शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शासन निर्णय घेऊन अर्जुन खोतकर पोहोचले; मनोज जरांगे मागणीवरून मागे नाही हटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 16:32 IST

जीआर नाकारला असला तरी या जीआरमध्ये जरांगे पाटील यांना सुधारणा सुचवायची असेल तर त्यांनी प्रत्यक्ष चर्चेला मंत्रालयात, सह्याद्री गेस्ट हाऊसवर किंवा वर्षा बंगल्यावर यावे असं अर्जुन खोतकरांनी म्हटलं.

जालना – अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी इथं सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे न घेण्यावर ठाम आहेत. राज्य सरकारच्या वतीने माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. राज्य सरकारने काढलेला जीआर जरांगे पाटील यांना सोपवला त्याचसोबत सरकारकडून चर्चा करण्याचे आश्वासनही खोतकरांनी मराठा आंदोलकांना दिले.

यावेळी अर्जुन खोतकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा संदेश मी मनोज जरांगे पाटील यांना दिला. शासनाच्या वतीने ३ गोष्टी जरांगे पाटील यांना आश्वासन दिले होते. जीआर, गुन्हे मागे घेणे आणि दोषींवर कारवाई करणे या तिन्ही गोष्टी सरकारने केल्या आहेत. आमच्यापेक्षा जरांगे पाटील यांची यंत्रणा स्ट्राँग दिसते. आम्ही जीआर आणण्यापूर्वीच त्यांनी सकाळी जीआर नाकारला. मी राज्य सरकारच्या वतीने इथं विनंती करण्यासाठी आलोय. जीआर नाकारला असला तरी या जीआरमध्ये जरांगे पाटील यांना सुधारणा सुचवायची असेल तर त्यांनी प्रत्यक्ष चर्चेला मंत्रालयात, सह्याद्री गेस्ट हाऊसवर किंवा वर्षा बंगल्यावर यावे. जरांगे पाटील यांना शक्य नसल्याने शिष्टमंडळ यांना सरकारसोबत चर्चेला घेऊन जाऊ असं त्यांनी म्हटलं.

त्याचसोबत जीआरमध्ये सूचना आणि दुरुस्ती करता येते का याबाबत विधी न्याय विभाग आणि इतर सर्व अधिकाऱ्यांना घेऊन चर्चेत बसू असं सरकारच्या वतीने जरांगे पाटील यांना सांगण्यात आले आहे. जीआरमध्ये सुधारणा होऊन समाजाला न्याय मिळावा यासाठी मी प्रयत्न करेन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनदा जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. सरकारकडून जे निमंत्रण घेऊन आलोय त्याचा स्वीकार केल्याबद्दल आभार मानतो, २ दिवसांत याचा निर्णय होईल असंही खोतकरांनी माहिती दिली.

दरम्यान, आमचे शिष्टमंडळ मुंबईला जाऊन सरकारशी चर्चा करेल. जोपर्यंत सुधारणा केलेला जीआर आणत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. सरसकट मराठा समाजाला कुणबी आरक्षण द्यावे ही आमची मागणी आहे. वंशाववळ शब्द आहे तो काढून टाकावा अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी आंदोलन मागे न घेण्याची भूमिका स्पष्ट केली. तर मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार ठाम आहे. परंतु आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण