शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

“मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा, सरसकट दिले नाही तरी...”; ओवेसींची ठाकरे सरकारकडे मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 18:56 IST

ठाकरे सरकारने हिवाळी अधिवेशनात मुस्लिम आरक्षणाचा कायदा मंजूर करावा, अशी मागणी असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.

औरंगाबाद: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर अनेकविध मुद्द्यांवरून टीका करण्यात येत आहे. यातच आता एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. उच्च न्यायालयाने ज्या ५० जातींना आरक्षण देता येते, असे म्हटले आहे, त्यांना तरी आरक्षण द्या, अशी मागणी ओवेसी यांनी केली आहे. 

राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात मुस्लिम आरक्षणाचा कायदा मंजूर करावा. मुस्लिम समाजातील ५२ जातींचे मागासलेपण उच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे. असे असताना मुस्लिमांना अद्याप आरक्षण देण्यात आले नाही. हा मुद्दा घेऊन मुसलमान समाज डिसेंबर महिन्यात मुंबईला धडकणार आहे, असा इशारा ओवेसी यांनी दिला. 

मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे

मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. सगळ्या मुस्लिमांना आरक्षण देऊ नका. मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या निकालात महाराष्ट्रातील ५० जातींना शिक्षणात आरक्षण देता येते असे म्हटले आहे. कारण या जातींच्या सामाजिक राजकीय मागसपणाची आकडेवारी आणि माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे यानंतरही या जातींना शिक्षणात आरक्षण न देणे हा अन्याय आहे, अशी टीका ओवेसी यांनी केली आहे. 

महाराष्ट्रातील मुस्लिमांना आरक्षण मिळाले पाहिजे

सरकारला आणखी कुणाला द्यायचे असेल तर त्यांनी द्यावे. मुस्लिमांचे सामाजिक, शैक्षणिक मागासपण सिद्ध झाले आहे. उच्च न्यायालयाने ते मान्य केले आहे. तरीही सरकार मुस्लिमांना आरक्षण देत नाही. यानंतर आमच्याकडे बोट करून आम्ही धार्मिक असल्याचे म्हणतात. हा अन्याय दूर झाला पाहिजे आणि महाराष्ट्रातील मुस्लिमांना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी ओवेसी यांनी केली आहे. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे