शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

"तुमचं तुम्ही लढा"; रामदास कदमांच्या वक्तव्यावर भाजप म्हणतं, "आम्हाला युतीची गरज हा गैरसमज"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 14:14 IST

मंत्री रवींद्र चव्हाण कुचकामी असल्याचे म्हणत त्यांचा राजीनामा घ्यायला हवा अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला.

Ramdas Kadam On Mahayuti : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना महायुतीमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. विधानसभेसाठी सर्वच पक्ष रणनिती आखत असताना महायुतीच्या नेत्यांमध्ये हमरातुमरी सुरु झालीय.  शिवसेनेचे माजी आमदार रामदास कदम आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात गोवा मुंबई हायवेवरुन वाद सुरु असताना महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. राक्षसी महत्त्वाकांक्षा असेल तर युती तोडावी. तुमचं तुम्ही लढा आमचं आम्ही लढतो. प्रत्येक मतदारसंघावर दावा सांगितला जात आहे, असं म्हणत रामदास कदम यांनी भाजपवर निशाणा साधला. तर त्याला प्रत्युत्तर देताना भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी भाजपला युतीची गरज आहे हा गैरसमज असल्याचे म्हटलं आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरुन रामदास कदम यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली. रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री असून त्यांना आवर घाला, ते युती तोडण्याचं काम करतायेत असा आरोप शिवसेना नेते रामदास कदमांनी केला. तसेच युतीमध्ये तुमच्या राक्षसी महत्वाकांक्षा असतील तर युती तोडून स्वतंत्र लढा असे रामदास कदम यांनी झी २४ तास सोबत बोलताना म्हटलं. आता यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी रामदास कदमांना प्रत्युत्तर दिलं आहे.

"रामदास कदम यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याने अपरिपक्व वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्यांचे काहीही म्हणणं असेल ते त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना चार भितींच्या आत सांगून त्यावर मार्ग काढावा. पण रामदास कदम यांचा स्वभाव अशाप्रकारची खळबळजनक वक्तव्ये करायची आणि वाद निर्माण करायचा असा आहे. तुम्ही बोललात तर आम्हालाही बोलता येतं. रवींद्र चव्हाणांच्या बाबतीत आधी तुम्ही वक्तव्ये केलीत. महायुतीत धर्म पाळायला हवा. तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करायची. रायगड रत्नागिरी आमचं सांगता. मग भाजपच्या कार्यकर्त्यांची पण अस्वस्थता समजून घ्या. ठाण्यात तीन आमदार आमचे आहेत. नरेश म्हस्केंना, रवींद्र वायकरांना खासदार आमच्या लोकांनी केले. तुम्हाला नाशिक, डोंबिवलीची जागा दिली. उणीदुणी काढलीत तर आमचीही तयारी आहे. युतीची गरज सगळ्यांना आहे. उद्या आमच्या बाजूनीही बोलतील. रामदास कदमांनी चांगल्या वातावरणात मिठाचा खडा टाकू नये. भाजपला युतीची गरज आहे अशा भ्रमात ते असतील तर तो त्यांचा गोडगैरसमज आहे," असं प्रवीण दरेकर म्हणाले.

आम्ही सहन करायला बसलेलो नाही - प्रवीण दरेकर

"रामदास कदम यांची वैयक्तिक कारणातून आलेली खदखद आहे. रामदास कदम यांचा मुलगा ज्या ठिकाणी आमदार आहे त्याठिकाणी  भाजप नसेल तर निवडूण येणे अवघड होणार आहे. रामदास कदमांच्या मुलाला मंत्री व्हायचं होतं. मुलगा मंत्री न झाल्याने ते बैचेन आहेत. त्यामुळे ते वैफल्यातून खदखद बाहेर येत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांचा संयम आहे याला तुम्ही आमचा दुबळेपणा समजू नका. भाजप राष्ट्रीय पक्ष आहे. सारख्या हुलकावण्या मारणार असाल तर आम्ही सहन करायला बसलेलो नाही," असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाRamdas Kadamरामदास कदमEknath Shindeएकनाथ शिंदेpravin darekarप्रवीण दरेकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा