शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

लेख: पीओपी मूर्तींबाबत ठोस धोरण आखणे आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 10:05 IST

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती बनवण्यास न्यायालयाने बंदी घातली होती. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते.

ॲड. नरेश दहिबावकरअध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय  समितीप्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती बनवण्यास न्यायालयाने बंदी घातली होती. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. साहजिकच अशा मूर्ती बनवायच्या की  नाही याबाबत मूर्तिकारांमध्ये संभ्रम होता. राज्य सरकार आणि गणेशोत्सव समन्वय  समितीने  पाठपुरावा केला. त्यानंतर न्यायालयाने अंतरिम आदेश देत  पीओपीवरील बंदी उठवली.  त्यानंतर  विसर्जनाचा प्रश्न निर्माण झाला. त्यावर तोडगा काढण्यातही वेळ गेला. त्यामुळे पीओपी मूर्तींबाबत निश्चित धोरण असावे यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला विश्वासात घेऊन निश्चित धोरण आखणे गरजेचे आहे, अशी भूमिका बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत मांडली.  

मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची  संख्या वाढत आहे का ?- शहर भागात मंडळांची संख्या वाढलेली नाही. मात्र उपनगरांत ती वाढत आहे. याचे कारण म्हणजे या भागात अनेक ठिकाणी उत्तुंग  टॉवर झाले आहेत. त्यांत किमान १०० कुटुंबे राहतात. त्यांच्या सोसायट्यांनी  सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले आहेत.  त्यामुळे उपनगरांत मंडळांची संख्या वाढल्याचे दिसते. 

‘एक गाव -एक गणपती’ ही  संकल्पना मुंबईत राबवता येऊ शकते का ?- नाही! मंडळांची स्थापना पब्लिक ट्रस्ट ॲक्टखाली झाली आहे. त्यामुळे त्यांना कायदेशीर अधिष्ठान आहे. साहजिकच त्यांना उत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे. अशी अनेक मंडळे आहेत. त्यामुळे ‘एक गाव - एक गणपती’ ही संकल्पना मुंबईत अमलात येणे अशक्य आहे.

 मंडळांनी राजकारणापासून दूर राहण्याचे आवाहन समितीने का केले?- मंडळांमध्ये राजकारण आणि राजकीय मंडळींचा शिरकाव नको, अशी आमची भूमिका आहे.  उत्सवात सर्व धर्मांचे, जातिपातींचे लोक सहभागी होतात, वर्गणी देतात. मंडळे ही कार्यशाळेसारखी  असतात. विविध उपक्रम राबवतात. त्यातून कार्यकर्ते घडतात.  निवडणुकांच्या निमित्ताने मंडळांमध्ये राजकारणाचा शिरकाव होतो, हे कटाक्षाने  टाळले पाहिजे. त्यासाठी राजकारणापासून दूर राहिले पाहिजे, या भूमिकेतून आम्ही तसे आवाहन केले.

मूर्तींच्या उंची वाढत आहेत, त्याविषयी काय भूमिका आहे?- ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर असताना आम्ही मूर्तीची उंची किती असावी यासाठी समिती नेमली होती. तेव्हा १८ फूट उंचीचा निकष ठेवण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्यात बदल करून २० फुटांचा निकष ठरवण्यात आला. मूर्तींच्या उंचीबाबत मूर्तिकारांनीच भूमिका घेतली पाहिजे. मंडळांनी मोठ्या मूर्तींची मागणी केली तरी तेवढ्या  उंचीच्या मूर्ती बनवायच्या का? याचा निर्णय त्यांनी घ्यावा.

मंडळांना सरकारी अनुदान कशासाठी हवे आहे?- गणेशोत्सव १० दिवस चालणारा उत्सव नाही, तर मंडळे वर्षभर सामाजिक उपक्रम राबवत असतात. प्रसंगी ती पदरमोड करतात. विविध उपक्रम राबवताना त्यांना आर्थिक  अडचणी येतात. सरकारने अनुदान दिल्यास त्यांना  असे उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवण्यास आणखी प्रोत्साहन मिळेल.- शब्दांकन : जयंत होवाळ

टॅग्स :Ganesh Chaturthiगणेश चतुर्थीGanesh Mahotsavगणेशोत्सव 2025