शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

सहा प्रश्नांची उत्तरे द्या; अशोक चव्हाण यांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 02:00 IST

राज्यात १७ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रीमंडळातील निम्म्यापेक्षा जास्त मंत्र्यावर घोटाळ््यांचे आरोप आहेत. पण अगुस्ता वेस्टलँडबाबत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेत्यांवर मुख्यमंत्र्यांनी खोटे आरोप केले.

मुंबई : राज्यात १७ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रीमंडळातील निम्म्यापेक्षा जास्त मंत्र्यावर घोटाळ््यांचे आरोप आहेत. पण अगुस्ता वेस्टलँडबाबत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेत्यांवर मुख्यमंत्र्यांनी खोटे आरोप केले. त्यांची पत्रकार परिषद म्हणजे चोराच्या उलच्या बोंबा आहेत. त्यांनी राफेल खरेदी घोटाळ््यावरही पत्रकार परिषद घ्यावी, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिले.चव्हाण यांनी अगुस्ता वेस्टलँड प्रकरणी ६ प्रश्न उपस्थित केले असून त्यांची उत्तरेही मुख्यमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावीत असे चव्हाण म्हणाले.१) अगुस्ता वेस्टलँड/ फिनमेकेनिकाला ब्लॅकलिस्टेड कंपन्यांच्या यादीतून का वगळले? २) ब्लॅकलिस्टेड कंपनी अगुस्ता वेस्टलँड/ फिनमेकेनिकाला ‘मेक इन इंडियात’ का सहभागी करून घेतले? ३) अगुस्ताला फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाकडून गुंतवणुकीची परवानगी देऊन एडब्ल्यू ११९ सैनिक हेलीकॉप्टर उत्पादनाची परवानगी का दिली? ४) या कंपनीला १०० नौसेना हेलिकॉप्टरसाठी बोली लावण्याची परवानगी का दिली? ५) मोदी सरकार अगुस्ता वेस्टलँड विरोधातील/ फिनमेकेनिका विरोधातील सर्व खटले हरल्यावरही अपिलात का गेले नाही? ६) ख्रिश्चन मिशेलचा वापर करून खोट्या कथा रचून मोदी सरकार स्वत:चा भ्रष्टाचार आणि घोटाळे लपवण्यासाठी का करत आहे?, या प्रश्नांची उत्तरे कोण देणार असेही खा. चव्हाण म्हणाले.सहारा डायरीचे काय?सहारा डायरीत भाजपाच्या नेत्यांची नावे आहेत. त्याबाबत माहिती द्यावी आणि मगच काँग्रेस नेत्यांकडे स्पष्टीकरण मागावे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण