शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

आणखी ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 05:55 IST

पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी व कमी पर्जन्यमान असलेल्या राज्यातील ५० मंडळांतील ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली.

मुंबई : पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी व कमी पर्जन्यमान असलेल्या राज्यातील ५० मंडळांतील ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली. याआधी सरकारने ५ हजार गावांत दुष्काळ जाहीर केला असून १४ हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती.राज्यातील दुष्काळी भागांमध्ये राबविण्यात येणाºया उपाययोजनांचा आढावा गुरुवारी मंत्रालयात घेण्यात आला. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, पाणी टंचाई असलेल्या आणखी काही गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होती. त्यामुळे ज्या मंडळामधील गावांमधील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे व कमी पर्जन्यमान आहे, अशा गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येत आहे.या गावांमध्ये दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. दुष्काळ जाहीर केलेल्या मंडळांतील शेतकºयांच्या कर्जाची पुनर्बांधणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.दुष्काळ जाहीर झालेली मंडळेधुळे जिल्हा : साक्री तालुक्यातील ब्राह्मणवेल, दुसाणे, साक्री, कासारे, दहीवेल मंडळांतील ११६ गावे.अहमदनगर जिल्हा : अकोले तालुक्यातील अकोले, वीरगाव, समशेरपूर, कोतुळ, ब्राह्मणवाडा येथील ११६ गावे.जळगाव जिल्हा : एरंडोल तालुक्यातील एरंडोल व रिंगणगावमधील ३६ गावे. तसेच धरणगाव तालुक्यातील धरणगाव, साळवा, पाळधी, पिंप्री, चांदसर येथील ५९ गावे.परभणी जिल्हा : गंगाखेड व जिंतूर तालुक्यातील गंगाखेड, सांगवील बामणी या महसूल मंडळांतील ८० गावे.जालना जिल्हा : मंठा तालुक्यातील मंठा व ढोकसाळ सर्कलमधील ५८ गावे.उस्मानाबाद जिल्हा : उमरगा तालुक्यातील उमरगा, मुरुम, नारंगवाडी, मुळज, दाळिंब या मंडळांतील ९६ गावे.सातारा जिल्हा : खटाव तालुक्यातील निमसोड, मायणी, पुसेगाव, बुध, खटाव, औंध, पुसळेवाडी, कातरखटाव या मंडळांमधील १११ गावे.बुलढाणा जिल्हा : बुलढाणा, चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, जळगाव जामोद या तालुक्यांतील बुलढाणा, देऊळघाट, पाडळी, रायपूर, धाड, चिखली, उनद्री, आमडापूर, हातणी, मेरा, महेकर, हिवराश्रम, देऊळगाव मही, जळगाव, जामोद या मंडळांतील २४६ गावे.असा मिळणार दिलासाकर्ज वसुलीला स्थगितीरोजगार हमी योजनेमध्ये१०० दिवसांऐवजी१५० दिवस मजुरीविद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफयापूर्वी घेतलेले परीक्षा शुल्क जानेवारी अखेपर्यंत परत करण्यास विद्यापीठांना सूचना

टॅग्स :droughtदुष्काळ