शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

खोतकर-दानवेंची 'आशिकी' गुलदस्त्यातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 18:05 IST

अर्जुन खोतकर यांनी जाहीर कार्यक्रमात दानवे आपली मेहबुबा आणि त्यांचं माझ्यावर इश्क असं म्हटले होते. त्यांचं हे प्रेम विधानसभा निवडणुकीतही कायम राहिल का असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या वेळी पक्षादेशाच्या विरोधात जाण्याच्या तयारी करणारे अर्जुन खोतकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेला होता. वेळप्रसंगी अपक्ष लढू पण दानवेंना आव्हान देणारच अशी भूमिका खोतकर यांनी घेतली होती. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेसमोर पेच निर्माण झाला होता. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. परंतु, हा वाद मिटविण्यासाठी काय साटेलोटे झाले हे अद्याप कळू शकले नाही.

राज्यमंत्री असलेले खोतकर आणि दानवे यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे. खोतकर यांनी भाजपला दूर ठेवण्यासाठी जालना जिल्हा परिषद काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन स्वत: कडे ठेवली. एकमेकात विस्तवही जात नसताना खोतकर यांनी लोकसभेला दानवे यांचे काम केले. दानवे देखील मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यानंतर खोतकर यांनी जाहीर कार्यक्रमात दानवे आपली मेहबुबा आणि त्यांच माझ्यावर इश्क असं संबोधले होते. त्यांचं हे प्रेम विधानसभा निवडणुकीतही कायम राहिल का असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.

विधानसभेला जालना मतदार संघात खोतकर यांच्यासमोर कट्टर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे कैलाश गोरंट्याल यांचे तगडे आव्हान आहे. २०१४ मध्ये खोतकर केवळ २९६ मतांच्या फरकाने विजय झाले होते. खोतकर यांना पोस्टल मतांनी तारल्याचे सांगण्यात येते. खोतकर यांना राज्यमंत्रीपदामुळे जालन्यात शिवसेना मजबूत करण्याची संधी मिळाली असली तरी जालना नगरपरिषद गोरंट्याल यांच्याकडे असल्याने खोतकर यांच्यासमोर अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे विधानसभेची निवडणूक खोतकर यांच्यासाठी वाटते तितकीशी सोपी नक्कीच नसणार हे स्पष्टच आहे.

दरम्यान दानवे यांना केलेली मदत खोतकर यांच्यासाठी पथ्यावर पडू शकते. परंतु, यासाठी उभय नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी नेमकं काय साटेलोटे झाले या प्रश्नाचं उत्तर कदाचित विधानसभा निवडणुकीनंतरच मिळणार असं दिसतय.