शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

आर्ची पुण्यातल्या कॉलेजमध्ये घेणार प्रवेश

By admin | Updated: June 26, 2017 12:29 IST

सैराट चित्रपटाच्या तुफान यशानंतर महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या रिंकू राजगुरुबद्दल तिच्या लाखो चाहत्यांना आजही प्रचंड कुतूहल आहे.

 ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 26 - सैराट चित्रपटाच्या तुफान यशानंतर महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या रिंकू राजगुरुबद्दल तिच्या लाखो चाहत्यांना आजही प्रचंड कुतूहल आहे. सैराट प्रदर्शित झाला त्यावेळी रिंकू दहावीच्या वर्षाला होती. त्यामुळे तिचा दहावीचा निकाल काय लागतो, तिला किती टक्के मिळणार याबद्दल प्रचंड उत्सुक्ता होती. 
 
रिंकू दहावीच्या परिक्षेत  66.40 टक्के गुण मिळवून फर्स्ट क्लासने उत्तीर्ण झाली. आता रिंकू तिचे पुढचे शिक्षण कुठून पूर्ण करणार, कुठल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेणार याबद्दल तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुक्ता निर्माण झाली होती. अखेर काल पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात रिंकूने तिच्या भावी वाटचालीबद्दल माहिती दिली. रिंकू तिची अभिनयातील कारकीर्द चालू ठेवणार आहे पण त्याचवेळी शिक्षणही अर्ध्यावर सोडणार नाही. 
 
रिंकू तिचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात घेणार आहे. मात्र ते कोणते महाविद्यालय असेल याचा खुलासा रिंकूने केला नाही. रिंकू नववीमध्ये असताना तिने सैराट चित्रपटासाठी चित्रीकरण केले होते. त्यानंतर ती दहावीमध्ये असताना सैराटच्या कन्नड भाषेतील रिमेकचे चित्रीकरण सुरु झाले. त्यामुळे रिंकूला दहावीच्या अभ्यासासाठी फार वेळा मिळाला नव्हता तरी, तीने दहावीमध्ये फर्स्ट क्लास मिळवला. 
 
आणखी वाचा 
 
रिंकूच्या दहावीच्या निकालाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तिला पाचशेपैकी 327 गुण मिळाले आहेत. मराठी 83, हिंदी 87, इंग्रजी 59, गणित 48, सायन्स 42, सामाजिकशास्त्र 50  असे यश तिने मिळवले आहेत. सैराटमुळे रिंकू राजगुरु आर्ची या नावाने देशभरात प्रसिद्ध झाली. पण, रिंकु राजगुरे हेसुद्धा तिचे खरे नाव नाहीये. रिंकूचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरु असं आहे. 
 
सैराट चित्रपटातील दमदार अभिनयाच्या जोरावर राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या रिंकू राजगुरू उर्फ आर्चीच्या अभिनयाला पुणे बोर्डाकडून न्याय मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती ठरल्याबद्दल कलागुणांसाठी देण्यात येणारे गुण तिला देण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागाकडून घेण्यात आला आहे. त्याचबरोबर कलागुणांचा शाळेकडून प्रस्ताव पाठवूनही तांत्रिक कारणास्तव त्यांचे गुण न मिळालेल्या इतर विद्यार्थ्यांनाही त्याचे गुण देण्यात येणार आहेत.