शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

अर्धवटराव नाबाद १००...!

By admin | Updated: September 25, 2016 01:31 IST

बोलक्या बाहुल्या म्हटले की, डोळ््यांसमोर येतात ते अर्धवटराव, आवडाबाई आणि या सगळ््या डोलाऱ्यामागे समर्थपणे उभे असणारे पाध्ये कुटुंबीय. दूरदर्शनपासून सुरू झालेला प्रवास

बोलक्या बाहुल्या म्हटले की, डोळ््यांसमोर येतात ते अर्धवटराव, आवडाबाई आणि या सगळ््या डोलाऱ्यामागे समर्थपणे उभे असणारे पाध्ये कुटुंबीय. दूरदर्शनपासून सुरू झालेला प्रवास देश-विदेशातील असंख्य कार्यक्रमातून शब्दभ्रमाची अनोखी कला जोपासण्याचा ध्यास पाध्ये कुटुंबीयांनी घेतला आहे. याच प्रवासादरम्यान या कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्य असणाऱ्या ‘अर्धवटराव’ याने, नाबादपणे शंभर वर्षांचा प्रवास करीत शब्दभ्रम कलेच्या विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे.रामदास पाध्ये यांचे वडील प्रा.यशवंत के. पाध्ये हे प्रसिद्ध शब्दभ्रमकार-जादूगार होते. त्या वेळी इंग्लंडहून आलेल्या शब्द भ्रमकाराच्या खेळामुळे ते खूपच प्रभावित झाले होते. आपणही हा खेळ करावा, असे त्यांना वाटले. त्यांनी कागदावरच १९१६ साली एका बाहुल्याचे पात्र साकारले. अशा रीतीने अर्धवटराव या पात्राचा जन्म झाला. त्याला त्या वेळी गप्पीदास-मि.क्रेझी अशीही नावे होती. मात्र, त्या वेळी शब्दभ्रमकारासाठी आवश्यक अशी साधने नव्हती. त्यामुळे त्यांनी कागदाच्या बाहुल्यांचे प्रयोग सुरू केले. कालानंतराने इंग्लंडहून सामान आणून अखेर या बाहुल्याचे प्रयोग सुरू झाले. त्यानंतर, अर्धवटरावाबरोबरच त्याची बायको आवडाबाई, त्यांची व्रात्य मुले शामू आणि गंपू यांचाही जन्म झाला. रामदास पाध्ये यांनी याची सूत्रे हाती घेतल्यानंतर, एन.बी.सी., ए.बी.सी., हाँगकाँग टीव्ही, अशा परदेशी वाहिन्यांप्रमाणेच देशा-परदेशात आत्तापर्यंत या बोलक्या बाहुल्यांचे तब्बल ९ हजार ८०० प्रयोग झाले.अर्धवटराव आणि आवडाबाई ही जोडी परिपूर्ण, समाधान देणारी अशी कलाकृती आहे. साध्या, मध्यमवर्गीय कुटुंबाचे प्रतिनिधित्व त्यातून व्हावे, या उद्देशाने यांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे ही जोडी पाहणाऱ्याला कधी परकी वाटलीच नाही, अजूनही वाटत नाही. हे त्या कलाकृतीचे यश आहे. परदेशात पपेट्री, वेंट्रीलोकिझमला प्रचंड ग्लॅमर आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचा एक ग्रह झाला आहे की, ही कला आपली नाहीच, परदेशातून आपण ही शिकलोय. हा ग्रह चुकीचा आहे, हे आपल्याला आणि त्या परदेशीयांनाही कळले पाहिजे, त्यांनी ‘उदो उदो’ केल्यावर एखाद्या आपल्याकडे असणाऱ्या गोष्टीचे महत्त्व कळते, ही आपली मानसिकता झालीय. आपल्याकडे मात्र, या कलेला राजाश्रय मिळाला नाही. चित्रपटापासून ते अगदी मेकअपमन, वेशभूषाकार अशा सर्वांचेच सन्मान होतात. मात्र, आजमितीस कधीच कुठल्याही सोहळ््यात बाहुलीकाराचा सन्मान होत नाही, ही खंत पाध्ये कुटुंबीयांनी अर्धवटरावांच्या शतकी प्रवासानिमित्त व्यक्त केली.शब्दभ्रम कलेकरिता बाहुला बनविण्यासाठी एखादे काल्पनिक पात्र बांधायचे, तर त्यासाठीचे तांत्रिक काम हे प्रचंड असतेच. प्रामुख्याने डोळयांचे हावभाव, चेहऱ्यावरील अवयवांची प्रमाणबद्धता, सारेच फार एकाग्रतेने करावे लागते, पण त्याच्या माध्यमातून आपण कोणाचे प्रतिनिधित्व करतोय, हे स्पष्ट झाले की, त्याच्या चेहऱ्यावर ते सगळे मूर्त स्वरूपात आणणे हे तसे कठीण आणि आव्हानात्मक काम आहे. त्यासाठी व्यावसायिक कोर्सेसही केले. त्याचा उपयोग कलाकृती उत्तम साकारण्यात होतो. जिवंत व्यक्तींची कॅरेक्टर तयार करणे हेही आव्हानात्मकच. ती व्यक्ती खरे तर आपल्याला जेवढे माहीत असते, त्याहीपेक्षा जास्त अभ्यास हा करावाच लागतो. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात प्रचंड आदराची भावना असते. त्या वेळी त्याचे पात्र बांधताना किंवा ते परफॉर्म करताना हास्यास्पद होऊ नये, याची काळजी साहजिकच घेतली जाते. अशा वेळी आपले संस्कार आपल्या कलेतून दिसतात.पुढच्या पिढीला अर्धवटरावाची माहिती व्हावी, याकरिता ‘कॅरी आॅन एंटरटेन्मेंट-रामदास पाध्ये लाइव्ह’ या कार्यक्रमातून अर्धवटराव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पाध्ये यांच्या पत्नी अर्पणा, दोन मुले सत्यजित आणि परिक्षित, सून ऋतुजा असे संपूर्ण कुटुंब मिळून हा कार्यक्रम सादर करणार आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत हा कार्यक्रम पार पडणार आहे.