शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम पावसाचा फुसका बार !

By admin | Updated: August 3, 2015 01:42 IST

कृत्रिम पावसासाठी सकाळीच रॉकेटसह सज्ज असलेली यंत्रणा...पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसलेले हजारो शेतकरी....क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा.

येवला (नाशिक) : कृत्रिम पावसासाठी सकाळीच रॉकेटसह सज्ज असलेली यंत्रणा...पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसलेले हजारो शेतकरी....क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा....ढगांच्या स्थितीचा दर तासाला तंत्रज्ञांकडून घेतला जाणारा आढावा...असा खेळ तालुक्यातील सायगाव येथे दिवसभर सुरू होता. मात्र ढगांच्या लपंडावामुळे नवी मुंबईतील एका संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचा बार रविवारी फुसका ठरला. अपेक्षित मेघांच्या अभावामुळे आर्द्रता ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने रॉकेट आकाशात उडालेच नाही. त्यामुळे साहजिकच पाऊस पडेल या अपेक्षेने आलेले शेतकरी जड पावलांनी निराश होऊन माघारी फिरले.ऐन पावसाळ््यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणाऱ्या येवला तालुक्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी नवी मुंबईच्या इंटरनॅशनल स्कूल आॅफ प्रोफेशनल स्टडीज संस्थेने दाखविली होती. तालुक्यातील सायगाव येथील आर्द्रता व ढगांचे प्रमाण अधिक असल्याच्या अभ्यासावरून या परिसराची निवड करण्यात आली होती. त्यानुसार सकाळी दहा वाजेपासूनच सायगाव येथे पथकाने यंत्रणा तयार ठेवली होती. आमदार छगन भुजबळ यांनीही सायगाव परिसराला भेट देऊन कृत्रिम पावसाच्या कृती कार्यक्रमाबाबत माहिती घेतली. कृत्रिम पाऊस पडेल, या कुतुहलापोटी सायगाव फाट्यावर परिसरातून सुमारे पाच हजार शेतकरी आले होते. गर्दीमुळे पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. २५ तंत्रज्ञांच्या पथकाने प्रत्येकी ७.५ किलो वजनाचे १० रॉकेट तसेच लॉन्चर स्टॅण्ड व सर्व यंत्रसामग्री सज्ज ठेवली होती. दहा वाजेनंतर दर तासाला पथकाकडून ढगांचा अभ्यास केला जात होता. आर्द्रता तपासली जात होती. मात्र ढगांचा लपंडाव सुरू असल्याने तंत्रज्ञांनी आकाशत रॉकेट सोडलेच नाही. आठ तास प्रतीक्षा करूनही अनुकूल ढगांची स्थिती निर्माण झाली नाही. अखेर संध्याकाळी सहा वाजता ‘आॅपरेशन’ थांबविण्यात आले. शेतकऱ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती, मात्र कृत्रिम पाऊस पडलाच नाही. सिंधुदुर्ग व सांगली जिल्ह्यात यापूर्वी कृत्रिम पावसाचा यशस्वी प्रयोग केल्याची माहिती संस्थेचे प्रमुख अब्दुल रहेमान वान्नो यांनी ‘लोकमत’ला दिली. ७० टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता व मेघांनी गर्दी केल्यावर मोटारच्या सहाय्याने ४ ते ५ किमी उंचीपर्यंत रॉकेट उडविले जाते. रॉकेट इप्सित स्थळापर्यंत पोहचल्यानंतर एका लॉन्चसाठी ४५ ग्रॅम सिल्व्हर आयोडाईडचे कण ढगात विखुरले जातात व ढगातील तपमान कमी होऊन बाष्पाचे जलकणात रूपांतर होते आणि साधारण ४० ते ४५ मिनिटांनी पाऊस पडतो, असे अब्दुल वान्नो यांनी सांगितले. दरम्यान दिवसभर कृत्रिम पावसासाठी आवश्यक वातावरण निर्मिती झाली नाही. परिणामी संस्थेला हा प्रयोग आवरता घ्यावा लागला. (प्रतिनिधी)