शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांविरुद्ध काँग्रेसचा 'पटोले पॅटर्न'; 'या' नेत्याला दिली उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 15:50 IST

लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी गडकरींविरुद्ध लढा दिला होता. गडकरी आणि पटोले यांचे संबंध चांगले होते. त्याचप्रमाणे आशिष देशमुख आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंधही मैत्रीपूर्ण आहे. परंतु, निवडणुकीच्या निमित्ताने दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकले आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - भाजपच्या प्रमुख नेत्याविरुद्ध तगडा उमेदवार देण्याचा पायंडा काँग्रेसमध्ये पडल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत एक अनोखा प्रयोग करत काँग्रेसकडून महाराष्ट्रातील भाजपचे वजनदार नेते नितीन गडकरी यांच्याविरुद्ध भाजपचेच बंडखोर खासदार नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध भाजपचे बंडखोर आमदार आशिष देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नागपूर नैऋत्य मतदार संघात मुख्यमंत्र्यांविरुद्ध पटोले पॅटर्न राबविला जातोय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

2014 मध्ये आशिष देशमुख भाजपकडून निवडून आले होते. परंतु, वेगळा विदर्भ आणि शेतकरी समस्या यावरून देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांवरच टीका केली होती. त्यानंतर त्यांनी भाजप सोडून काँग्रेसचा हात धरला होता. देशमुख यांचे घराणे मुळाचे काँग्रेसी. वडिल रणजीत देशमुख काँग्रेसमध्ये मंत्री होती. तर 2014 मध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना टक्कर दिली होती. तर आशिष देशमुख 2014 मध्ये भाजपकडून लढले होते. मात्र ते भाजपमध्ये जास्त काळ रमले नाही.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दिल्लीतीन नेत्यांनीच आशिष देशमुख यांना मुख्यमंत्र्यांविरोधात उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भात तरी मुख्यमंत्र्यांना टक्कर देऊ शकेल, असा नेता काँग्रेसमध्ये नसल्याची भावना पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे नागपूर नैऋत्यमधील लढत राज्यासाठी चर्चेचा विषय होणार आहे.

दरम्यान भाजपच्या तगड्या उमेदवाराला त्यांच्याच बंडखोरांकडून प्रत्युत्तर देण्याचा पॅटर्न काँग्रेसने गडकरी यांच्याविरुद्ध राबवला होता. आता तोच पॅटर्न मुख्यमंत्र्यांविरुद्ध वापरला जातोय. लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी गडकरींविरुद्ध लढा दिला होता. परंतु, त्यांना पराभव पत्करावा लागला . आता भाजपचे बंडखोर आमदार आशिष देशमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देत आहे. मात्र काँग्रसच्या या पटोले पॅटर्नला कितपत यश येईल, हे येणारा काळच सांगणार आहे.