शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Assembly Election 2019: निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 15:49 IST

मराठवाडा-कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने, खरिपिच्या काढणीस आलेल्या पिकांचे भिजून मोठे नुकसान झाले.

- मोसीन शेख 

मुंबई : गेल्या महिन्याभरापासून राज्यात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येण्यास काही तासांचा वेळ शिल्लक राहिला आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाकडे निवडणुकीच्या या धामधूमीत प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेला प्रचारानंतर आता एक्झिट पोल, ईव्हीएम, युती,आघाडी तसेच सरकार कुणाचे येणार याची चर्चा मोठ्याप्रमाणावर सूर आहे. माध्यमात सुद्धा सतत याच मुद्द्यावरून चर्चा केली जात आहे. तर राजकीय पक्ष आणि नेते निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त झाले आहेत तर प्रशासकीय यंत्रणाही निवडणुकीच्या तयारीमध्ये गुंतली आहे. त्यामुळे राज्यात अनेक भागात पावसामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानिकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे पहावयास मिळत आहे.

मराठवाडा-कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने, खरिपिच्या काढणीस आलेल्या पिकांचे भिजून मोठे नुकसान झाले. काढून ठेवलेली सोयाबीन,भात, कापूस,ज्वारी पिके पाण्यात गेल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी सोयाबीन काढणी सुरु आहे. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना आता शेतातील सोयाबीन काढणे अवघड झाले आहे.

पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना विधानसभा निवडणुकीच्या धामधूम सुरु असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडले आहेत. तर याच निवडणुकीच्या कामात प्रशासकीय अधिकरी गुंतले असल्याने, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कुणीच पुढाकर घेत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा करणे, शेतकऱ्यांच्या हाती असल्याचे दिसून येत आहे.