शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
2
भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
3
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
6
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
7
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
8
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
9
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
10
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
11
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
12
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
13
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
14
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
15
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
16
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
17
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
18
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
19
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
20
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक

केंद्रातही जादूटोणाविरोधी कायदा लागू व्हावा! - श्याम मानव

By admin | Updated: June 20, 2017 17:10 IST

काटेकोर अंमलबजावणी व व्यापक जनजागृती करण्यासोबतच जादूटोणाविरोधी कायदा आता केंद्रातही लागू व्हावा या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

अकोला : आघाडी सरकारच्या कार्यकाळात कार्यान्वित झालेली जादूटोणाविरोधी कायदा प्रचार, प्रसार, जनजागृती व अंमलबजावणी समिती भाजप सरकारच्या काळातही कार्यरत आहे. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या प्रशासन काळातील पकड युती सरकारमध्ये दिसून येत नाही. अंधश्रद्धेपोटी कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी अधिक काटेकोर अंमलबजावणी व व्यापक जनजागृती करण्यासोबतच जादूटोणाविरोधी कायदा आता केंद्रातही लागू व्हावा या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक व शासकीय समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.काँग्रेसच्या कार्यकाळात निर्माण झालेला हा कायदा सर्वसंमतीने पारीत करण्यासाठी विरोधी बाकावर असलेल्या भाजप व शिवसेनेनेही मदत केल्याचा श्याम मानव यांनी आवर्जून उल्लेख केला. महाराष्ट्राचा पाया पुरोगामी विचारांचा असल्याने येथे हा कायदा होऊ शकला. हा कायदा नागरिकांपर्यंत पोहचावा यासाठी महाराष्ट्राच्या सर्व जिल्हास्थळी जाहीर सभा झाल्या. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दक्षता अधिकारी नियुक्त असल्याने सर्व विभागात पोलिस मुख्यालयी अधिकार्‍यांचे सखोल प्रशिक्षणही घेण्यात आले; मात्र या कार्यात सातत्य ठेवण्यासाठी व्यापक प्रचार महत्वाचा ठरतो. अ. भा. अनिंसने आजतागायत कोणताही शासकीय अथवा विदेशी निधी स्विकारला नसून, कायद्याच्या प्रचारार्थ उपलब्ध झालेला निधीही प्रशासकीय स्तरावरच खर्च केल्या गेला असल्याचे प्रा. मानव यांनी सांगितले.आज देशभरात कायदा लागू होण्याची गरज प्रकर्षाने निर्माण झाली आहे. त्या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवले यांच्याशी प्राथमिक चर्चा झाल्याचेही मानव यांनी सांगितले. राजकीय पक्षाचा याला विरोध नसतोच. सनातन संस्था सारख्या धर्मांध संघटना अन्य कट्टरवाद्यांना हाताशी घेऊन सतत अडसर निर्माण करीत असतात; मात्र दाभोळकर आणि पाणसरे यांच्या हत्या प्रकरणात सनातनची माणसे सापडल्याने सामाजिक पाठिंबा ते गमावून बसले आहेत, असे मानव म्हणाले. अंधश्रद्धा निर्मुलनाची ही चळवळ व उपक्रम आपल्या मृत्यूनंतरही सुरु राहावी यासाठी आपली स्थावर मालमत्ता अ.भा. अनिंसच्या सुपूर्द करीत असल्याचेही श्याम मानव यांनी जाहीर केले.पत्रकार परिषदेला अ. भा. अनिंसचे राज्य प्रवक्ता पुरुषोत्तम आवारे पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख शरद वानखडे, अशोक घाटे, प्रा. स्वप्ना लांडे, महानगर संघटक चंद्रकांत झटाले, जिल्हा सचिव संतोषकुमार ताले पाटील यांची उपस्थिती होती.