शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
3
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
4
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
5
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
6
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
7
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
8
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
9
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
10
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
11
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
12
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
13
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
14
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
15
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
16
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
17
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
18
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
19
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
20
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी अशोक चव्हाण कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 10:29 IST

तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलने घातक ठरू शकते. त्यामुळे अशोक चव्हाणच प्रदेशाध्यक्षपदी राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. अद्याप तो राजीनामा मंजुर झाला नसला तरी राहुल यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत हा निर्णय घेतला. त्यानंतर देशभरातील काँग्रेस पदाधिकारी राहुल यांच्या पाठिशी ताकत उभी करण्यासाठी राजीनामे देत आहे. महाराष्ट्रात देखील प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिला होता. परंतु, त्यांचा राजीनामा पक्ष नेतृत्वाने स्वीकारला नसून ते अध्यक्षपदी कायम राहणार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी घेत, पक्षश्रेष्ठींकडे पदाचा राजीनामा सोपविला होता. परंतु, पक्ष नेतृत्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस नेतृत्वात बदल करण्याच्या विचारात नाही. महाराष्ट्र ऑक्टोबरमध्ये विधानसभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेत आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. या बैठकीत महाराष्ट्रातील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांसोबत जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्याच्या सूचना अशोक चव्हाण यांना करण्यात आल्या. यावरून काँग्रेस नेतृत्व राज्यातील काँग्रेस संघटनेत बदल करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट होते, असं काँग्रेसच्या माजी मंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान अशोक चव्हाण यांना राज्यातील राजकीय स्थिती चांगल्या पद्धतीने माहित आहे. मागील दोन वर्षांपासून ते प्रदेशाध्यक्षपदी आहेत. या पदावर नवीन व्यक्तीला नियुक्त केल्यास, तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे घातक ठरू शकते. त्यामुळे अशोक चव्हाणच प्रदेशाध्यक्षपदी राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.