शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेगावच्या ‘आनंद सागर’ला आणखी ३0 वर्षांचा भाडेपट्टा!

By admin | Updated: July 21, 2016 01:03 IST

श्री संत गजानन महाराज संस्थानच्या ‘आनंद सागर’ प्रकल्पाचा भाडेपट्टा पुढील ३0 वर्षांसाठी वाढवून देण्याचा शासनाचा निर्णय.

शेगाव (जि. बुलडाणा) : शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानच्या ह्यआनंद सागरह्ण या मनोहारी प्रकल्पाचा भाडेपट्टा पुढील ३0 वर्षांसाठी वाढवून देण्याचा निर्णय शासनाने १९ जुलै रोजी घेतला आहे. संतनगरी शेगावात श्री गजानन महाराज संस्थानने बाळापूर मार्गावरील शासनाच्या २५३ एकराच्या जागेत विज्ञान आणि अध्यात्माच्या पायावर एक मनोहारी उद्यान ह्यआनंद सागरह्ण या नावाने तयार केले आहे. या प्रकल्पाला १७ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असून, आतापयर्ंत ४0 लाखांच्या जवळपास भाविक व पर्यटकांनी या प्रकल्पाला भेट दिली आहे. सुरुवातीला शासनाने ही जमीन १५ वर्षांकरिता संस्थानला भाडेपट्टय़ावर हस्तांतरित केली होती. त्यानुसार २६ डिसेंबर २0१४ रोजी या जागेची लीज संपली. त्यानंतर श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव नगर परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा याशिवाय विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून सदर जागेची लीज वाढून देण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केले. ह्यआनंद सागरह्णला देण्यात आलेल्या जमिनीसाठी नाममात्र एक रुपया भाडे आकारण्यात आले आहे. तसेच १0१.३२ हेक्टर आर जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ४0 व महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७१ च्या नियम ५, ६ व ७ मधील तरतुदी अन्वये श्री गजानन महाराज संस्थान यांना प्रदान करण्याचा निर्णय शासनाने १९ जुलै २0१६ रोजी घेतला आहे. यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.आणखी वाढू शकतो भाडेपट्टा!आनंद सागर या प्रकल्पाची लीज २0१४ साली संपल्यानंतर लीज वाढविण्याची मागणी संस्थानमार्फत तसेच लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली. त्यामुळे शासनाने आता पुढील ३0 वर्षांकरिता एक रुपया वार्षिक भाडे तत्त्वावर लीज वाढवून दिली आहे. त्याचप्रमाणे ही लीज संपल्यानंतर जर संस्थान आणखी पुढच्या ३0 वर्षांकरिता लीज वाढवून घेण्यास इच्छुक असेल तर तसे नूतनीकरण अनुट्ठोय राहील, असे शासनाने १९ जुलै रोजी काढलेल्या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता आनंद सागरची लीज एकूण ६0 वर्षांची असल्याचे मानले जात आहे. संस्थानला पाळाव्या लागतील अटीसंस्थानने तलावाचा वापर सौंदर्यीकरणाच्या प्रयोजनासाठी करावा. तसेच तलावात चालविणार्‍या बोटी नाममात्र शुल्क आकारून चालविणे अनिवार्य राहील, अशी अट शासनाने घातली आहे. सदर जागेवर तलावाचे सौंदर्यीकरण या प्रयोजनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रयोजनासाठी पक्के बांधकाम करू नये, बांधकामाची परवानगी नगरपलिकेकडून घेण्यात आली नसून, ती तत्काळ घेणे बंधनकारक राहील, असेही शासनाने काढलेल्या अध्यादेशात म्हटले आहे.