शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

Assembly Election Results 2019: चावडी-पारावर रंगू लागल्या निकालाच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 12:03 IST

सर्वच उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना आपलाच विजय होईल अशी खात्री वाटत आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीची मतदान प्रकिया सोमवारी पार पडली. राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान करण्यात आले. मात्र आता संपूर्ण राज्याचे लक्ष गुरवारी ( ता.24 ) रोजीच्या निकालाकडे लागले आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील चावडी आणि पारावर सुद्धा आपल्या मतदारसंघातून कोण निवडून येणार याची चर्चा रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानावेळी शहरापेक्षा ग्रामीण भागातून मतदानाचा उत्साहा हा जास्त पहावयास मिळाला आहे. त्यामुळे लोकांमध्ये निकाला बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. कोणत्या मतदान केंद्रावर किंवा गावात किती टक्के मतदान झाले याची आकडेवारी येताच आकड्यांची जुळवाजुळव सुरु झाली आहे.

ग्रामीण भागात निकाला विषयी गावातील कट्यावर,पारावर आणि चावडीवर आपल्या मतदारसंघातून नेमके कोण निवडणून येणार याची चर्चा रंगत आहे. कुठे परिवर्तनाच्या तर कुठे विकासाच्या नावाने गप्पा रंगत आहे. तर काही ठिकाणी मतदारसंघातील जातीचे समीकरणांची आकडेमोड सुरु झाली आहे. तर गावा-गावातील झालेल्या मतदानाच्या टक्केवारीची आकड्यांचा अंदाज बांधला जात आहे.

सर्वच उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना आपलाच विजय होईल अशी खात्री वाटत आहे. तर काही ठिकाणी विजयाच्या जल्लोषाची तयारी सुद्धा करण्यात येत आहे. परंतु कोण ठरणार किंगमेकर हे निकालानंतर ठरणार आहे. मात्र असे असले तरीही विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल लागेपर्यंत कार्यकर्त्यांमधील दावे-प्रतिदावे सुरुचं राहणार.