शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

"विरोधकांचा प्रस्ताव म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा"; भाजपा आमदार आशिष शेलार यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 21:02 IST

महाविकास आघाडीच्या काळात काय घडलं याचा पाढा वाचत, 'तुम्ही आम्हाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न विचारु नये', असेही शेलार म्हणाले.

Ashish Shelar slams Mahavikas Aghadi: "शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करणार, सातबारा कोरा करणार, सरसकट कर्जमाफी करणार, अशा घोषणा करणाऱ्या तत्कालीन आघाडी सरकारने आपल्या काळात काय केले? याचे उत्तर आधी द्यावे, मगच आम्हाला प्रश्न विचारावे. आज महायुती सरकारवर जे विरोधक बोलत आहेत, त्यांनी आणलेला प्रस्ताव म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत", असा पलटवार मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केला. विरोधी पक्षाने विधानसभेत आज 293 नुसार राज्यातील विविध प्रश्नांवर युती सरकारला जाब विचारणारा प्रस्ताव मांडून चर्चा उपस्थित केली होती. त्याला शेलारांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.

"हा प्रस्ताव म्हणजे आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे. हा प्रस्ताव म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. पत्रकार निखिल वागळे आणि विश्वंभर चौधरी यांच्यावर झालेला हल्ल्याचा विषय काढून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कोण विचारतेय? ज्यांनी पत्रकार राहुल कुलकर्णी याने ठाकरे सरकार विरोधात बातमी दिली म्हणून त्याला कोरोना काळात फरफटत वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये आणले ते आज आम्हाला प्रश्न विचारत आहेत?  निखिल वागळे यांच्या बाबतीत जे घडले त्याची तक्रार दाखल झाली आहे पोलीस पुढील कारवाई करतील. पण एक निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला घरात घुसून डोळा  फोडला, केतकी चितळे हिच्यावर कुणाच्या सांगण्यावरुन गुन्हा दाखल झाला? त्यामुळे तुम्ही आम्हाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न विचारु नये. मुंबईत ज्यांनी बिल्डरांना 12 हजार कोटी रुपयांची प्रिमियम माफी दिली त्यामुळे एकाचवेळी मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु झाली तेच उबाठा आज मुंबईत प्रदुषण वाढले म्हणून बोंबाबोंब करीत आहेत", अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

आमदार  प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात प्रधानमंत्री कौनसी माँ की चिंता करते है, असा प्रश्न केला. त्याला उत्तर देताना आशिष शेलार म्हणाले की, देशामध्ये ७ कोटी अशा माता होत्या, ज्यांच्या डोळ्यांतून चुलीवर जेवण केल्याने अश्रू येत होते, त्या मातांना उज्ज्वला योजनेचा लाभ मा. पंतप्रधानांनी पोहचवला. १२ कोटी अशा माता आहेत ज्यांना शौचालयासाठी उघड्यावर जावे लागत होते, त्या माता भगिनींच्या घरात शौचालय बांधले. गरीब माता भगिनींना ६० वर्ष सत्तेत असलेलं काँग्रेस सरकार बँकेमध्ये प्रवेश, साधं चेकबुक देऊ शकलं नाही. यांच्या सरकारमध्ये फक्त ११ कोटी मातांचे बँक अकाऊंट होते, पण फक्त २०१४ ते २०१९ या काळात ३५ कोटी मातांचे जनधन खाते बनले आहे. माझ्या मातांच्या घरापर्यंत जल-नल योजनेद्वारे  पिण्याच्या पाण्याचे नळ पोहचले आहेत. ३२ कोटी आमच्या मातांचा विमा काढून प्रिमीयमचे हफ्ते न भरता त्यांना फायदा मिळतोय. आमच्या गावातील प्रत्येक मातेपर्यंत डिजीटल इंडियाचे नेटवर्क पोहचवले जाते. त्यामुळे कोणी आमची माता काढू नये. स्वतःची आई गेल्यावर तिचा अंत्यविधी केल्यानंतर एका तासामध्ये जो मनुष्य देशाच्या कामासाठी लागतो, त्यांच्या माता काढणे आपल्याला शोभनीय नाही, असे जोरदार उत्तर त्यांनी विरोधकांना दिले.

कोकणातील आंबा काजु उत्पादकांवर अन्याय का?

सरकार कोणतेही असो कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्याला नुकसान भरपाई देताना अन्यायच का होतो? असा थेट सवाल शेलार यांनी केला. राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना सरकारने मदत केली पाहिजे दुजाभाव करण्याची गरज नाही. पण कुठलेही सरकार असले तरी आमच्या कोकणातील शेतकऱ्यांवर अन्यायच होतो. नैसर्गिक आपत्ती, रोग राई, आंब्याचे नुकसान झालेल्या आमच्या कोकणातील बागायतदारांना, विशेषतः आंबा व काजू बागायतदारांना नुकसान भरपाई मिळत नाही. कोकणातील १० वर्षांचा रिव्ह्यू घ्यावा आणि त्यानंतक कोकणातील बागायतदारांसाठी एक सर्वंकष योजना द्यावी अशी मागणी केली आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानसभेत विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर चर्चा करताना केली.

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2024Ashish Shelarआशीष शेलारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी