शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेपूर्वी केंद्राने विदर्भासाठी ठोस निर्णय घ्यावा

By admin | Updated: June 18, 2014 01:28 IST

तेलंगणा राज्य निर्मितीमुळे विदर्भाची अपेक्षा वाढली आहे तर भाजपा केंद्रात सत्तेत आल्याने विदर्भवासीयांचा आत्मविश्वासही वाढला आहे. कारण भाजपाने भुवनेश्वर येथे विदर्भ राज्याच्या मागणीचा ठराव केला होता.

जनमंचची मागणी : लढा विदर्भाचानागपूर : तेलंगणा राज्य निर्मितीमुळे विदर्भाची अपेक्षा वाढली आहे तर भाजपा केंद्रात सत्तेत आल्याने विदर्भवासीयांचा आत्मविश्वासही वाढला आहे. कारण भाजपाने भुवनेश्वर येथे विदर्भ राज्याच्या मागणीचा ठराव केला होता. मात्र सत्ता आल्यानंतर भाजप नेत्यांची भाषा बदलत आहे. शिवसेनेला समोर करून मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. नेत्यांचा डाव जनमंचने ओळखला असून, विदर्भाच्या बाबतीत केंद्र सरकारने विधानसभेपूर्वी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी जनमंचद्वारे करण्यात आली आहे. सरकारवर दबाव वाढविण्यासाठी जनमंचतर्फे विदर्भभर जनजागृती अभियान राबविणार असल्याचा इशारा जनमंचचे मार्गदर्शक चंद्रकांत वानखेडे यांनी पत्रपरिषदेत दिला. विदर्भाची मागणी १०० वर्षापूर्वीची आहे. जनमंचद्वारे घेण्यात आलेल्या सार्वमतात विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी प्रचंड बहुमताने कौल मिळाला. निवडणुकीपूर्वी विदर्भातील सर्व उमेदवारांकडून लेखी हमीपत्रही घेतले होते. मात्र नुकतेच केंद्रीय भूपृष्ठ व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भ राज्यासाठी दोनतृतीयांश बहुमताची गरज असल्याचे म्हटले होते. यापूर्वी केंद्रात भाजपाची सत्ता असताना, मागणी नसतानाही तीन राज्याची निर्मिती केली होती. तेव्हा बहुमताची गरज नव्हती का, असा सवाल जनमंचने केला आहे. सत्ताधारी नेत्यांची भाषा बदलत आहे. शिवसेनेला समोर करून ठोस भूमिका घेतांना दिसत नाही. नेत्यांच्या आश्वासनांवर विश्वास राहिला नाही. त्यामुळे विधानसभेपूर्वी केंद्राकडून ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे. अन्यथा विदर्भाची मागणी पुन्हा रखडेल. जनमंचने सरकारवर दबाव बनविण्यासाठी जनजागृती कार्यक्रम आखला आहे. जनतेमध्ये जाऊन लोकांना संघटित करणे, आवश्यकता भासल्यास त्यांच्या संघटित शक्तीचे आंदोलनाच्या माध्यमातून प्रगटीकरण करणे, असा कार्यक्रम जनमंच राबविणार आहे. आंदोलनाला समाजाच्या सर्व स्तरातून व्यापक पाठिंबा मिळावा या हेतूने जनमंचने लेखक, कलावंत, वकील, प्राध्यापक या वर्गालासुद्धा लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विदर्भातील अकराही जिल्ह्यात कार्यकर्ता बैठका, पथनाट्य, लघुचित्रपट, माहिती पुस्तिकेचे वितरण जनमंच करणार आहे. पत्रपरिषदेला जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, प्रकाश इटनकर, प्रमोद पांडे, रामभाऊ आखरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)