शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

आणखी ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 05:55 IST

पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी व कमी पर्जन्यमान असलेल्या राज्यातील ५० मंडळांतील ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली.

मुंबई : पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी व कमी पर्जन्यमान असलेल्या राज्यातील ५० मंडळांतील ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली. याआधी सरकारने ५ हजार गावांत दुष्काळ जाहीर केला असून १४ हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती.राज्यातील दुष्काळी भागांमध्ये राबविण्यात येणाºया उपाययोजनांचा आढावा गुरुवारी मंत्रालयात घेण्यात आला. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, पाणी टंचाई असलेल्या आणखी काही गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होती. त्यामुळे ज्या मंडळामधील गावांमधील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे व कमी पर्जन्यमान आहे, अशा गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येत आहे.या गावांमध्ये दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. दुष्काळ जाहीर केलेल्या मंडळांतील शेतकºयांच्या कर्जाची पुनर्बांधणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.दुष्काळ जाहीर झालेली मंडळेधुळे जिल्हा : साक्री तालुक्यातील ब्राह्मणवेल, दुसाणे, साक्री, कासारे, दहीवेल मंडळांतील ११६ गावे.अहमदनगर जिल्हा : अकोले तालुक्यातील अकोले, वीरगाव, समशेरपूर, कोतुळ, ब्राह्मणवाडा येथील ११६ गावे.जळगाव जिल्हा : एरंडोल तालुक्यातील एरंडोल व रिंगणगावमधील ३६ गावे. तसेच धरणगाव तालुक्यातील धरणगाव, साळवा, पाळधी, पिंप्री, चांदसर येथील ५९ गावे.परभणी जिल्हा : गंगाखेड व जिंतूर तालुक्यातील गंगाखेड, सांगवील बामणी या महसूल मंडळांतील ८० गावे.जालना जिल्हा : मंठा तालुक्यातील मंठा व ढोकसाळ सर्कलमधील ५८ गावे.उस्मानाबाद जिल्हा : उमरगा तालुक्यातील उमरगा, मुरुम, नारंगवाडी, मुळज, दाळिंब या मंडळांतील ९६ गावे.सातारा जिल्हा : खटाव तालुक्यातील निमसोड, मायणी, पुसेगाव, बुध, खटाव, औंध, पुसळेवाडी, कातरखटाव या मंडळांमधील १११ गावे.बुलढाणा जिल्हा : बुलढाणा, चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, जळगाव जामोद या तालुक्यांतील बुलढाणा, देऊळघाट, पाडळी, रायपूर, धाड, चिखली, उनद्री, आमडापूर, हातणी, मेरा, महेकर, हिवराश्रम, देऊळगाव मही, जळगाव, जामोद या मंडळांतील २४६ गावे.असा मिळणार दिलासाकर्ज वसुलीला स्थगितीरोजगार हमी योजनेमध्ये१०० दिवसांऐवजी१५० दिवस मजुरीविद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफयापूर्वी घेतलेले परीक्षा शुल्क जानेवारी अखेपर्यंत परत करण्यास विद्यापीठांना सूचना

टॅग्स :droughtदुष्काळ