाला विषयी गावातील कट्यावर,पारावर आणि चावडीवर आपल्या मतदारसंघातून नेमके कोण निवडणून येणार याची चर्चा रंगत आहे. कुठे परिवर्तनाच्या तर कुठे विकासाच्या नावाने गप्पा रंगत आहे. तर काही ठिकाणी मतदारसंघातील जातीचे समीकरणांची आकडेमोड सुरु झाली आहे. तर गावा-गावातील झालेल्या मतदानाच्या टक्केवारीची आकड्यांचा अंदाज बांधला जात आहे.

सर्वच उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना आपलाच विजय होईल अशी खात्री वाटत आहे. तर काही ठिकाणी विजयाच्या जल्लोषाची तयारी सुद्धा करण्यात येत आहे. परंतु कोण ठरणार किंगमेकर हे निकालानंतर ठरणार आहे. मात्र असे असले तरीही विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल लागेपर्यंत कार्यकर्त्यांमधील दावे-प्रतिदावे सुरुचं राहणार.