शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

खोतकर-दानवेंची 'आशिकी' गुलदस्त्यातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 18:05 IST

अर्जुन खोतकर यांनी जाहीर कार्यक्रमात दानवे आपली मेहबुबा आणि त्यांचं माझ्यावर इश्क असं म्हटले होते. त्यांचं हे प्रेम विधानसभा निवडणुकीतही कायम राहिल का असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या वेळी पक्षादेशाच्या विरोधात जाण्याच्या तयारी करणारे अर्जुन खोतकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेला होता. वेळप्रसंगी अपक्ष लढू पण दानवेंना आव्हान देणारच अशी भूमिका खोतकर यांनी घेतली होती. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेसमोर पेच निर्माण झाला होता. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. परंतु, हा वाद मिटविण्यासाठी काय साटेलोटे झाले हे अद्याप कळू शकले नाही.

राज्यमंत्री असलेले खोतकर आणि दानवे यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे. खोतकर यांनी भाजपला दूर ठेवण्यासाठी जालना जिल्हा परिषद काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन स्वत: कडे ठेवली. एकमेकात विस्तवही जात नसताना खोतकर यांनी लोकसभेला दानवे यांचे काम केले. दानवे देखील मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यानंतर खोतकर यांनी जाहीर कार्यक्रमात दानवे आपली मेहबुबा आणि त्यांच माझ्यावर इश्क असं संबोधले होते. त्यांचं हे प्रेम विधानसभा निवडणुकीतही कायम राहिल का असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.

विधानसभेला जालना मतदार संघात खोतकर यांच्यासमोर कट्टर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे कैलाश गोरंट्याल यांचे तगडे आव्हान आहे. २०१४ मध्ये खोतकर केवळ २९६ मतांच्या फरकाने विजय झाले होते. खोतकर यांना पोस्टल मतांनी तारल्याचे सांगण्यात येते. खोतकर यांना राज्यमंत्रीपदामुळे जालन्यात शिवसेना मजबूत करण्याची संधी मिळाली असली तरी जालना नगरपरिषद गोरंट्याल यांच्याकडे असल्याने खोतकर यांच्यासमोर अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे विधानसभेची निवडणूक खोतकर यांच्यासाठी वाटते तितकीशी सोपी नक्कीच नसणार हे स्पष्टच आहे.

दरम्यान दानवे यांना केलेली मदत खोतकर यांच्यासाठी पथ्यावर पडू शकते. परंतु, यासाठी उभय नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी नेमकं काय साटेलोटे झाले या प्रश्नाचं उत्तर कदाचित विधानसभा निवडणुकीनंतरच मिळणार असं दिसतय.