शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
3
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
4
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
6
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
7
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
8
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
9
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
11
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
12
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
13
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
15
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
16
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
17
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
18
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
19
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
20
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम

मराठवाड्यात चिंताच; नाशिकची परिस्थिती सुधारली; विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 07:05 IST

कही खुशी : ४८ तासांत धरणांच्या साठ्यात आठ टक्के वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या दोन दिवसांत विदर्भ, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पडत असलेल्या पावसाने राज्यातील एकूण १३८ मोठ्या धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली असून काही धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत एकूण पाणीसाठ्यात आठ टक्के वाढ झाली आहे. मराठवाड्याचे चित्र आशादायी नसून धरणसाठ्यात कसलीही वाढ झालेली नाही.

गतवर्षी आजच्या तारखेला राज्यातील एकूण धरणांत ५४.५६ टक्के साठा होता, तर यंदा तो ४५.०८ टक्के झाला आहे.मराठवाड्याला पाण्याची गरज

■ कोकण, पुणे आणि नागपूर विभागांतील धरणे पन्नास टक्क्यांच्यावर गेली असताना छत्रपती संभाजीनगर विभागात १२.६६ तर नाशिक विभागात ३४.६८ टक्के साठा आहे.

■ दोन दिवसांत पडलेल्या पावसाने नाशिकची स्थिती सुधारली आहे. नाशिक विभागात चांगला पाऊस झाल्यास गंगापूर धरणातून जायकवाडीत पाणी सोडले जाऊ शकते. ■ अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाचा साठा साठ टक्क्यांच्या वर गेल्याने विसर्ग केल्यास मराठवाड्यातील जायकवाडी धरणाची पातळी वाढण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

• नाशिक विभागातील भावली (९६ टक्के), दारणा (७४ टक्के), गंगापूर ४२ टक्के, कडवा (६४ टक्के) आणि वैतरणा प्रकल्पात ४८.५२ टक्के साठा आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ६३ टक्के भरले आहे.

सर्वात जास्त कोकण विभागातसर्वात जास्त कोकण विभागात ७३ टक्के पाणीसाठा झाला आहे. नागपूर विभागात ५६% पाणीसाठा असून तीन धरणे शंभर टक्के भरली आहेत. पुणे विभागातील ३५ धरणांत ५२% पाणीसाठा झाला असून १८ धरणांमधील पातळी ६० टक्क्यांच्यावर गेल्याने विसर्ग सोडण्यात येत आहे.

खडकवासला, राधानगरी, कुंडली ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. तरीही उजनी आणि जोगे धरण अद्याप मायनसमध्ये आहे. कोकणातील ११ धरणांपैकी तीन धरणे शंभर टक्के भरली असून बहुतांशी धरणांत ६० टक्केच्यावर साठा आहे.

टॅग्स :Rainपाऊस