शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

खोतकर-दानवेंची 'आशिकी' गुलदस्त्यातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 18:05 IST

अर्जुन खोतकर यांनी जाहीर कार्यक्रमात दानवे आपली मेहबुबा आणि त्यांचं माझ्यावर इश्क असं म्हटले होते. त्यांचं हे प्रेम विधानसभा निवडणुकीतही कायम राहिल का असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या वेळी पक्षादेशाच्या विरोधात जाण्याच्या तयारी करणारे अर्जुन खोतकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेला होता. वेळप्रसंगी अपक्ष लढू पण दानवेंना आव्हान देणारच अशी भूमिका खोतकर यांनी घेतली होती. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेसमोर पेच निर्माण झाला होता. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. परंतु, हा वाद मिटविण्यासाठी काय साटेलोटे झाले हे अद्याप कळू शकले नाही.

राज्यमंत्री असलेले खोतकर आणि दानवे यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे. खोतकर यांनी भाजपला दूर ठेवण्यासाठी जालना जिल्हा परिषद काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन स्वत: कडे ठेवली. एकमेकात विस्तवही जात नसताना खोतकर यांनी लोकसभेला दानवे यांचे काम केले. दानवे देखील मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यानंतर खोतकर यांनी जाहीर कार्यक्रमात दानवे आपली मेहबुबा आणि त्यांच माझ्यावर इश्क असं संबोधले होते. त्यांचं हे प्रेम विधानसभा निवडणुकीतही कायम राहिल का असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.

विधानसभेला जालना मतदार संघात खोतकर यांच्यासमोर कट्टर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे कैलाश गोरंट्याल यांचे तगडे आव्हान आहे. २०१४ मध्ये खोतकर केवळ २९६ मतांच्या फरकाने विजय झाले होते. खोतकर यांना पोस्टल मतांनी तारल्याचे सांगण्यात येते. खोतकर यांना राज्यमंत्रीपदामुळे जालन्यात शिवसेना मजबूत करण्याची संधी मिळाली असली तरी जालना नगरपरिषद गोरंट्याल यांच्याकडे असल्याने खोतकर यांच्यासमोर अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे विधानसभेची निवडणूक खोतकर यांच्यासाठी वाटते तितकीशी सोपी नक्कीच नसणार हे स्पष्टच आहे.

दरम्यान दानवे यांना केलेली मदत खोतकर यांच्यासाठी पथ्यावर पडू शकते. परंतु, यासाठी उभय नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी नेमकं काय साटेलोटे झाले या प्रश्नाचं उत्तर कदाचित विधानसभा निवडणुकीनंतरच मिळणार असं दिसतय.