शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पुरातत्त्वीय अवशेषांनीच आपली संस्कृती कळली

By admin | Updated: December 14, 2014 00:46 IST

पुरातत्व विभागाने शोधलेल्या अवशेषांमुळेच आपल्याला आपली लिपी, संस्कृती, जीवनपद्धती आणि इतिहास कळला. यातूनच साहित्याची निर्मिती झाली त्यामुळे पुरातत्त्व शास्त्राचा साहित्याशी जवळचा संबंध आहे.

६४ वे विदर्भ साहित्य संमेलन : महानुभाव साहित्य हीच खरी मराठी साहित्याची गंगोत्रीचक्रधरस्वामी साहित्य नगरी : पुरातत्व विभागाने शोधलेल्या अवशेषांमुळेच आपल्याला आपली लिपी, संस्कृती, जीवनपद्धती आणि इतिहास कळला. यातूनच साहित्याची निर्मिती झाली त्यामुळे पुरातत्त्व शास्त्राचा साहित्याशी जवळचा संबंध आहे. अनेकांकडे जुन्या प्राचीन पोथी आहेत. त्या पोथीचे पूजन करताना आपण त्यावर हळक, कुंकू, तीर्थ टाकतो. काही काळाने ही पोथी जीर्ण होते आणि त्यांनंतर ती पोथी विसर्जीत केली जाते. यामुळे आपला महत्वाचा इतिहास संपतो. काही लोकांनी या पोथ्यांचे जतन शास्त्रीय पद्धतीने केली त्यामुळेच आपली लिपी आणि संस्कृती कळली, असे मत पुरातत्व अभ्यासक डॉ. चंद्रशेखर गुप्ता यांनी व्यक्त केले. विदर्भ साहित्य संमेलन, तळोधी येथे ‘पुरातत्वीय संस्कृती : वारसा आणि जतन’विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थनावरुन ते बोलत होते. याप्रसंगी वक्ते म्हणून डॉ. संगीता मेश्राम, डॉ. र. रा. बोरकर आणि डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे उपस्थित होते. डॉ. गुप्ता म्हणाले, अनेक पुरातत्त्वीय अवशेष लुप्त होत आहेत त्यामुळे अद्यापही आपल्या पुर्वजांचा संपूर्ण अभ्यास झालेला नाही. आपली संस्कृती आणि जीवनशैली अतिशय समृद्ध होती. शिवाजींचे किल्ले, प्राचीन स्थापत्यशास्त्र आणि पोथी लिहिण्यासाठी उपयोगात आणली जाणारी शाई प्रगत होती. ही शाई पाण्यात विरघळत नव्हती. त्यामुळेच संत तुकाराम महाराजांच्या ओव्या सापडल्य्ीाात. पुरातत्व शास्त्राकडे आपला इतिहास, पुर्वज, संस्कृती आणि जीवनपद्धतीचा अभ्यास या अंगाने पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले. जिल्हा स्तरावर पुरातत्वीय अवशेष सांगावेत मानवी जीवनाच्या समृद्धतेसाठी ज्या साधनांचा उपयोग झाला, त्यांचे जतन पी पुरातत्त्वीय संपदा आहे. इतिहास ज्ञात माहितीवर आधारलेला असतो तर पुरातत्त्व अज्ञात बाबींचा शोध घेते. पुरातत्त्वातूनच विविध संस्कृतीचा शोध लागला. जेथे पुरातत्त्वीय अवशेष नाहीत, असा कुठलाही भाग नाही. नागभीडला सात बहिणींचा डोंगर आहे तेथे प्राचीन पेटिंग्ज आहेत. सम्राट अशोक आणि प्रागैतिक ते वाकाटक काळापर्यंतचे पुरावे नागभीड आणि चंद्रपूर भागात आहेत. हा भग अतिशय समृद्ध असल्याचे पुरावे सापडले आहेत पण चंद्रपूरचा जिल्हा, मार्कंडा मंदिर, सात बहिणींचा डोंगर याकडे आपलेच दुर्लक्ष झाले आहे. आपल्या पुर्वजांचे संचित सांभाळताना नव्या पिढीला शालेय जीवनापासूनच मुलांना या विषयाची आवड लावावी, असे मत डॉ. र. रा. बोरकर यांनी व्यक्त केले. ग्रामस्थांमध्ये जागरुकता यावी गोसेखुर्दच्या प्रकल्पात काही नाणे सापडले आणि लोकांनी ते वाटून घेतले. त्यांना त्याचे महत्व कळले नाही. रामटेक परिसरातही उत्खनन झाले तेव्हा ग्रामस्थांना हे लोक सोने लुटून नेत आहेत, अशी भावना होती. याबाबत जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे. मांढळच्या उत्खननात सापडलेल्या प्राचीन विटांचा उपयोग लोकांनी घर बांधकामासाठी केला. त्यामुळे संशोधनाचे अनेक प्रकल्प वेगवेगळ्या पातळ्यांवर अपूर्ण राहिले आणि आपल्याच इतिहासापासून आपण वंचित राहिलो. ही जागरुकता निर्माण करण्यासाठी प्राचीन व मध्ययुगीन इतिहास आणि पुरातत्त्व मुलांना शिकविण्याची गरज आहे. शाळेत हेरिटेज क्लब आणि जिल्हास्तरावर संग्रहालय असावे, असे मत डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांनी व्यक्त केले. शिवाजी महाराज उत्कृष्ट आर्किटेक्चरशिवाजी महाराज उत्कृष्ट अभियंता होते हा इतिहास फार सांगितला जात नाही. महाराजांनी समुद्रात जे किल्ले बांधले आहेत त्याच्या पायव्यात उपयोग आणलेले दगड खाऱ्या पाण्याने झिजले. पण दोन दगडांच्या फटीत जो चुना भरला आहे तो इतका पक्का आहे की, त्याला काहीही झाले नाही. त्यांच्या किल्ल्याच रचना आणि सुरक्षेचे उपाय आपल्याला थक्क करणारे आहे. याचा मात्र विचारही होत नाही. हे सारे पुरातत्त्वीय संशोधकांनी शोधून काढले आहे. या किल्ल्याचे जतन आवश्यक आहे, असे मत डॉ. संगीता मेश्राम यांनी व्यक्त केले. या परिसंवादाचे संचालन बबन गुरनुले यांनी तर आभार डॉ. कोकोडे यांनी मानले.