शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

"विरोधकांचा प्रस्ताव म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा"; भाजपा आमदार आशिष शेलार यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 21:02 IST

महाविकास आघाडीच्या काळात काय घडलं याचा पाढा वाचत, 'तुम्ही आम्हाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न विचारु नये', असेही शेलार म्हणाले.

Ashish Shelar slams Mahavikas Aghadi: "शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करणार, सातबारा कोरा करणार, सरसकट कर्जमाफी करणार, अशा घोषणा करणाऱ्या तत्कालीन आघाडी सरकारने आपल्या काळात काय केले? याचे उत्तर आधी द्यावे, मगच आम्हाला प्रश्न विचारावे. आज महायुती सरकारवर जे विरोधक बोलत आहेत, त्यांनी आणलेला प्रस्ताव म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत", असा पलटवार मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केला. विरोधी पक्षाने विधानसभेत आज 293 नुसार राज्यातील विविध प्रश्नांवर युती सरकारला जाब विचारणारा प्रस्ताव मांडून चर्चा उपस्थित केली होती. त्याला शेलारांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.

"हा प्रस्ताव म्हणजे आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे. हा प्रस्ताव म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. पत्रकार निखिल वागळे आणि विश्वंभर चौधरी यांच्यावर झालेला हल्ल्याचा विषय काढून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कोण विचारतेय? ज्यांनी पत्रकार राहुल कुलकर्णी याने ठाकरे सरकार विरोधात बातमी दिली म्हणून त्याला कोरोना काळात फरफटत वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये आणले ते आज आम्हाला प्रश्न विचारत आहेत?  निखिल वागळे यांच्या बाबतीत जे घडले त्याची तक्रार दाखल झाली आहे पोलीस पुढील कारवाई करतील. पण एक निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला घरात घुसून डोळा  फोडला, केतकी चितळे हिच्यावर कुणाच्या सांगण्यावरुन गुन्हा दाखल झाला? त्यामुळे तुम्ही आम्हाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न विचारु नये. मुंबईत ज्यांनी बिल्डरांना 12 हजार कोटी रुपयांची प्रिमियम माफी दिली त्यामुळे एकाचवेळी मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु झाली तेच उबाठा आज मुंबईत प्रदुषण वाढले म्हणून बोंबाबोंब करीत आहेत", अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

आमदार  प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात प्रधानमंत्री कौनसी माँ की चिंता करते है, असा प्रश्न केला. त्याला उत्तर देताना आशिष शेलार म्हणाले की, देशामध्ये ७ कोटी अशा माता होत्या, ज्यांच्या डोळ्यांतून चुलीवर जेवण केल्याने अश्रू येत होते, त्या मातांना उज्ज्वला योजनेचा लाभ मा. पंतप्रधानांनी पोहचवला. १२ कोटी अशा माता आहेत ज्यांना शौचालयासाठी उघड्यावर जावे लागत होते, त्या माता भगिनींच्या घरात शौचालय बांधले. गरीब माता भगिनींना ६० वर्ष सत्तेत असलेलं काँग्रेस सरकार बँकेमध्ये प्रवेश, साधं चेकबुक देऊ शकलं नाही. यांच्या सरकारमध्ये फक्त ११ कोटी मातांचे बँक अकाऊंट होते, पण फक्त २०१४ ते २०१९ या काळात ३५ कोटी मातांचे जनधन खाते बनले आहे. माझ्या मातांच्या घरापर्यंत जल-नल योजनेद्वारे  पिण्याच्या पाण्याचे नळ पोहचले आहेत. ३२ कोटी आमच्या मातांचा विमा काढून प्रिमीयमचे हफ्ते न भरता त्यांना फायदा मिळतोय. आमच्या गावातील प्रत्येक मातेपर्यंत डिजीटल इंडियाचे नेटवर्क पोहचवले जाते. त्यामुळे कोणी आमची माता काढू नये. स्वतःची आई गेल्यावर तिचा अंत्यविधी केल्यानंतर एका तासामध्ये जो मनुष्य देशाच्या कामासाठी लागतो, त्यांच्या माता काढणे आपल्याला शोभनीय नाही, असे जोरदार उत्तर त्यांनी विरोधकांना दिले.

कोकणातील आंबा काजु उत्पादकांवर अन्याय का?

सरकार कोणतेही असो कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्याला नुकसान भरपाई देताना अन्यायच का होतो? असा थेट सवाल शेलार यांनी केला. राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना सरकारने मदत केली पाहिजे दुजाभाव करण्याची गरज नाही. पण कुठलेही सरकार असले तरी आमच्या कोकणातील शेतकऱ्यांवर अन्यायच होतो. नैसर्गिक आपत्ती, रोग राई, आंब्याचे नुकसान झालेल्या आमच्या कोकणातील बागायतदारांना, विशेषतः आंबा व काजू बागायतदारांना नुकसान भरपाई मिळत नाही. कोकणातील १० वर्षांचा रिव्ह्यू घ्यावा आणि त्यानंतक कोकणातील बागायतदारांसाठी एक सर्वंकष योजना द्यावी अशी मागणी केली आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानसभेत विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर चर्चा करताना केली.

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2024Ashish Shelarआशीष शेलारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी