शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आर्ची पुण्यातल्या कॉलेजमध्ये घेणार प्रवेश

By admin | Updated: June 26, 2017 12:29 IST

सैराट चित्रपटाच्या तुफान यशानंतर महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या रिंकू राजगुरुबद्दल तिच्या लाखो चाहत्यांना आजही प्रचंड कुतूहल आहे.

 ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 26 - सैराट चित्रपटाच्या तुफान यशानंतर महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या रिंकू राजगुरुबद्दल तिच्या लाखो चाहत्यांना आजही प्रचंड कुतूहल आहे. सैराट प्रदर्शित झाला त्यावेळी रिंकू दहावीच्या वर्षाला होती. त्यामुळे तिचा दहावीचा निकाल काय लागतो, तिला किती टक्के मिळणार याबद्दल प्रचंड उत्सुक्ता होती. 
 
रिंकू दहावीच्या परिक्षेत  66.40 टक्के गुण मिळवून फर्स्ट क्लासने उत्तीर्ण झाली. आता रिंकू तिचे पुढचे शिक्षण कुठून पूर्ण करणार, कुठल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेणार याबद्दल तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुक्ता निर्माण झाली होती. अखेर काल पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात रिंकूने तिच्या भावी वाटचालीबद्दल माहिती दिली. रिंकू तिची अभिनयातील कारकीर्द चालू ठेवणार आहे पण त्याचवेळी शिक्षणही अर्ध्यावर सोडणार नाही. 
 
रिंकू तिचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात घेणार आहे. मात्र ते कोणते महाविद्यालय असेल याचा खुलासा रिंकूने केला नाही. रिंकू नववीमध्ये असताना तिने सैराट चित्रपटासाठी चित्रीकरण केले होते. त्यानंतर ती दहावीमध्ये असताना सैराटच्या कन्नड भाषेतील रिमेकचे चित्रीकरण सुरु झाले. त्यामुळे रिंकूला दहावीच्या अभ्यासासाठी फार वेळा मिळाला नव्हता तरी, तीने दहावीमध्ये फर्स्ट क्लास मिळवला. 
 
आणखी वाचा 
 
रिंकूच्या दहावीच्या निकालाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तिला पाचशेपैकी 327 गुण मिळाले आहेत. मराठी 83, हिंदी 87, इंग्रजी 59, गणित 48, सायन्स 42, सामाजिकशास्त्र 50  असे यश तिने मिळवले आहेत. सैराटमुळे रिंकू राजगुरु आर्ची या नावाने देशभरात प्रसिद्ध झाली. पण, रिंकु राजगुरे हेसुद्धा तिचे खरे नाव नाहीये. रिंकूचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरु असं आहे. 
 
सैराट चित्रपटातील दमदार अभिनयाच्या जोरावर राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या रिंकू राजगुरू उर्फ आर्चीच्या अभिनयाला पुणे बोर्डाकडून न्याय मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती ठरल्याबद्दल कलागुणांसाठी देण्यात येणारे गुण तिला देण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागाकडून घेण्यात आला आहे. त्याचबरोबर कलागुणांचा शाळेकडून प्रस्ताव पाठवूनही तांत्रिक कारणास्तव त्यांचे गुण न मिळालेल्या इतर विद्यार्थ्यांनाही त्याचे गुण देण्यात येणार आहेत.