शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

प्रदेशाध्यक्ष ठरवाच, तोवर समिती नेमा; सामूहिक निर्णय प्रक्रियेवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2023 14:26 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांची अहवालात शिफारस

सुनील चावके, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेतृत्व बदलण्याचा विचार करेपर्यंत प्रदेश काँग्रेसशी, मित्रपक्षांशी करावयाच्या आघाडीशी तसेच निवडणुकांशी संबंधित सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष तसेच पक्षाच्या विधिमंडळातील गटनेत्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करावी, अशी शिफारस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी आपल्या अहवालात केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती राहुल गांधी यांनी केली आहे. त्यामुळे पटोले प्रदेशाध्यक्षपदी राहावे की नाही या मुद्याला चेन्निथला यांनी आपल्या अहवालात बगल दिली आहे पण पटोले यांच्या निर्णयांशी पक्षातले ज्येष्ठ नेते सहमत होत नसल्यामुळे प्रदेश काँग्रेसशी संबंधित सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांची एक समिती स्थापन करून सामूहिक निर्णय प्रणाली अंमलात आणावी, अशी शिफारस त्यांनी केली आहे. काँग्रेसश्रेष्ठींनी चेन्निथला यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक म्हणून नियुक्त करुन अहवाल सादर करण्यास सांगितले होते.

चेन्निथला यांच्या शिफारसीनुसार प्रस्तावित समितीत प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या व्यतिरिक्त सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील या नेत्यांचा समावेश होऊ शकेल.

काय आहे चेन्निथला यांच्या अहवालात?

  • लोकसभा निवडणुकीची उलटगणती सुरू झाली असतानाच प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून नाना पटोले यांना हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पटोले यांना हटविण्याच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली दरबारात त्यांचे विरोधक सतत धडकत असताना पटोलेसमर्थकही दिल्लीत सक्रिय झाले आहेत.
  • प्रदेशाध्यक्षपदी पटोले असावेत की नाही, या भानगडीत न पडता तो निर्णय काँग्रेसश्रेष्ठींनी घ्यावी, असे नमूद करून राज्यात काँग्रेस पक्षाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ व अनुभवी नेत्यांची समिती स्थापन करावी, असा मधला मार्ग सांगणारी शिफारस चेन्निथला यांनी आपल्या अहवालात केल्याची माहिती काँग्रेस सूत्रांनी दिली.
टॅग्स :congressकाँग्रेस