शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

एपीएमसीत २३ हजार पेट्या आंब्याची आवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 07:29 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूससह इतर आंब्याची आवक वाढली आहे. सोमवारी तब्बल २३ हजार पेट्यांमधून माल विक्रीसाठी आला आहे.

नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूससह इतर आंब्याची आवक वाढली आहे. सोमवारी तब्बल २३ हजार पेट्यांमधून माल विक्रीसाठी आला आहे. कोकणसह तामिळनाडू, केरळ व आंध्र प्रदेशमधूनही आंबा विक्रीसाठी येत आहे.या वर्षी मार्केटमध्ये हापूसची आवक लवकर सुरू झाली आहे. सुरुवातीला हंगाम चांगला होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता, परंतु थंडीचा कालावधी वाढल्यामुळे व थ्रीप्स रोगाची लागण झाल्यामुळे प्रत्यक्ष उत्पादनावर परिणाम झाला आहे. मार्च महिना सुरू झाल्यापासून रोज ५ ते १० हजार पेट्यांची आवक होऊ लागली होती. सोमवारी पहिल्यांदा २३ हजार पेट्यांची आवक झाली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडमधून हापूस विक्रीसाठी येत आहे. तामिळनाडू, केरळ व आंध्र प्रदेशमधूनही माल विक्रीसाठी येत आहे.बाजार समितीमध्ये होलसेल मार्केटमध्ये ४ ते ८ डझनची पेटी २ ते ५ हजार रुपये दराने विकली जात आहे. बदामी ६० ते १०० रुपये किलो, लालबाग ५० ते ७० रुपये किलो व तोतापुरी ४० ते ६० रुपये किलो दराने विकला जात आहे. होळीनंतर आवक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. एप्रिलमध्ये सर्वसामान्यांच्या आवाक्यात आंबा येईल, असे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले.हवामानाचा परिणामया वर्षी ५ नोव्हेंबरला हापूसची पहिली पेटी बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आली होती. पहिल्यांदाच नोव्हेंबरमध्ये आंबा विक्रीसाठी आला होता. यामुळे व्यापाऱ्यांसह उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आंब्याला मोहोरही चांगला धरला होता, परंतु थंडीचा हंगाम वाढल्यामुळे व थ्रीप्सच्या रोगाची लागण झाल्यामुळे प्रत्यक्ष उत्पादनावर परिणाम झाला आहे.हापूसच्या २३ हजार पेट्यांची आवक झाली असून ४ ते ८ डझनची पेटी २ ते ५ हजार रुपये दराने विकली जात आहे. होळीनंतर आवक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.- संजय पानसरे, आंबा व्यापारी

टॅग्स :MangoआंबाNavi Mumbaiनवी मुंबई