शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

VIDEO- खरंच भुतं असतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 17:31 IST

भुतं असतात का? खूपच आवडीनं चघळला जाणारा विषय म्हणजे भुतांचा! मुळात भुतांबद्दल बहुसंख्यांच्या मनात प्रचंड भीतीच असते. ते अस्तित्वात नसले तरी भीती मात्र असतेच असते.

- स्नेहा मोरे

कोणत्याही देशात जा, कोणत्याही राज्यात जा, कोणत्याही गावात जा भुतांच्या गोष्टी ऐकायला मिळतातच मिळतात. नसलेल्या भुतांच्या असलेल्या भीतीचाच मग गैरफायदा घेतला जातो काही मतलबींकडून. मांत्रिक, तांत्रिक वगैरेंची ही जमात भलतीच कमाई करते. सामान्यांना नाडते त्यामुळेच लोकमतचा हा एक प्रयत्न...स्नेहा मोरे यांचा खास रिपोर्ट थेट स्मशानातून...खरंच भुतं असतात?

स्मशानभूमीत थेट सरण रचतात तेथेच बसून भुतांच्या शोधावर बोलत मनाला बोध देण्याचा प्रयत्न करण्यात आला. भुतांविषयी गावगप्पा खूपच रंगतात. नकळतण्या वयापासूनच भुतांच्या गोष्टी, गाव-गजाली कानावर पडतात. भीती लवकर विकली जाते असे म्हणतात तसे नसलेल्या भुतांचा मनावर चांगलाच पगडा बसतो. न पाहिलेल्या भुताविषयी आपणही कळत-नकळत प्रचारकी भूमिका पार पाडू लागतो. त्यामुळेच भुतांच्या तथाकथित अस्तित्वालाच आव्हान देणारे प्रश्न उपस्थित करत विज्ञानमार्गाने गप्पा रंगल्या.

पनवेल येथील काळूंद्रे गावातील स्मशानभूमीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित स्मशानसहल पार पडली. शनिवारी मृत्यूंजय अमावस्येच्या मध्यरात्री सरणाशेजारी बसून अंनिसच्या कार्यकर्त्यांनी मस्त गप्पा मारत रात्र जागवली. भूत म्हणजे काय , भूत-आत्म्याच्या संकल्पना , स्मशानात येताना मनात असलेली भीती अशा विविध विषयांवर गप्पा रंगल्या.

नवी मुंबईप्रमाणेच भायखळा, घाटकोपर, वसई, कर्जत, मुलूंड, कांजूरमार्ग अशा विविध भागांतून तरुणाईने उपस्थिती दर्शविली होती. यावेळी अंनिसचे कार्यकर्ते मनोहर तांडेल यांनी उपस्थितांना चमत्कारांचे सादरीकरण करुन दाखविले, या प्रात्यक्षिकांचा अनुभव उपक्रमातील सहभागींनीही घेतला. याप्रसंगी, स्मशानात महिलांना प्रवेश निषिद्ध असून महिलांची उपस्थितीही उल्लेखनीय होती. अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते , मानसोपचारतज्ज्ञ डॉ.प्रदीप पाटकर यांची संकल्पना असलेल्या ‘शोध भूताचा…बोध मनाचा’ या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानं कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. गप्पा आटोपत्या घेतल्यानंतर लक्षात आलं अस्तित्वात नसलेल्या काल्पनिक भीतीवरच्या गप्पा मात्र अस्सल रंगल्या! अर्थात हेतू प्रबोधनाचा असल्याने निघताना प्रत्येकाच्याच मनात समाधानही वेगळंच होतं.