शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

‘राज्याचेच हाऊसिंग रेग्युलेटर लागू करा’

By admin | Updated: November 19, 2015 02:50 IST

केंद्र शासनाचे गृहनिर्माण धोरण येईपर्यंत महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले गृहनिर्माण नियामक ( हाऊसिंग रेग्युलेटर) तातडीने अंमलात आणावे, असा प्रस्ताव गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी

- अतुल कुलकर्णी,  मुंबईकेंद्र शासनाचे गृहनिर्माण धोरण येईपर्यंत महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले गृहनिर्माण नियामक ( हाऊसिंग रेग्युलेटर) तातडीने अंमलात आणावे, असा प्रस्ताव गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे हाऊसिंग रेग्युलेटरचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे.राज्याचा मंजूर कायदा तातडीने अंमलात आणल्यास मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न सुकर होईल. पण सरकार बिल्डरांच्या दबावाखाली असल्याने हा कायदा मंजूर केला जात नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले हाऊसिंग रेग्युलेटर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतरही दीड वर्षापासून पडून आहे. नवा मंजूर झालेला कायदा अमलात येत नाही आणि जुन्या ‘मोफा’ कायद्यातल्या पळवाटांचा फायदा घेत फ्लॅट विकत घेणाऱ्यांना नाडले जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. ठाण्यातील सात मजली कोसळली तेव्हाही नवा कायदा मंजूर होता, पण अंमलबजावणी सुरू झाली नव्हती. परिणामी जुन्या कायद्यातल्या तुटपुंजा शिक्षेचा फायदा त्या बिल्डरांना मिळाला. केंद्र सरकारने नेमलेली खासदारांची समिती मुंबईत आली होती. मात्र दिल्लीत जाऊन त्यांनी राज्याचा कायदा रद्द करा आणि केंद्राचा अमलात आणा, अशी शिफारस केल्याने या विषयावर चर्चा करून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. दरम्यानच्या काळात मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी यासंबंधीची फाइल गृहनिर्माण मत्र्यांकडे पाठवली होती. केद्र सरकार कायदा आणणार आहे. त्यामुळे आपण मंजूर केलेल्या कायद्याबाबतचा निर्णय सरकारने घ्यायचा आहे. याबाबत मार्गदर्शन करावे, अशी विचारणा करणारी फाइल महेता यांच्याकडे आली. त्यावर आपलाच कायदा लागू करावा, अशी शिफारस करून महेता यांनी ती मुख्यमंत्र्यांकडे पाठवली आहे.केंद्राला विरोध केंद्राचा कायदा दीर्घकाळासाठी लांबणीवर पडल्याची चिन्हे आहेत. केंद्राने केलेल्या कायद्याबाबत काँग्रेस, ममता बॅनर्जी आणि डाव्या पक्षांनी तीव्र विरोध केला आहे. राज्यसभेत सरकारचे बहुमत नाही, त्यामुळे केंद्राचा कायदा नजिकच्या दोन वर्षात तरी येणे अशक्य आहे.