शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
3
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
4
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
5
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
6
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
7
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
8
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
9
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
10
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
11
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
12
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
13
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
14
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
15
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
16
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
17
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
18
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
19
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
20
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!

अर्ज केलाय, पण ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे अजून खात्यात जमा झाले नाही? नेमके कारण काय असेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 14:04 IST

Ladki Bahin Yojna News: अर्ज करूनही खात्यात पैसे जमा न होण्याची काही कारणे सांगितली जात आहेत. प्रक्रिया काय सांगते? का विलंब होत असेल? जाणून घ्या...

Ladki Bahin Yojna News: पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' सुरू केली. या योजनेची राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. या योजनेत तसेच योजनांच्या नियमांमध्ये वेळोवेळी बदल करून अधिकाधिक महिलांपर्यंत ही योजना कशी पोहोचेल, यासाठी महायुती सरकारने प्रयत्न केले. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत महाविकास आघाडीचे नेते तसेच विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. या योजनेत अर्ज केला आहे. परंतु, अद्यापही खात्यात पैसे जमा झाले नाहीत, असे तुमच्याबाबतीत झाले असेल तर याची कारणे समजून घ्यावी लागतील. नेमके कारण काय असू शकेल, ते जाणून घेऊया...

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ या योजनेंतर्गत पात्र महिलांना प्रतिमाह १ हजार ५०० रुपयांचा लाभ देण्यात येत असून जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये लाभार्थी भगिनींच्या खात्यावर जमा होण्यास १४ ऑगस्टपासूनच सुरूवात झाली आहे. आतापर्यंत लाखो महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाल्याचे सांगितले जात आहे. या योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून, ३१ जुलैपर्यंत अर्ज केलेल्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाभार्थ्यांना जून आणि जुलै महिन्याचे मिळून ३ हजार रुपये मिळाले आहेत. ज्या महिलांनी या नंतर अर्ज भरले आहेत, त्यांच्या खात्यात लवकरच या योजनेतील पैसे जमा होतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, काही महिलांनी फॉर्म भरलेला असूनही, मात्र पैसे खात्यात जमा झालेले नाही. खात्यात पैसे का जमा झाले नसावेत?

नेमकी काय कारणे असू शकतात? अर्जावर प्रक्रिया कशी होते?

सरकारकडून पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे लवकरच पात्र महिलांच्या खात्यात पैसे येतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजणेचा फॉर्म भरलेल्या महिलांचे बँक अकाऊंट आधार कार्डच्या नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे. बँक अकाऊंट आधार कार्डाशी लिंक नसेल तर पैसे खात्यात येण्यास उशीर होऊ शकतो. त्यासाठी महिलांना आधी आपले बँक अकाऊंट आधारशी लिंक करावे लागेल. जेणेकरुन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल. काही कारणास्तव तुमचा अर्ज फेटाळला गेला असेल, तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. तुमच्या अर्जाच्या समोर पेडिंग, रिव्ह्युव्ह, डिसअप्रुव्ह्ड असे दिसत असेल तुमच्या अर्जाची छाननी सुरु आहे. अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पात्र महिलांना लवकरच योजनेचे पैसे मिळणार आहेत.   

दरम्यान, राज्यातील महिला, मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी आणि महिला तसेच त्यांच्यावर अबलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना आहे. २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १ हजार ५०० रुपये जमा होणार आहेत.  

टॅग्स :State Governmentराज्य सरकार