शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

शासन निर्णय घेऊन अर्जुन खोतकर पोहोचले; मनोज जरांगे मागणीवरून मागे नाही हटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 16:32 IST

जीआर नाकारला असला तरी या जीआरमध्ये जरांगे पाटील यांना सुधारणा सुचवायची असेल तर त्यांनी प्रत्यक्ष चर्चेला मंत्रालयात, सह्याद्री गेस्ट हाऊसवर किंवा वर्षा बंगल्यावर यावे असं अर्जुन खोतकरांनी म्हटलं.

जालना – अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी इथं सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे न घेण्यावर ठाम आहेत. राज्य सरकारच्या वतीने माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. राज्य सरकारने काढलेला जीआर जरांगे पाटील यांना सोपवला त्याचसोबत सरकारकडून चर्चा करण्याचे आश्वासनही खोतकरांनी मराठा आंदोलकांना दिले.

यावेळी अर्जुन खोतकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा संदेश मी मनोज जरांगे पाटील यांना दिला. शासनाच्या वतीने ३ गोष्टी जरांगे पाटील यांना आश्वासन दिले होते. जीआर, गुन्हे मागे घेणे आणि दोषींवर कारवाई करणे या तिन्ही गोष्टी सरकारने केल्या आहेत. आमच्यापेक्षा जरांगे पाटील यांची यंत्रणा स्ट्राँग दिसते. आम्ही जीआर आणण्यापूर्वीच त्यांनी सकाळी जीआर नाकारला. मी राज्य सरकारच्या वतीने इथं विनंती करण्यासाठी आलोय. जीआर नाकारला असला तरी या जीआरमध्ये जरांगे पाटील यांना सुधारणा सुचवायची असेल तर त्यांनी प्रत्यक्ष चर्चेला मंत्रालयात, सह्याद्री गेस्ट हाऊसवर किंवा वर्षा बंगल्यावर यावे. जरांगे पाटील यांना शक्य नसल्याने शिष्टमंडळ यांना सरकारसोबत चर्चेला घेऊन जाऊ असं त्यांनी म्हटलं.

त्याचसोबत जीआरमध्ये सूचना आणि दुरुस्ती करता येते का याबाबत विधी न्याय विभाग आणि इतर सर्व अधिकाऱ्यांना घेऊन चर्चेत बसू असं सरकारच्या वतीने जरांगे पाटील यांना सांगण्यात आले आहे. जीआरमध्ये सुधारणा होऊन समाजाला न्याय मिळावा यासाठी मी प्रयत्न करेन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनदा जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. सरकारकडून जे निमंत्रण घेऊन आलोय त्याचा स्वीकार केल्याबद्दल आभार मानतो, २ दिवसांत याचा निर्णय होईल असंही खोतकरांनी माहिती दिली.

दरम्यान, आमचे शिष्टमंडळ मुंबईला जाऊन सरकारशी चर्चा करेल. जोपर्यंत सुधारणा केलेला जीआर आणत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. सरसकट मराठा समाजाला कुणबी आरक्षण द्यावे ही आमची मागणी आहे. वंशाववळ शब्द आहे तो काढून टाकावा अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी आंदोलन मागे न घेण्याची भूमिका स्पष्ट केली. तर मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार ठाम आहे. परंतु आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण