शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

खोतकर-दानवेंची 'आशिकी' गुलदस्त्यातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 18:05 IST

अर्जुन खोतकर यांनी जाहीर कार्यक्रमात दानवे आपली मेहबुबा आणि त्यांचं माझ्यावर इश्क असं म्हटले होते. त्यांचं हे प्रेम विधानसभा निवडणुकीतही कायम राहिल का असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या वेळी पक्षादेशाच्या विरोधात जाण्याच्या तयारी करणारे अर्जुन खोतकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेला होता. वेळप्रसंगी अपक्ष लढू पण दानवेंना आव्हान देणारच अशी भूमिका खोतकर यांनी घेतली होती. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेसमोर पेच निर्माण झाला होता. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. परंतु, हा वाद मिटविण्यासाठी काय साटेलोटे झाले हे अद्याप कळू शकले नाही.

राज्यमंत्री असलेले खोतकर आणि दानवे यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे. खोतकर यांनी भाजपला दूर ठेवण्यासाठी जालना जिल्हा परिषद काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन स्वत: कडे ठेवली. एकमेकात विस्तवही जात नसताना खोतकर यांनी लोकसभेला दानवे यांचे काम केले. दानवे देखील मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यानंतर खोतकर यांनी जाहीर कार्यक्रमात दानवे आपली मेहबुबा आणि त्यांच माझ्यावर इश्क असं संबोधले होते. त्यांचं हे प्रेम विधानसभा निवडणुकीतही कायम राहिल का असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.

विधानसभेला जालना मतदार संघात खोतकर यांच्यासमोर कट्टर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे कैलाश गोरंट्याल यांचे तगडे आव्हान आहे. २०१४ मध्ये खोतकर केवळ २९६ मतांच्या फरकाने विजय झाले होते. खोतकर यांना पोस्टल मतांनी तारल्याचे सांगण्यात येते. खोतकर यांना राज्यमंत्रीपदामुळे जालन्यात शिवसेना मजबूत करण्याची संधी मिळाली असली तरी जालना नगरपरिषद गोरंट्याल यांच्याकडे असल्याने खोतकर यांच्यासमोर अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे विधानसभेची निवडणूक खोतकर यांच्यासाठी वाटते तितकीशी सोपी नक्कीच नसणार हे स्पष्टच आहे.

दरम्यान दानवे यांना केलेली मदत खोतकर यांच्यासाठी पथ्यावर पडू शकते. परंतु, यासाठी उभय नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी नेमकं काय साटेलोटे झाले या प्रश्नाचं उत्तर कदाचित विधानसभा निवडणुकीनंतरच मिळणार असं दिसतय.