शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
3
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
4
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
5
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
6
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
7
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
8
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
9
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
10
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
11
बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
12
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!
13
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
14
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
15
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
16
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
17
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
18
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
19
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
20
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी

सदाभाऊ देणार प्रश्नांना उत्तरे

By admin | Published: July 13, 2017 12:40 AM

२२ जुलैला फैसला : समितीसमोर मांडणार भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्यातील संघर्ष अंतिम टप्प्यावर आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याची तयारी सदाभाऊंनी केली असून, येत्या २२ जुलैला ते संघटनेच्या समितीपुढे भूमिका मांडणार आहेत. संघटनाविरोधी कारवाईचा ठपका ठेवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सदाभाऊ खोत यांना २३ प्रश्नांबाबत विचारणा केली आहे. त्यासाठी त्यांना २२ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. दुसरीकडे सदाभाऊ खोत यांनी या प्रश्नांना उत्तरे देण्याची तयारी केली आहे. वास्तविक, यामुळे दोन्ही नेत्यांमधील संघर्ष अधिकच तीव्र होत आहे. सदाभाऊंनी उत्तरे सादर केल्यानंतरही तो कायम राहण्याचीच शक्यता अधिक आहे. भाजपशी सदाभाऊंच्या असलेल्या सलगीचा प्रश्न उपस्थित केला असला तरी, प्रत्यक्षात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेच भाजपला रीतसर पाठिंबा दिला असल्याने, सदाभाऊंकडून याचा उल्लेख होऊ शकतो. स्वामिनाथन् आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या विरोधात सरकारने पत्र दिले असताना, सरकारच्या प्रत्येक गोष्टीत सदाभाऊंचा सहभाग दिसत असल्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. वास्तविक, सत्तेच्या काळात आजवर स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणून भाजपला पाठिंबाच देत आली आहे. त्यामुळे एकट्या सदाभाऊ खोत यांना या वादात खेचण्यावरही उलट प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. सरकारची धोरणे पसंत नसतील तर संघटनेचे प्रमुख म्हणून राजू शेट्टींनीच त्याबाबत स्पष्ट भूमिका घेण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची गरज होती. संघटनेने सदाभाऊंंना भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराबाबतही विचारणा केली आहे. प्रत्यक्षात विधानसभेवेळी भाजपचे आ. शिवाजीराव नाईक यांचा प्रचार खुद्द राजू शेट्टी यांनीच केला होता. त्यामुळे हा मुद्दा संघटनेच्याच भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखा आहे. सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शिवसेनेशी जवळीक झाली आहे. त्याबद्दल सदाभाऊंकडूनही उलट प्रश्न उपस्थित होऊ शकतो. एकूणच वादाला वाद वाढत जाऊन, त्याचे फलित काहीच निघणार नाही, अशी शक्यता दिसत आहे. त्यामुळे प्रश्नोत्तरांनी वादाच्या विस्तवाला चालना दिली जाईल.मी लोकशाही मानणारा व जपणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे संघटनेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणार आहे. संघटनेच्या आदेशाप्रमाणे हजरही राहणार आहे. संघटनेनेच घालून दिलेल्या पाऊलवाटेवरून मी चालत आहे. - सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्रीदोन्ही बाजूंचे संभाव्य पर्याय...१ सदाभाऊंचे म्हणणे फेटाळून संघटना त्यांच्यावर कारवाई करू शकते. २ सरकारचा पाठिंबा काढून घेऊन सदाभाऊंना राजीनामा देण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. ३ संघटनेतून हकालपट्टी करून सदाभाऊंचे मंत्रिपद काढून घेण्याची शिफारस सरकारकडे केली जाऊ शकते. ४ नवीन संघटना स्थापन करून सरकारमधील आपले स्थान टिकविण्याची खेळी सदाभाऊंकडून खेळली जाऊ शकते. ५ पक्षीय कारवाईनंतर भाजपकडून सदाभाऊंना प्रवेशाची ‘आॅफर’ दिली जाऊ शकते. ६ म्हणणे ऐकून सदाभाऊंना पुन्हा एक संधी देण्याची औपचारिकता संघटनेकडून पार पाडली जाऊ शकते. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली १ मार्च रोजी मुंबईत मंत्रालयासमोर तूर आणि कांदाप्रश्नी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आपण आंदोलनस्थळी आलात. त्या आंदोलनात खासदार शेट्टी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक झाली असताना, आपण विचारपूस करण्याची तसदी का घेतली नाही?काँग्रेसच्या घराणेशाहीवर आपण वारंवार कठोर टीका केली. मात्र, आपल्या मुलाला निवडणुकीच्या राजकारणात आणण्याची घाई केली. ही घराणेशाही नाही का?खासदार शेट्टी आणि कार्यकर्ते सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी दबाव टाकतात, असे वक्तव्य आपण खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केले. त्याचा खुलासा करावा.मी लोकशाही मानणारा व जपणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे संघटनेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणार आहे. संघटनेच्या आदेशाप्रमाणे हजरही राहणार आहे. संघटनेनेच घालून दिलेल्या पाऊलवाटेवरून मी चालत आहे. - सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्रीखासदार राजू शेट्टी यांनी काढलेल्या आत्मक्लेश यात्रेत सहभागी न होता, भाजपच्या शिवार संवाद यात्रेत सहभागी का झालात?लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामिनाथन् आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते न पाळता, आम्हाला हे शक्य नाही, असे सुप्रीम कोर्टात सरकारच्यावतीने लिहून दिले. ही भाजप सरकारने केलेली फसवणूक आहे, यावर आपले मत काय?