शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

अण्णा हजारे यांना यंदाचा ‘शाहू पुरस्कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 5:07 PM

कोल्हापूर येथील राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा आणि महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात वेगळी उंची लाभलेला मानाचा शाहू पुरस्कार यंदा माहिती अधिकार कायद्याचे प्रणेते व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना बुधवारी येथे जाहीर झाला.

ठळक मुद्देअण्णा हजारे यांना यंदाचा ‘शाहू पुरस्कार’जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा : कोल्हापुरात २६ जूनला वितरण

कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा आणि महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात वेगळी उंची लाभलेला मानाचा शाहू पुरस्कार यंदा माहिती अधिकार कायद्याचे प्रणेते व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना बुधवारी येथे जाहीर झाला.

ट्रस्टचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि विश्वस्त व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी या पुरस्काराची घोषणा केली. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या २६ जूनला शाहू जयंतीदिनी सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारकमध्ये होणाºया शानदार समारंभात या पुरस्काराचे वितरण होईल.किसन बाबूराव हजारे (जन्म १५ जून १९३७ मूळ गाव- भिंगार, जि. अहमदनगर) असे नाव असले तरी ते देशाला अण्णा हजारे या नावानेच परिचित आहेत. मूळचे सैन्यात वाहनचालक असणारे अण्णा हजारे हे भारतातील ज्येष्ठ समाजसेवक आहेत. त्यांना समाज सेवेच्या कार्याबद्दल भारत सरकारने १९९० साली ‘पद्मश्री’ आणि १९९२ साली ‘पद्मभूषण’ पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांनी लोकसहभागातून राळेगणसिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला.

स्वच्छता, पाणी व्यवस्थापन व सामाजिक सलोखा यावर त्यांनी भर दिला. या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली. अण्णांनी पाठपुरावा केला म्हणूनच माहिती अधिकार कायदा लागू झाला. त्याशिवायही त्यांच्या आंदोलनामुळे एकूण सहा कायदे झाले आहेत. माहितीच्या अधिकारावर त्यांनी पुस्तकाचे लेखनही केले आहे.

अण्णा हजारे यांनी वेळोवेळी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलने केली. त्यांच्या आंदोलनांमुळे महाराष्ट्राच्या अनेक मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. लष्करातील निवृत्त जवान ते लोकपालाच्या कायद्यासाठी देशातील राजकीय व्यवस्थेला हादरे देणारा लढवय्या अशीच अण्णा हजारे यांची जगभरातील ओळख आहे. त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी या गावाला विकासाचे मॉडेल बनविले व त्यातूनच ते महाराष्ट्राला परिचित झाले.आतापर्यंतचे पुरस्कार विजेते...समाजाला प्रगतीच्या दिशेने दोन पावले पुढे घेऊन जाणाऱ्या ध्येयवादी नेतृत्वास प्रतिवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा पुरस्कारचे चौतिसावे वर्ष आहे. ट्रस्टतर्फे १९८४ ला पहिला पुरस्कार पुरोगामी कृतिशील विचारवंत भाई माधवराव बागल यांना देण्यात आला होता.त्यानंतर मेहरुनिसा दलवाई, मेघनाथ नागेशकर, कवी कुसुमाग्रज, गायिका आशा भोसले, जलतज्ञ राजेंद्र सिंह, ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, रयत शिक्षण संस्था, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, माजी सरन्यायाधीश पी. बी. सावंत, ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ नेते शरद पवार, आदी मान्यवरांचा या पुरस्काराने आतापर्यंत सन्मान केला आहे.

राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने जाहीर झालेला पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान आहे. शाहूंनी आपले सारे आयुष्य गोरगरीब पददलित जनतेच्या भल्यासाठी खर्ची घातले अशा थोर राजाच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार या घटकांसाठी काम करण्यासाठी नवी उमेद देणारा आहे.अण्णा हजारेज्येष्ठ समाजसेवक 

 

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेkolhapurकोल्हापूर