शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाला पुन्हा लष्कराची सलामी

By admin | Updated: December 30, 2014 01:30 IST

गेल्या चार वर्षांपासून खंडीत झाली होती़ ही परंपरा यंदाच्या १ जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार असल्याने या विजयस्तंभाला खऱ्या अर्थाने विजयी सलामी मिळणार आहे़

मुंबई : पुण्यातील भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला लष्कराच्या महार रेजिमेंटकडून दिली जाणारी मानवंदनेची परंपरा गेल्या चार वर्षांपासून खंडीत झाली होती़ ही परंपरा यंदाच्या १ जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार असल्याने या विजयस्तंभाला खऱ्या अर्थाने विजयी सलामी मिळणार आहे़ ब्रिटिश व दुसरा बाजीराव पेशवा यांच्यात १ जानेवारी १८१८ रोजी लढाई झाली़ यात ब्रिटिशांकडून लढलेल्या महार बटालियनच्या ५०० सैनिकांनी पेशव्यांच्या ३० हजार सैन्याचा दारुण पराभव केला. या लढाईनंतर पेशवाईचा अंत झाला़ यात महार बटालियनचे २२ सैनिक शहीद झाले होते़ त्यांच्या स्मरणार्थ भीमा-कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारण्यात आला़ या दिनाचे औचित्य साधून दरवर्षी १ जानेवारीला या शहिदांना मानवंदना देण्यास हजारो जण येतात़ खुद्द डॉ़ बाबासाहेब आंबेडकरदेखील येथे या वीरांना मानवंदना देण्यासाठी येत होते. स्वातंत्र्यानंतर लष्करातील महार रेजिमेंट येथे मानवंदना देण्यासाठी येत होती़ मात्र गेल्या काही वर्षांत ही मानवंदना काही कारणांमुळे बंद झाली़ अखेर महार रेजिमेंट माजी सैनिक संघटनेचे माजी सुभेदार मेजर दत्ताराम मोहिते, सुभेदार जाधव, हवालदार शांताराम सावंत, हवालदार संजय तांबे, हवालदार रमेश कदम, हवालदार दिलीप सावंत, नायक राजेश पवार यांनी ही मानवंदना पुन्हा सुरू करण्यास पाठपुरावा केला़ याची दखल घेत या संघटनेला मध्य प्रदेशच्या सागर येथील महार रेजिमेंट ट्रेनिंग सेंटरमधील कमांडिंग आॅफिसर व इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ही मानवंदना यंदापासून पुन्हा देण्यात येईल, असे आश्वासन दिले़ (प्रतिनिधी)