शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘राज्याचेच हाऊसिंग रेग्युलेटर लागू करा’

By admin | Updated: November 19, 2015 02:50 IST

केंद्र शासनाचे गृहनिर्माण धोरण येईपर्यंत महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले गृहनिर्माण नियामक ( हाऊसिंग रेग्युलेटर) तातडीने अंमलात आणावे, असा प्रस्ताव गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी

- अतुल कुलकर्णी,  मुंबईकेंद्र शासनाचे गृहनिर्माण धोरण येईपर्यंत महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले गृहनिर्माण नियामक ( हाऊसिंग रेग्युलेटर) तातडीने अंमलात आणावे, असा प्रस्ताव गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे हाऊसिंग रेग्युलेटरचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे.राज्याचा मंजूर कायदा तातडीने अंमलात आणल्यास मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न सुकर होईल. पण सरकार बिल्डरांच्या दबावाखाली असल्याने हा कायदा मंजूर केला जात नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले हाऊसिंग रेग्युलेटर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतरही दीड वर्षापासून पडून आहे. नवा मंजूर झालेला कायदा अमलात येत नाही आणि जुन्या ‘मोफा’ कायद्यातल्या पळवाटांचा फायदा घेत फ्लॅट विकत घेणाऱ्यांना नाडले जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. ठाण्यातील सात मजली कोसळली तेव्हाही नवा कायदा मंजूर होता, पण अंमलबजावणी सुरू झाली नव्हती. परिणामी जुन्या कायद्यातल्या तुटपुंजा शिक्षेचा फायदा त्या बिल्डरांना मिळाला. केंद्र सरकारने नेमलेली खासदारांची समिती मुंबईत आली होती. मात्र दिल्लीत जाऊन त्यांनी राज्याचा कायदा रद्द करा आणि केंद्राचा अमलात आणा, अशी शिफारस केल्याने या विषयावर चर्चा करून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. दरम्यानच्या काळात मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी यासंबंधीची फाइल गृहनिर्माण मत्र्यांकडे पाठवली होती. केद्र सरकार कायदा आणणार आहे. त्यामुळे आपण मंजूर केलेल्या कायद्याबाबतचा निर्णय सरकारने घ्यायचा आहे. याबाबत मार्गदर्शन करावे, अशी विचारणा करणारी फाइल महेता यांच्याकडे आली. त्यावर आपलाच कायदा लागू करावा, अशी शिफारस करून महेता यांनी ती मुख्यमंत्र्यांकडे पाठवली आहे.केंद्राला विरोध केंद्राचा कायदा दीर्घकाळासाठी लांबणीवर पडल्याची चिन्हे आहेत. केंद्राने केलेल्या कायद्याबाबत काँग्रेस, ममता बॅनर्जी आणि डाव्या पक्षांनी तीव्र विरोध केला आहे. राज्यसभेत सरकारचे बहुमत नाही, त्यामुळे केंद्राचा कायदा नजिकच्या दोन वर्षात तरी येणे अशक्य आहे.