शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

विधानसभा निवडणूक : सत्ताधारी चुस्त, विरोधक सुस्त !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 16:37 IST

भाजप-शिवसेनेप्रमाणे यात्रा सोडाच अद्याप वंचित, मनसेला सोबत घेण्यावर देखील काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये निर्णय झाला नाही. तर वंचितने विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणे सुरू केले आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील प्रचंड यशानंतर सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना पक्षांकडून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. उभय पक्षांनी सुरुवातीला विरोधी पक्षातील आमदारांना आपल्या पक्षात घेण्यावर भर दिला होता. याचा लाभही झाला. त्यानुसार भाजपच्या हाताला काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील लागले तर शिवसेनेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर मिळाले. दोघांना मंत्रीही करण्यात आले. आता शिवसेना-भाजपने जनतेत जावून आपले निवडणूक आभियान सुरू केले आहे. परंतु, विरोधीपक्ष या बाबतीत अजुनही उदासीन असून केवळ बैठकांवरच आघाडीत भर देण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रा काढली. पहिल्या टप्प्यात आदित्य यांनी उत्तर महाराष्ट्रातील युवकांशी, शेतकऱ्यांशी संवाद साधला. याच दौऱ्यात शिवसेनेकडून आदित्य यांना मुख्यमंत्रीपदासाठी प्रोजेक्ट करण्यात येत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीच याविषयी खुलासा केला असून सत्ता आल्यास आदित्यच मुख्यमंत्री होतील, असंही त्यांनी म्हटले. तर, आदित्य यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेंडू जनतेच्या कोर्टात फेकला. परंतु, त्यांच्या यात्रेमुळे शिवसेनेला संघटन मजबूत करण्यास फायदाच होणार हे नक्की.

शिवसेनेची जन आशीर्वाद यात्रा सुरू असतानाच भाजपने देखील जन संवादासाठी योजना आखली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तब्बल एक महिना जनतेत जाणार आहेत. ऑगस्ट महिन्यात ते दौऱ्यावरच राहणार आहे. १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट अशी त्यांच्या यात्रेची रुपरेषा आहे. यामध्ये भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन आहे. या यात्रेला 'महाजनादेश' असं नाव देण्यात आले आहे. केवळ मुख्यमंत्रीच नव्हे तर भाजप प्रदेशाध्यक्ष देखील जनादेश यात्रा काढणार आहे. या यात्रेत ३० जिल्हे, २५ दिवस, ४ हजारहून अधिक अंतर, १५२ विधानसभा मतदार संघ, १०४ जाहीर सभा, २२८ स्वागत सभा आणि २० पत्रकार परिषदांचे नियोजन करण्यात आले.

सत्ताधारी पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चुस्ती दाखवली असली तरी विरोधी पक्ष अजुनही सुस्तावलेलच दिसत आहे. भाजप-शिवसेनेप्रमाणे यात्रा सोडाच अद्याप वंचित, मनसेला सोबत घेण्यावर देखील काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये निर्णय झाला नाही. तर वंचितने विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणे सुरू केले आहे. आघाडीकडून सध्या केवळ बैठकांवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे आघाडीचे पदाधिकारी तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक असताना देखील संभ्रमात आहेत.