शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम पावसाचा फुसका बार !

By admin | Updated: August 3, 2015 01:42 IST

कृत्रिम पावसासाठी सकाळीच रॉकेटसह सज्ज असलेली यंत्रणा...पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसलेले हजारो शेतकरी....क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा.

येवला (नाशिक) : कृत्रिम पावसासाठी सकाळीच रॉकेटसह सज्ज असलेली यंत्रणा...पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसलेले हजारो शेतकरी....क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा....ढगांच्या स्थितीचा दर तासाला तंत्रज्ञांकडून घेतला जाणारा आढावा...असा खेळ तालुक्यातील सायगाव येथे दिवसभर सुरू होता. मात्र ढगांच्या लपंडावामुळे नवी मुंबईतील एका संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचा बार रविवारी फुसका ठरला. अपेक्षित मेघांच्या अभावामुळे आर्द्रता ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने रॉकेट आकाशात उडालेच नाही. त्यामुळे साहजिकच पाऊस पडेल या अपेक्षेने आलेले शेतकरी जड पावलांनी निराश होऊन माघारी फिरले.ऐन पावसाळ््यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणाऱ्या येवला तालुक्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी नवी मुंबईच्या इंटरनॅशनल स्कूल आॅफ प्रोफेशनल स्टडीज संस्थेने दाखविली होती. तालुक्यातील सायगाव येथील आर्द्रता व ढगांचे प्रमाण अधिक असल्याच्या अभ्यासावरून या परिसराची निवड करण्यात आली होती. त्यानुसार सकाळी दहा वाजेपासूनच सायगाव येथे पथकाने यंत्रणा तयार ठेवली होती. आमदार छगन भुजबळ यांनीही सायगाव परिसराला भेट देऊन कृत्रिम पावसाच्या कृती कार्यक्रमाबाबत माहिती घेतली. कृत्रिम पाऊस पडेल, या कुतुहलापोटी सायगाव फाट्यावर परिसरातून सुमारे पाच हजार शेतकरी आले होते. गर्दीमुळे पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. २५ तंत्रज्ञांच्या पथकाने प्रत्येकी ७.५ किलो वजनाचे १० रॉकेट तसेच लॉन्चर स्टॅण्ड व सर्व यंत्रसामग्री सज्ज ठेवली होती. दहा वाजेनंतर दर तासाला पथकाकडून ढगांचा अभ्यास केला जात होता. आर्द्रता तपासली जात होती. मात्र ढगांचा लपंडाव सुरू असल्याने तंत्रज्ञांनी आकाशत रॉकेट सोडलेच नाही. आठ तास प्रतीक्षा करूनही अनुकूल ढगांची स्थिती निर्माण झाली नाही. अखेर संध्याकाळी सहा वाजता ‘आॅपरेशन’ थांबविण्यात आले. शेतकऱ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती, मात्र कृत्रिम पाऊस पडलाच नाही. सिंधुदुर्ग व सांगली जिल्ह्यात यापूर्वी कृत्रिम पावसाचा यशस्वी प्रयोग केल्याची माहिती संस्थेचे प्रमुख अब्दुल रहेमान वान्नो यांनी ‘लोकमत’ला दिली. ७० टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता व मेघांनी गर्दी केल्यावर मोटारच्या सहाय्याने ४ ते ५ किमी उंचीपर्यंत रॉकेट उडविले जाते. रॉकेट इप्सित स्थळापर्यंत पोहचल्यानंतर एका लॉन्चसाठी ४५ ग्रॅम सिल्व्हर आयोडाईडचे कण ढगात विखुरले जातात व ढगातील तपमान कमी होऊन बाष्पाचे जलकणात रूपांतर होते आणि साधारण ४० ते ४५ मिनिटांनी पाऊस पडतो, असे अब्दुल वान्नो यांनी सांगितले. दरम्यान दिवसभर कृत्रिम पावसासाठी आवश्यक वातावरण निर्मिती झाली नाही. परिणामी संस्थेला हा प्रयोग आवरता घ्यावा लागला. (प्रतिनिधी)