शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

राजकारणातलं 'धोतर' अन् बदलत गेलेला नेत्यांचा 'पॅटर्न'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 14:39 IST

मराठी चित्रपटात अभिनेते निळू फुले, श्रीराम लागू यांच्याही राजकीय भूमिका धोतरावरच गाजल्या. ग्रामीण भागीतल सरपंचापासून ते पंतप्रधानापर्यंतचे सर्वच राजकारणी एकेकाळी धोतरच नेसायचे.

सुदाम देशमुख 

अहमदनगर : धोतर हे एक भारतीय पारंपारिक वस्त्र आहे. धोतर, टोपी, कुर्ता असा मराठी माणसाचा पोशाख आहे. काळानुसार वस्त्र बदलले असले तरी आजही ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक धोतर आणि टोपीच घालतात. भारतीय राजकारणावरही याच पोशाखाचा एकेकाळी प्रभाव होता. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद, पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री, पी. व्ही. नरसिंहराव, चंद्रशेखर, एच. डी. देवेगौडा यांचाही धोतर हाच पोशाख होता. ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, ते महात्मा गांधी हे तर गुडघ्यापर्यंत धोतर नेसायचे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांचा धोतर हाच पोशाख होता.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, मोरारजी देसाई, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना आठवताना त्यांचा पेहरावच पहिल्यांदा आठवतो. मराठी चित्रपटात अभिनेते निळू फुले, श्रीराम लागू यांच्याही राजकीय भूमिका धोतरावरच गाजल्या. ग्रामीण भागीतल सरपंचापासून ते पंतप्रधानापर्यंतचे सर्वच राजकारणी एकेकाळी धोतरच नेसायचे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात असे धोतर घालणारे नेते होते, मंत्री होते, ज्यांचा राजकारणावर मोठा प्रभाव राहिला. काही नेते धोतराऐवजी पायजमा वापरायचे. अगदी नगर जिल्ह्यातही धोतर नेसणारे अनेक मातब्बर राजकारणी झाले. सहकाराची पायाभरणी करणारे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, माजी मंत्री आबासाहेब निंबाळकर, भाऊसाहेब थोरात, दादा पाटील राजळे, बापूसाहेब तनपुरे, मारुतीराव घुले, जय टेकावडे, बाबासाहेब ठुबे, बी. जे. खताळ पाटील अशी अनेक नावे सांगता येतील.

शंकरराव कोल्हे, शंकरराव काळे, दादा पाटील शेळके, रामदास धुमाळ यांची नावे घेतली की धोतर आणि टोपी घातलेल्या नेत्यांची छबी डोळ्यासमोर येते. विधानसभेचे माजी सभापती तथा गांधीवादी नेते बाळासाहेब भारदे यांचेही व्यक्तिमत्त्व राजकारणात आदर्श होते. सध्याचे विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांचाही टोपी-धोतर हाच पेहराव आहे. सध्याच्या राजकारणात आता मोदी जॅकेटची चलती आहे. त्याखाली पायजमा किंवा पॅण्ट घातली जाते. धोतर नेसणारे नेते कमी असले तरी त्यांचा राजकारणातील दबदबा आजही कायम आहे. वारकरी संप्रदायात तर धोतर हाच पोशाख असतो. पुरोहित मंडळींनाही धोतर घातल्याशिवाय पर्याय नसतो. ग्रामीण भागातील ज्येष्ठ मंडळींचा पोशाखही धोतरच आहे. सरपंच असो की आमदार हे आपल्या पारंपारिक धोतराच्या पोशाखातच राहायचे. साधी राहणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. राहणी साधी असली तरी त्यांचे विचार महत्त्वाचे होते. त्यामुळेच त्यांचा लोकांवर प्रभाव पडायचा. मग सभा असो की समारंभ किंवा थेट मंत्रालयात जायचे असले तरी ते याच वेशात जायचे.

राजकारणाची तत्त्वे, निष्ठा सांभाळत राजकारणाला उंचीवर नेणारे, देशाच्या-राज्याच्या प्रगतीत योगदान देणारी ही जुनी मंडळी धोतरामध्येच रहायची. जाडेभरडे, खादीचे धोतर हाच त्यांचा पोशाख होता. पोशाखात बदल झाला तसे धोतर नेसणारेही कमी झाले आहेत. दादा कोंडके यांनीही ‘सासरचे धोतर’ हा चित्रपट काढून चित्रपटसृष्टीतही धोतराचे स्थान अढळ केले.

धोतराची अचानक कशीकाय आठवण झाली, असा प्रश्न नक्कीच पडला असेल. अहमदनगर जिल्ह्यात माजी उपमुख्यमंत्र्यांनी टीका करताता चक्क धोतर फेडण्याचीच भाषा केली. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारही चांगलाच रंगात येणार आहे. या प्रचारात टोपी-धोतर घालून प्रचार करणारेही दिसतील, पण पूर्वीच्या धोतर नेसणाऱ्या राजकीय नेत्यांची त्यांना सर येईल का? हाच खरा प्रश्न आहे.

 

टॅग्स :Yashwantrao Chavhanयशवंतराव चव्हाणNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण