शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीत २३ हजार पेट्या आंब्याची आवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 07:29 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूससह इतर आंब्याची आवक वाढली आहे. सोमवारी तब्बल २३ हजार पेट्यांमधून माल विक्रीसाठी आला आहे.

नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूससह इतर आंब्याची आवक वाढली आहे. सोमवारी तब्बल २३ हजार पेट्यांमधून माल विक्रीसाठी आला आहे. कोकणसह तामिळनाडू, केरळ व आंध्र प्रदेशमधूनही आंबा विक्रीसाठी येत आहे.या वर्षी मार्केटमध्ये हापूसची आवक लवकर सुरू झाली आहे. सुरुवातीला हंगाम चांगला होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता, परंतु थंडीचा कालावधी वाढल्यामुळे व थ्रीप्स रोगाची लागण झाल्यामुळे प्रत्यक्ष उत्पादनावर परिणाम झाला आहे. मार्च महिना सुरू झाल्यापासून रोज ५ ते १० हजार पेट्यांची आवक होऊ लागली होती. सोमवारी पहिल्यांदा २३ हजार पेट्यांची आवक झाली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडमधून हापूस विक्रीसाठी येत आहे. तामिळनाडू, केरळ व आंध्र प्रदेशमधूनही माल विक्रीसाठी येत आहे.बाजार समितीमध्ये होलसेल मार्केटमध्ये ४ ते ८ डझनची पेटी २ ते ५ हजार रुपये दराने विकली जात आहे. बदामी ६० ते १०० रुपये किलो, लालबाग ५० ते ७० रुपये किलो व तोतापुरी ४० ते ६० रुपये किलो दराने विकला जात आहे. होळीनंतर आवक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. एप्रिलमध्ये सर्वसामान्यांच्या आवाक्यात आंबा येईल, असे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले.हवामानाचा परिणामया वर्षी ५ नोव्हेंबरला हापूसची पहिली पेटी बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आली होती. पहिल्यांदाच नोव्हेंबरमध्ये आंबा विक्रीसाठी आला होता. यामुळे व्यापाऱ्यांसह उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आंब्याला मोहोरही चांगला धरला होता, परंतु थंडीचा हंगाम वाढल्यामुळे व थ्रीप्सच्या रोगाची लागण झाल्यामुळे प्रत्यक्ष उत्पादनावर परिणाम झाला आहे.हापूसच्या २३ हजार पेट्यांची आवक झाली असून ४ ते ८ डझनची पेटी २ ते ५ हजार रुपये दराने विकली जात आहे. होळीनंतर आवक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.- संजय पानसरे, आंबा व्यापारी

टॅग्स :MangoआंबाNavi Mumbaiनवी मुंबई