शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Assembly Election 2019: निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 15:49 IST

मराठवाडा-कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने, खरिपिच्या काढणीस आलेल्या पिकांचे भिजून मोठे नुकसान झाले.

- मोसीन शेख 

मुंबई : गेल्या महिन्याभरापासून राज्यात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येण्यास काही तासांचा वेळ शिल्लक राहिला आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाकडे निवडणुकीच्या या धामधूमीत प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेला प्रचारानंतर आता एक्झिट पोल, ईव्हीएम, युती,आघाडी तसेच सरकार कुणाचे येणार याची चर्चा मोठ्याप्रमाणावर सूर आहे. माध्यमात सुद्धा सतत याच मुद्द्यावरून चर्चा केली जात आहे. तर राजकीय पक्ष आणि नेते निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त झाले आहेत तर प्रशासकीय यंत्रणाही निवडणुकीच्या तयारीमध्ये गुंतली आहे. त्यामुळे राज्यात अनेक भागात पावसामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानिकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे पहावयास मिळत आहे.

मराठवाडा-कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने, खरिपिच्या काढणीस आलेल्या पिकांचे भिजून मोठे नुकसान झाले. काढून ठेवलेली सोयाबीन,भात, कापूस,ज्वारी पिके पाण्यात गेल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी सोयाबीन काढणी सुरु आहे. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना आता शेतातील सोयाबीन काढणे अवघड झाले आहे.

पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना विधानसभा निवडणुकीच्या धामधूम सुरु असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडले आहेत. तर याच निवडणुकीच्या कामात प्रशासकीय अधिकरी गुंतले असल्याने, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कुणीच पुढाकर घेत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा करणे, शेतकऱ्यांच्या हाती असल्याचे दिसून येत आहे.