शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

भोंगे हटवण्यासाठी मनसेचं आणखी एक आंदोलन; आता डिजिटल स्वाक्षरी अभियान, पाहा फॉर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 14:14 IST

मनसेनं हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिल्यानंतर ४ मे रोजी जवळपास १ हजार मशिदींनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत भोंग्यावरून अजान म्हंटली नाही.

मुंबई – मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण पेटलं आहे. राज ठाकरे यांनी अनाधिकृत भोंगे हटवण्याबाबत सरकारला अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर आता ४ मे रोजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी मशिदीसमोर हनुमान चालीसा लावली. मात्र मनसे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती. आंदोलनाच्या पूर्वसंध्येलाच अनेक मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. जवळपास १५ हजार कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस पाठवल्या.

मनसेनं हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिल्यानंतर ४ मे रोजी जवळपास १ हजार मशिदींनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत भोंग्यावरून अजान म्हंटली नाही. त्यामुळे राज ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे कार्यकर्त्यांनी या मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवली नाही. मात्र एकूण ११४० मशिदींपैकी १३५ मशिदींनी भोंग्यावरून अजान म्हटली. त्यामुळे आता या मशिदीवर काय कारवाई करणार असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारत जोपर्यंत भोंगे उतरत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील. हे केवळ एक दिवसांचे आंदोलन नाही असं स्पष्ट केले आहे.

आता मनसेनं या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून गुगल फॉर्मद्वारे जनतेची डिजिटल स्वाक्षरी मोहिम सुरु केली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक फॉर्म जारी करण्यात आला आहे. या फॉर्ममध्ये मनसेने लोकांना काही प्रश्न विचारले आहेत. मशिदीवरील भोंगे उतरवले पाहिजेत या मागणीला  समर्थन आहे का?, भोंगे या विषयावर तुमचे मत, शहर, परिसर, गावाचे नाव, तुमचे नाव, संपर्क क्रमांक असा पूर्ण फॉर्म भरून सब्मिट करायचा आहे.

अनधिकृत मशिदींमधील भोंगे अधिकृत कसे?

मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न काही राजकीय नसून समाजिक विषय असल्याचं आज पुन्हा एकदा राज ठाकरेंनी म्हटलं. तसंच आजचं आंदोलन हे काही एका दिवसाचं आंदोलन नसून जोवर मशिदीवरील भोंगे उतरवले जात नाहीत तोवर आमचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच ज्यांनी ज्यांनी आज पहाटे भोंग्यांवरुन अजान न देता सहकार्य केलं अशा मौलवींचेही राज ठाकरे यांनी आभार मानले.

"विश्वास नांगरे पाटील यांनी फोनवरुन मुंबईतील मशिदींच्या मौलवींशी बोलणं झालं असून ते पहाटेची अजान भोंग्यांवरुन देणार नसल्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच दिवसभरातील अजान देखील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार होतील असं म्हटलं. पण आज मुंबईत मला मिळालेल्या माहितीनुसार १३५ मशिदींवर पहाटे भोंग्यांवरुन अजान झाली याविरोधात कारवाई केली जाणार आहे की नाही?", असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे