शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

एमपीएससीच्या नियुक्त्या पंधरा दिवसांत; शासन निर्णय निघाला, १७ जणांना नेमणूकपत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 09:19 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या पदभरती विहित वेळेत केल्या जाव्यात तसेच या प्रक्रिया एका ठरावीक कालबध्द वेळेत करण्यासंदर्भात विनय कोरे यांनी प्रश्न उपस्थित केला.

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१९ मध्ये कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना येत्या पंधरा दिवसांत नियुक्ती देण्यात येईल, असे आश्वासन सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी विधानसभेत दिले.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या पदभरती विहित वेळेत केल्या जाव्यात तसेच या प्रक्रिया एका ठरावीक कालबध्द वेळेत करण्यासंदर्भात विनय कोरे यांनी प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत आमदार चंद्रकांत पाटील, प्रकाश आबिटकर, नाना पटोले, योगेश सागर यांनी भाग घेतला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट ‘क’ मध्ये सन २०१९ मध्ये कर सहायक, लिपिक टंकलेखक व दुय्यम निरीक्षक या पदांसाठी पदभरती प्रक्रिया वेगवेगळ्या कारणांमुळे प्रलंबित आहे आणि आश्वासन देऊनही नियुक्ती दिली जात नसल्याचे सदस्यांनी सांगितले.राज्यमंत्री भरणे म्हणाले की, भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासन निर्णय काढला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २०२० रोजी अंतरिम आदेशान्वये एसईबीसी आरक्षणासह स्थगिती दिली होती. तर कर सहायकांची १२६ आणि लिपिक टंकलेखकाच्या १७९ पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना पंधरा दिवसांत नियुक्ती देण्यात येण्याबाबत तसेच ३३ दुय्यम निरीक्षक मधील १७ जणांना नेमणूक पत्रे दिली असून उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून सर्वांच्या वेळेत नेमणुका करण्यात येतील.सेतू सुविधा केंद्रासाठी लवकरच निविदाराज्यातील बंद असलेली सेतू सुविधा केंद्रे सुरू करण्यासाठी येत्या तीन महिन्यांत निविदा काढण्यात येतील, असे आश्वासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. तर सेतू केंद्र वेळेत सुरू करण्याबाबत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.काँग्रेसचे धीरज देशमुख यांनी लातूर जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये ३१ डिसेंबरपासून एकात्मिक नागरी सेतू केंद्र बंद असल्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी राजेंद्र पाटणी, नमिता मुंदडा, आशिष जयस्वाल, श्वेता महाले यांनीही प्रश्न उपस्थित केले. नमिता मुंदडा यांनी बीड जिल्ह्यातील ११ सेतू केंद्रे बंद असल्याचे सांगत ही केंद्रे कधी सुरू करणार असा प्रश्न विचारला. राजेंद्र पटणी यांनीही हा मुद्दा उचलून धरत सेतू केंद्रांची मुदत संपणार आहे, हे जिल्हाधिकाऱ्यांना माहीत होते. तरीही त्यांनी कार्यवाही केली नाही. त्यामुळे प्रशासनाने केवळ चालढकल करत सामान्य नागरिकांना त्रास दिला आहे. कोरोना काळात केंद्रांना मुदतवाढ दिली हे मान्य करू पण त्यानंतर काहीच जबाबदारी नाही का? असा प्रश्न विचारला. श्वेता महाले आणि आशिष जयस्वाल यांनीही संबधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावू. तसेच दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे भरणे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा