शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

भोंगे हटवण्यासाठी मनसेचं आणखी एक आंदोलन; आता डिजिटल स्वाक्षरी अभियान, पाहा फॉर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 14:14 IST

मनसेनं हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिल्यानंतर ४ मे रोजी जवळपास १ हजार मशिदींनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत भोंग्यावरून अजान म्हंटली नाही.

मुंबई – मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण पेटलं आहे. राज ठाकरे यांनी अनाधिकृत भोंगे हटवण्याबाबत सरकारला अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर आता ४ मे रोजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी मशिदीसमोर हनुमान चालीसा लावली. मात्र मनसे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती. आंदोलनाच्या पूर्वसंध्येलाच अनेक मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. जवळपास १५ हजार कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस पाठवल्या.

मनसेनं हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिल्यानंतर ४ मे रोजी जवळपास १ हजार मशिदींनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत भोंग्यावरून अजान म्हंटली नाही. त्यामुळे राज ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे कार्यकर्त्यांनी या मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवली नाही. मात्र एकूण ११४० मशिदींपैकी १३५ मशिदींनी भोंग्यावरून अजान म्हटली. त्यामुळे आता या मशिदीवर काय कारवाई करणार असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारत जोपर्यंत भोंगे उतरत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील. हे केवळ एक दिवसांचे आंदोलन नाही असं स्पष्ट केले आहे.

आता मनसेनं या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून गुगल फॉर्मद्वारे जनतेची डिजिटल स्वाक्षरी मोहिम सुरु केली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक फॉर्म जारी करण्यात आला आहे. या फॉर्ममध्ये मनसेने लोकांना काही प्रश्न विचारले आहेत. मशिदीवरील भोंगे उतरवले पाहिजेत या मागणीला  समर्थन आहे का?, भोंगे या विषयावर तुमचे मत, शहर, परिसर, गावाचे नाव, तुमचे नाव, संपर्क क्रमांक असा पूर्ण फॉर्म भरून सब्मिट करायचा आहे.

अनधिकृत मशिदींमधील भोंगे अधिकृत कसे?

मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न काही राजकीय नसून समाजिक विषय असल्याचं आज पुन्हा एकदा राज ठाकरेंनी म्हटलं. तसंच आजचं आंदोलन हे काही एका दिवसाचं आंदोलन नसून जोवर मशिदीवरील भोंगे उतरवले जात नाहीत तोवर आमचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच ज्यांनी ज्यांनी आज पहाटे भोंग्यांवरुन अजान न देता सहकार्य केलं अशा मौलवींचेही राज ठाकरे यांनी आभार मानले.

"विश्वास नांगरे पाटील यांनी फोनवरुन मुंबईतील मशिदींच्या मौलवींशी बोलणं झालं असून ते पहाटेची अजान भोंग्यांवरुन देणार नसल्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच दिवसभरातील अजान देखील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार होतील असं म्हटलं. पण आज मुंबईत मला मिळालेल्या माहितीनुसार १३५ मशिदींवर पहाटे भोंग्यांवरुन अजान झाली याविरोधात कारवाई केली जाणार आहे की नाही?", असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे